भारतानं तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये क्रिकेटप्रेमींचा जल्लोष, पाहा व्हिडिओ - T20 WORLD CUP 2026
🎬 Watch Now: Feature Video

Published : March 9, 2026 at 10:11 AM IST
मुंबई - अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. या विजयानंतर भारत हा टी-20 विश्वचषकातील सर्वात मजबूत संघ असल्याचं सिद्ध झालं. अंतिम सामन्यात भारतानं दणदणीत विजय मिळविल्यानंतर संपूर्ण देशात क्रिकेटप्रेमींचा उत्साह आणि आनंद दिसून आला. अंतिम सामना संपताच मुंबईच्या विविध भागात क्रिकेट चाहत्यांनी भव्य जल्लोष केला. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केल्यानंतर दादर येथील शिवाजी पार्कमध्ये चाहत्यांनी मोठ्या संख्येनं जमून आनंद साजरा केला. ढोल वाजवित, तिरंगा फडकावत, घोषणा देत त्यांनी भारत मातेचा जयजयकार केला. ढोल-ताशे वाजत अनेक क्रिकेटप्रेमींना नाचून जल्लोष साजरा केला.
मुंबई - अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. या विजयानंतर भारत हा टी-20 विश्वचषकातील सर्वात मजबूत संघ असल्याचं सिद्ध झालं. अंतिम सामन्यात भारतानं दणदणीत विजय मिळविल्यानंतर संपूर्ण देशात क्रिकेटप्रेमींचा उत्साह आणि आनंद दिसून आला. अंतिम सामना संपताच मुंबईच्या विविध भागात क्रिकेट चाहत्यांनी भव्य जल्लोष केला. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केल्यानंतर दादर येथील शिवाजी पार्कमध्ये चाहत्यांनी मोठ्या संख्येनं जमून आनंद साजरा केला. ढोल वाजवित, तिरंगा फडकावत, घोषणा देत त्यांनी भारत मातेचा जयजयकार केला. ढोल-ताशे वाजत अनेक क्रिकेटप्रेमींना नाचून जल्लोष साजरा केला.

