महाराष्ट्र

maharashtra

Karnatka Congress: कर्नाटकच्या निकालाने दिसले 'ब्रँड राहुल' असून 'मोदींची जादू' फेल -काँग्रेस

By

Published : May 15, 2023, 7:36 PM IST

कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला असून, यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसने म्हटले की, मोदी जादू फोल ठरली आहे. दरम्यान, याबाबत ईटीव्ही भारतचे वरिष्ठ प्रतिनिधी अमित अग्निहोत्री यांचा विशेष रिपोर्ट

Karnatka Congress
काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत

नवी दिल्ली :कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा मुख्य संदेश म्हणजे राहुल गांधी 'ब्रँड' ठरले असून 'मोदींची जादू' अपयशी ठरली आहे. काँग्रेसने विधानसभेच्या एकूण २२४ जागांपैकी १३५ जागा जिंकून दक्षिणेकडील राज्यात भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. भाजपला 66, जेडीएसला 19 आणि इतरांना चार जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, "कर्नाटकने हे दाखवून दिले आहे की देशात ब्रँड राहुलबद्दल बोलले जात आहे तर प्रसिद्ध 'मोदी जादू' अयशस्वी झाली आहे." मोदीजी जादूची कांडी घेऊन निवडणूक जिंकतील, असे कोणाला वाटत असेल, तर तसे होणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राहुल यांनी जिथे जिथे प्रचार केला तिथे काँग्रेसने जिंकलेल्या जागांचा स्ट्राइक रेट पंतप्रधान मोदींच्या तुलनेत खूप जास्त आहे. राहुल यांचा स्ट्राइक रेट पंतप्रधान मोदींच्या 40 टक्क्यांच्या तुलनेत 80 टक्के आहे.

लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले : भारत जोडोनंतर आणि राहुल यांना लोकसभेतून अपात्र केल्यानंतर कर्नाटकची ही पहिलीच निवडणुक होती. कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान झाली आणि भाजपच्या कथित विभाजनवादी राजकारणाविरुद्ध भारत जोडो संदेशावर केंद्रित होती. मोदी आडनावाचा समावेश असलेल्या 2019 च्या प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवून शिक्षा सुनावल्यानंतर 24 मार्च रोजी राहुल यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले.

जनतेला वाटते तुम्ही आमची लढाई लढत आहात : संघटनेचे प्रभारी AICC सचिव वामशी चंद रेड्डी यांच्या मते, देशाचा मूड मोदींऐवजी राहुल यांच्या बाजूने होता. रेड्डी म्हणाले की, यात्रेदरम्यान राहुल यांनी सुमारे 51 मतदारसंघ कव्हर केले आणि भाजपला यापैकी फक्त चार जागा जिंकता आल्या, ज्या त्यांच्या पारंपारिक जागा होत्या. त्या तुलनेत पंतप्रधान मोदींनी कर्नाटकात जिथे जिथे प्रचार केला तिथे भाजपला २५ जागांचा पराभव झाला. देशाचा मूड मोदींऐवजी राहुल यांच्या बाजूने असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. श्रीनेत यांनी युक्तिवाद केला की, 'कर्नाटकच्या लोकांनी राहुल यांना संदेश पाठवला आहे की, तुम्ही आमची लढाई लढत आहात म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत. काँग्रेसच्या या दणदणीत विजयाने जनतेने त्या हुकूमशहांना चोख प्रत्युत्तर दिले आहे ज्यांना आपण कोणाचेही लोकसभेचे सदस्यत्व काढून घेऊ शकतो असे वाटते.

जनतेला कोणताही हिजाब, हलाल मुद्दा नको होता : श्रीनाते म्हणाले की, कर्नाटकातील जनतेने नोकऱ्या, शिक्षण या सार्वजनिक प्रश्नांवर राजकीय पक्षांना प्राधान्य दिल्याचा संदेश दिला आहे. ते म्हणाले की, 'मतदारांनी संदेश दिला आहे की त्यांना बजरंग दलाची भगवान बजरंगबलीशी तुलना नको होती. त्यांना कोणताही हिजाब, हलाल मुद्दा नको होता. तसेच, श्रीनेतच्या म्हणण्यानुसार, दक्षिणेकडील राज्यातील मतदारांनी भारत जोडो यात्रेत राहुल यांनी देशभरात 4000 किलोमीटर चालत सर्वसामान्यांना लोकांना त्यांनी मिठी मारली. तसेच, वाटेत त्यांचे अश्रू पुसले देखील राहुल यांनी पुसले आहेत.

श्रीनेत यांच्या देखरेखीखाली कर्नाटकमध्ये आक्रमक मोहिम : ते म्हणाले की, कर्नाटकच्या निकालाने द्वेषाच्या राजकारणावर प्रेमाचे राजकारण जिंकल्याचे दिसून आले आहे. कर्नाटकात प्रेमाचे दुकान उघडले आहे. पण हा फक्त ट्रेलर आहे, पूर्ण चित्र येणे बाकी आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराम (आगामी विधानसभा निवडणुका) आणि 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये अशी आणखी प्रेमाची दुकाने उघडली जातील असही त्या म्हणाल्या आहेत. श्रीनेत यांच्या देखरेखीखाली कर्नाटकमध्ये आक्रमक सोशल मीडिया मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यांनी स्वयंसेवकांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले, असे म्हटले की मुख्य प्रवाहातील माध्यमे सहसा पंतप्रधानांना निवडणुकीतील विजयाचे श्रेय देतात. परंतु, जेव्हा तेच श्रेय राहुलला जाते तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला असही त्या म्हणाल्या आहेत.

हेही वाच :Rahul Gandhi : मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींना हजर राहण्यापासून सूट, 4 जुलै रोजी हायकोर्टात पुन्हा सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details