श्रीलंकेवर भारताचा एकहाती विजय; भारतीय संघाची फायनलमध्ये धडक
थायलंडमधील बँकॉक इथं सुरु असलेल्या महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे.

Published : February 20, 2026 at 12:19 PM IST
बँकॉक Asia Cup Rising Stars : थायलंडमधील बँकॉक इथं सुरु असलेल्या महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. भारतीय संघ आता अंतिम फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियाचा सामना सेमीफायनलमध्ये श्रीलंकेच्या महिला संघाशी झाला होता, जिथं त्यांनी सामना सहज जिंकला. टीम इंडियाच्या विजयात त्यांच्या गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजीसोबतच टीम इंडियानं फलंदाजीतील कौशल्य दाखवत श्रीलंकेचा 5 विकेट्सनं पराभव केला.
𝐅𝐥𝐚𝐰𝐥𝐞𝐬𝐬 𝐚𝐥𝐥 𝐭𝐨𝐮𝐫𝐧𝐚𝐦𝐞𝐧𝐭 ⭐
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) February 20, 2026
Now, one last job to finish 🏆#DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 #ACC pic.twitter.com/YLMacxPMAr
कसा झाला सामना : भारत महिला अ आणि श्रीलंका महिला अ यांच्यात झालेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाणेफेक गमावल्यानं भारतीय संघावर कोणताही परिणाम झाला नाही. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियानं श्रीलंकेला 19.4 षटकांत 118 धावांवर गुंडाळलं. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या कर्णधाराचा प्रथम फलंदाजीचा निर्णय पूर्णपणे चुकीचा सिद्ध केला. या सामन्यात टीम इंडियानं पहिल्या डावातच आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
A complete all-round performance powers India into the Grand Finale of the #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇮🇳#INDWvSLW #ACC pic.twitter.com/5dY0r30MlD
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) February 20, 2026
राधा यादवची गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी : टीम इंडियाची कर्णधार राधा यादवनं गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी केली. तिनं 3.4 षटकांत फक्त 19 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले. राधा यादव ही भारतीय वरिष्ठ महिला संघाचा भाग आहे. तनुजा कंवर आणि प्रेरणा रावत यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर मिनू मणी आणि साईमा ठाकोर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाला स्थिरावू दिलं नाही. संचना कविंदीनं त्यांच्याकडून सर्वाधिक 31 धावा केल्या.
Finals bound! 🇮🇳
— BCCI Women (@BCCIWomen) February 20, 2026
India A punch their ticket to the final with a clinical 5-wicket victory over Sri Lanka A! #WomensRisingStarsAsiaCup pic.twitter.com/NvlxFTMq7b
भारतीय संघाचा एकहाती विजय : 119 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय महिला संघानं दमदार सुरुवात केली, परंतु टीम इंडियानं त्यांचा पहिला बळी अवघ्या 30 धावांवर गमावला. त्यानंतर, वृंदा दिनेश आणि अनुष्का शर्मा यांनी 24 चेंडूत 47 धावांची भागीदारी केली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी ही भागीदारी मोडली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या डावात भारताकडून वृंदा दिनेशनं सर्वाधिक धावा केल्या. तिनं 20 चेंडूत 42 धावा केल्या आणि टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेचा अंतिम सामना 22 फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडिया पाकिस्तान किंवा बांगलादेशशी सामना करु शकते. या दोघांमधील सेमीफायनल सामना अजून खेळायचा आहे.
हेही वाचा :

