नागपूर - राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. परंतु, या सरकारने ३६५ दिवसात ३६५ प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय मराठा आरक्षण देखील न्यायालयात टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. अशी टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
नागपुरात पार पडलेल्या भाजप पदवीधर निवडणूक मेळाव्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. तसेच, फडणवीस सरकारने मराठा आरक्षण टिकावे म्हणून वारंवार प्रयत्न केले. मात्र, सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने मराठा समाज व जनतेच्या अपेक्षाभंग करण्याचे काम केले. असा आरोपही मुनगंटीवार यांनी केला. तसेच, वर्षपूर्तीवरून विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होत आहे. राज्य सरकारने जनतेच्या अपेक्षाभंग केल्या, शेतकऱ्यांनाही खोटी आश्वासने दिली. जनतेच्या मतांचा अनादर झाला आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
राज्य सरकारकडून निराधारांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष