ETV Bharat / sports

चेस्टर-ली-स्ट्रीटच्या मैदानावर भारताचा तिसरा सामना रद्द; पहिला डाव झाल्यानंतरच सामना संपला!

चेस्टर-ली-स्ट्रीट इथं खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेतील पहिला सामना सुरु झाला, पण पावसामुळं निकाल लागू शकला नाही.

IND vs ENG 1st T20I
चेस्टर-ली-स्ट्रीटच्या मैदानावर भारताचा तिसरा सामना रद्द (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : July 2, 2026 at 9:19 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

चेस्टर-ली-स्ट्रीट IND vs ENG 1st T20I : आयर्लंडकडून 2-0 असा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आपल्या पहिल्या विजयाच्या तयारीत होता. पण पावसामुळं हा सामना रद्द करावा लागला. चेस्टर-ली-स्ट्रीट इथं खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेतील पहिला सामना सुरु झाला, पण पावसामुळं निकाल लागू शकला नाही. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 190 धावांचं लक्ष्य ठेवलं. इंग्लंडला पाठलाग करण्याची संधी मिळण्यापूर्वीच पाऊस सुरु झाला, ज्यामुळं सामना रद्द करावा लागला.

पावसामुळं सामना रद्द : भारताच्या डावाच्या शेवटच्या काही षटकांमध्ये हवामान बिघडलं आणि पाऊस सुरु झाला. पहिला डाव पूर्ण झाला, पण इंग्लंड फलंदाजी करण्यापूर्वीच पावसाचा जोर वाढला. जवळपास एक तास वाट पाहिल्यानंतर, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना अखेर रद्द करण्यात आला. पाऊस इतका जोरदार होता की इंग्लंडचा डाव सुरु होऊ शकला नाही. अखेरीस, सामनाधिकाऱ्यांनी सामना पुढं चालू ठेवता येणार नाही असा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी ड्रेसिंग रुममध्ये हस्तांदोलन केलं.

चेस्टर-ली-स्ट्रीट इथं भारताचा अनोखा योगायोग : भारतानं आतापर्यंत या मैदानावर तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामने पावसामुळं अनिर्णित राहिले. पहिला सामना 2002 मध्ये इंग्लंडविरुद्धचा वनडे सामना होता, जो रद्द झाला. त्यानंतर 2011 मध्ये त्याच मैदानावर खेळला गेलेला वनडे सामनाही पावसामुळं रद्द झाला. आता, 2026 मध्ये टीम इंडियाचा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला, जो देखील पावसामुळं रद्द झाला.

अभिषेक शर्माची वादळी खेळी : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजीचं कौशल्य दिसून आले. संजू सॅमसन आणि इशान किशन एकूण 6 धावांवर बाद झाल्यानंतर, अभिषेक शर्मानं सूत्रं हाती घेतली आणि 6 चौकार व 4 षटकारांच्या मदतीनं 59 धावा केल्या. त्यानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरनं 47 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 1 षटकारासह 68 धावांची खेळी केली. अखेरीस, शिवम दुबेनं 21 चेंडूंमध्ये 42 धावा करुन शानदार शेवट घडवला आणि धावसंख्या 189 पर्यंत पोहोचवली. खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत असल्यामुळं हे लक्ष्य इंग्लंडसाठी आव्हानात्मक ठरणारं होतं.

हेही वाचा :

  1. आयर्लंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर भारतीय संघ पुढची मालिका कोणाविरुद्ध खेळणार? वैभवला संधी मिळणार?
  2. TG20 लीग : हैदराबाद ई-चॅम्पियन्सची प्ले-ऑफमध्ये धडक; अभिरथ रेड्डीचं वादळी शतक, वारंगल वॉरियर्सचा धुव्वा
  3. FIFA विश्वचषकात 'राऊंड ऑफ 32' मध्ये सहा संघ उतरणार मैदानात; 5 वेळच्या विजेत्या ब्राझीलसमोर जपानचं आव्हान