'मुख्यमंत्री व्हायला मोठा जनाधार लागतो; 2029 मध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार' - जयकुमार गोरे यांचा जय पवारांना टोला - JAYKUMAR GORE ON JAY PAWAR

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
प्रतिक्रिया देताना पालकमंत्री जयकुमार गोरे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2026 at 7:29 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सोलापूर : सोलापूर येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जय पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. जय पवार यांनी बारामतीतील जनता दरबारात 2029 मध्ये सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री असतील, असा दावा केला होता. त्यावर गोरे म्हणाले, "मुख्यमंत्री होण्यासाठी मोठा जनाधार, आमदारांची संख्या आणि व्यापक पाठिंबा आवश्यक असतो. 2029 मध्येही देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते जय पवार यांच्या बारामती येथील झालेल्या पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. जनता दरबारानंतर जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी 2029 मध्ये सुनेत्रा पवार या केवळ बारामती मतदारसंघाच्या उमेदवार नसतील, तर त्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असतील, असा मोठा दावा केला होता. जय पवारांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. जय पवार यांच्या राजकीय वक्तव्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री जय कुमार गोरे यांनी गुरुवारी रात्री प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूर : सोलापूर येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जय पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. जय पवार यांनी बारामतीतील जनता दरबारात 2029 मध्ये सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री असतील, असा दावा केला होता. त्यावर गोरे म्हणाले, "मुख्यमंत्री होण्यासाठी मोठा जनाधार, आमदारांची संख्या आणि व्यापक पाठिंबा आवश्यक असतो. 2029 मध्येही देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते जय पवार यांच्या बारामती येथील झालेल्या पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. जनता दरबारानंतर जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी 2029 मध्ये सुनेत्रा पवार या केवळ बारामती मतदारसंघाच्या उमेदवार नसतील, तर त्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असतील, असा मोठा दावा केला होता. जय पवारांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. जय पवार यांच्या राजकीय वक्तव्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री जय कुमार गोरे यांनी गुरुवारी रात्री प्रतिक्रिया दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

ETV Bharat Marathi’s extensive presence and commitment to showcase the diverse stories and happenings from all 36 districts of Maharashtra, cater to Marathi audience in India and elsewhere. Having a broad presence across the state allows us to capture a wide range of perspectives and experiences, contributing to a more comprehensive understanding of Marathi culture, traditions, and developments. The focus on creativity in storytelling adds depth and engagement to the news it serves and makes it more appealing to the audience....view details