प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे यात कोणाचेही दुमत नाही; रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया - RAVINDRA CHAVAN ON TAXI DRIVERS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाण (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2026 at 8:41 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : राज्यात रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक यांना मराठी सक्तीचा विषय चर्चेत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीतच बोललं पाहिजे असं आवाहन केलं आहे. याबाबत भारतीय जनता पार्टी या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना विचारलं असता ते म्हणाले, "या विषयावर राजकारण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. मराठी भाषेची गोडी आणि प्रेम एवढं आहे की, प्रत्येकाला मराठी भाषा हवी हवीशी वाटते. प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे यात कोणाचेही दुमत नाही. रवींद्र चव्हाण यांनी 'पुणे बाल पुस्तक जत्रा महोत्सवाला भेट दिली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आदी मान्यवर उपस्थित होते. "महाराष्ट्रासाठी हा एक अत्यंत स्तुत्य आणि आगळावेगळा उपक्रम आहे. मुलांमध्ये वाचनाची सवय बालवयातच लागणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे शाळेत सुंदर अक्षर आणि शुद्धलेखनासाठी शिक्षक आग्रही असतात, त्याचप्रमाणे बाल पुस्तक जत्रेच्या माध्यमातून वाचनाचे संस्कार संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले पाहिजेत," असं यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले.

पुणे : राज्यात रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक यांना मराठी सक्तीचा विषय चर्चेत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीतच बोललं पाहिजे असं आवाहन केलं आहे. याबाबत भारतीय जनता पार्टी या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना विचारलं असता ते म्हणाले, "या विषयावर राजकारण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. मराठी भाषेची गोडी आणि प्रेम एवढं आहे की, प्रत्येकाला मराठी भाषा हवी हवीशी वाटते. प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे यात कोणाचेही दुमत नाही. रवींद्र चव्हाण यांनी 'पुणे बाल पुस्तक जत्रा महोत्सवाला भेट दिली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आदी मान्यवर उपस्थित होते. "महाराष्ट्रासाठी हा एक अत्यंत स्तुत्य आणि आगळावेगळा उपक्रम आहे. मुलांमध्ये वाचनाची सवय बालवयातच लागणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे शाळेत सुंदर अक्षर आणि शुद्धलेखनासाठी शिक्षक आग्रही असतात, त्याचप्रमाणे बाल पुस्तक जत्रेच्या माध्यमातून वाचनाचे संस्कार संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले पाहिजेत," असं यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details