मोदी सरकारनं युजरनेम वैशिष्ट्याबात टेलिग्राम आणि सिग्नलला का पाठवली नोटिसा?
केंद्र सरकारनं टेलिग्राम आणि सिग्नलला युजरनेम वैशिष्ट्याबाबत नोटिसा पाठवल्या आहेत.

Published : July 4, 2026 at 10:29 AM IST
मुंबई : व्हॉट्सअॅपनंतर केंद्र सरकारनं आता टेलिग्राम आणि सिग्नल या मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सना देखील नोटिसा (Government notice to Telegram) पाठवल्या आहेत. युजरनेम वैशिष्ट्यामुळं (username feature) फसवणूक, फिशिंग, बनावट ओळख आणि डिजिटल अरेस्ट सारख्या घोटाळ्यांत वाढ होण्याची शक्यता असल्यानं सरकारनं या वैशिष्ट्याबाबत कडक भूमिका घेतली आहे.
प्लॅटफॉर्म्सकडून मागितलं स्पष्टीकरण : मेटाच्या व्हॉट्सअॅपला युजरनेम वैशिष्ट्य (WhatsApp username feature ) सुरू करण्यासंबंधी नोटीस पाठवल्यानंतर आता केंद्र सरकारनं टेलिग्राम आणि सिग्नलला देखील नोटिसा जारी केल्या आहेत. या प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या विद्यमान युजरनेम वैशिष्ट्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्रामला तर ‘हे फीचर का चालू ठेवावं?’ असा प्रश्नच सरकारनं विचारला आहे.
युजरनेम वैशिष्ट्यामुळं वापरकर्ते आपला फोन नंबर शेअर न करता इतरांशी संपर्क साधू शकतात. मात्र सरकारचा विश्वास आहे की, हे वैशिष्ट्य खोट्या खात्यांना प्रोत्साहन देऊन फसवणूक, फिशिंग, बनावट व्यक्तींच्या नावानं संपर्क आणि डिजिटल अरेस्ट घोटाळे वाढवू शकतं. व्हॉट्सअॅपनं नुकतेच हे वैशिष्ट्य जाहीर केलं होतं, त्यानंतर सरकारनं तातडीनं कारवाई केली. टेलिग्राममध्ये हे फीचर आधीपासून उपलब्ध आहे. सरकारनं या प्लॅटफॉर्मला फसवणूक आणि बनावट ओळख रोखण्यासाठी कोणते उपाययोजना केल्या आहेत याबाबत माहिती मागितली आहे. सिग्नललाही समान प्रश्न विचारण्यात आले आहेत. टेलिग्राम आणि सिग्नलकडून अद्याप यासंबंधी कोणतेही उत्तर मिळालेले नाही. दरम्यान, भारतीय कंपनी झोहोची Arattai ही मेसेजिंग अॅप युजरनेम-आधारित खातं वैशिष्ट्य बंद करण्याचा निर्णय घेत आहे. कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी X वर याची माहिती दिली. हे नियामक बदलांचं पालन करण्यासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारी सूत्रांनी सांगितलं की, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम प्रकरणे समान पण वेगळी आहेत. भारत व्हॉट्सअॅपचा सर्वात मोठा बाजार आहे, जिथे 50 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. टेलिग्रामचा वापर यापेक्षा कमी आहे. व्हॉट्सअॅपनं आपल्या वैशिष्ट्यात फसवणूक रोखण्यासाठी अनेक सुरक्षा उपाय असल्याचं सांगितलं होतं. मात्र सरकार IT कायदा आणि नियमांनुसार दक्षता पाळण्याची आठवण करून दिली आहे. गेल्या काही महिन्यांत टेलिग्रामवर फसवणूक, बनावट सामग्री आणि संवेदनशील माहिती प्रसारित करण्याच्या आरोपात सरकारनं आधीच एक आठवड्याचा बंदी आदेश दिला होता. NEET परीक्षेशी संबंधित गैरप्रकारांमुळं ही कारवाई करण्यात आली होती.
हे वाचलंत का :

