तापमानाचा पारा 44 अंशांवर; राज्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम - HEATWAVE IN MAHARASHTRA

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
प्रतिक्रिया देताना शास्त्रज्ञ एस. डी. सानप (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : April 16, 2026 at 1:22 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला असून पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसच्यावर गेला आहे. विदर्भात पुढील 4 दिवस, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, "गेल्या 24 तासाचा विचार केला तर विदर्भातील अकोला आणि अमरावती येथे कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. विदर्भात पुढील 4 दिवस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर भागात देखील 40 ते 42 अंश तापमानाची नोंद झाली असून राज्यात तापमान हे सरासरीपेक्षा जास्त पाहायला मिळत आहे. तसंच सोशल मीडियावर जी अफवा पसरवली जात आहे त्यात 29 एप्रिल ते 12 मे दरम्यान तापमान 45-50 अंशांपर्यंत जाईल असा मेसेज आहे, ती अफवा आहे. तसंच 18-19 एप्रिलपासून कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागात वादळी पावसाची शक्यता आहे. 19 ते 21 एप्रिल दरम्यान हा पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यातही हजेरी लावेल ज्यामुळं तापमानात घट होईल असं शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितलं.

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला असून पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसच्यावर गेला आहे. विदर्भात पुढील 4 दिवस, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, "गेल्या 24 तासाचा विचार केला तर विदर्भातील अकोला आणि अमरावती येथे कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. विदर्भात पुढील 4 दिवस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर भागात देखील 40 ते 42 अंश तापमानाची नोंद झाली असून राज्यात तापमान हे सरासरीपेक्षा जास्त पाहायला मिळत आहे. तसंच सोशल मीडियावर जी अफवा पसरवली जात आहे त्यात 29 एप्रिल ते 12 मे दरम्यान तापमान 45-50 अंशांपर्यंत जाईल असा मेसेज आहे, ती अफवा आहे. तसंच 18-19 एप्रिलपासून कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागात वादळी पावसाची शक्यता आहे. 19 ते 21 एप्रिल दरम्यान हा पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यातही हजेरी लावेल ज्यामुळं तापमानात घट होईल असं शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

ETV Bharat Marathi’s extensive presence and commitment to showcase the diverse stories and happenings from all 36 districts of Maharashtra, cater to Marathi audience in India and elsewhere. Having a broad presence across the state allows us to capture a wide range of perspectives and experiences, contributing to a more comprehensive understanding of Marathi culture, traditions, and developments. The focus on creativity in storytelling adds depth and engagement to the news it serves and makes it more appealing to the audience....view details