'जे पेरलं तेच उगवलं'; रामदास कदम यांचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना खोचक टोला - RAMDAS KADAM VISIT SHIRDI

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
रामदास आठवले यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : February 16, 2026 at 7:27 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी - गेल्या 54 वर्षांपासून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहे. मधील काळात निवडणुका असल्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येण्यात खंड पडला होता. आज साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. त्यामुळं मनाला खूप समाधान मिळालं, असं शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मालेगाव उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचे तैलचित्र लावण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलताना रामदास कदम म्हणाले की, "हे अत्यंत चुकीचे आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. पुन्हा कोणी अशी हिंमत करणार नाही. अशा प्रकारची कडक कारवाई करण्यात यावी."

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले. त्याप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर दोन कुटुंबं एकत्र येतील. मग मतभेद कशासाठी हवेत? असंही त्यांनी म्हटलं. मात्र, दोन्ही भाऊ एकत्र येऊनही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यश मिळाले नाही. यावर बोलताना. आपण शेतात जे पेरतो तेच उगवते. त्यांनी जे पेरले तेच उगवले, अशी सूचक टिप्पणी कदम यांनी केली.

शिर्डी - गेल्या 54 वर्षांपासून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहे. मधील काळात निवडणुका असल्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येण्यात खंड पडला होता. आज साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. त्यामुळं मनाला खूप समाधान मिळालं, असं शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मालेगाव उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचे तैलचित्र लावण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलताना रामदास कदम म्हणाले की, "हे अत्यंत चुकीचे आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. पुन्हा कोणी अशी हिंमत करणार नाही. अशा प्रकारची कडक कारवाई करण्यात यावी."

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले. त्याप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर दोन कुटुंबं एकत्र येतील. मग मतभेद कशासाठी हवेत? असंही त्यांनी म्हटलं. मात्र, दोन्ही भाऊ एकत्र येऊनही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यश मिळाले नाही. यावर बोलताना. आपण शेतात जे पेरतो तेच उगवते. त्यांनी जे पेरले तेच उगवले, अशी सूचक टिप्पणी कदम यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details