रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार; जगबुडी नदी इशारा पातळीवर, ६ जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' - ऑरेंज अलर्ट
🎬 Watch Now: Feature Video

Published : July 4, 2026 at 7:20 PM IST
|Updated : July 4, 2026 at 8:50 PM IST
रत्नागिरी - जिल्ह्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाची संततधार सुरू असून, यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून राजापूर शहराला पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या कोदवली नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून नदीची पातळी 2.85 मीटरच्या वर गेलेली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, असाच पाऊस पुढेही सुरू राहिला, तर राजापूर बाजारपेठेतील मुख्य केंद्र असलेल्या जवाहर चौकात पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे, खेड तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असलेली जगबुडी नदी देखील इशारा पातळीवर पोहोचली आहे. जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी 5.40 मीटर इतकी नोंदवली गेली असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला येत्या 6 जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी - जिल्ह्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाची संततधार सुरू असून, यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून राजापूर शहराला पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या कोदवली नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून नदीची पातळी 2.85 मीटरच्या वर गेलेली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, असाच पाऊस पुढेही सुरू राहिला, तर राजापूर बाजारपेठेतील मुख्य केंद्र असलेल्या जवाहर चौकात पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे, खेड तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असलेली जगबुडी नदी देखील इशारा पातळीवर पोहोचली आहे. जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी 5.40 मीटर इतकी नोंदवली गेली असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला येत्या 6 जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन करण्यात आले आहे.


