...तर उपांत्य फेरीचा सामना दुपारी सुरु होणार; ICC चा नियम काय?
गतविजेता भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे ट्रॉफीच्या शर्यतीत आहेत. सर्व नॉकआउट सामने आता भारतात खेळवले जातील.

Published : March 2, 2026 at 4:56 PM IST
मुंबई T20 World Cup 2026 : 2026 चा टी-20 विश्वचषक आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. चार आठवड्यांच्या रोमांचक क्रिकेटनंतर, अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. गतविजेता भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे ट्रॉफीच्या शर्यतीत आहेत. सर्व नॉकआउट सामने आता भारतात खेळवले जातील. पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. त्यानंतर भारत आणि इंग्लंड दुसऱ्या उपांत्य सामन्यात एकमेकांसमोर येतील. या दोन्ही सामन्यांमधील विजेते अंतिम फेरीत भेटतील.
𝐀𝐧𝐝 𝐭𝐡𝐞𝐧 𝐭𝐡𝐞𝐫𝐞 𝐰𝐞𝐫𝐞 𝐟𝐨𝐮𝐫 🤩
— ICC (@ICC) March 1, 2026
The #T20WorldCup 2026 semi-finals are locked 🔒
More details➡️ https://t.co/0UKXfuke7c pic.twitter.com/IxJeZvr5M3
सेमीफायनलसाठी आयसीसीचे विशेष नियम : दोन्ही उपांत्य सामन्यांसाठी राखीव दिवस निश्चित करण्यात आला आहे. हवामान लक्षात घेऊन आयसीसीनं हे नियम स्थापित केले आहेत. सामना नियोजित दिवशी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, परंतु आवश्यक असल्यास षटक कमी केले जाऊ शकतात. राखीव दिवसाचा वापर कमीत कमी करण्यासाठी आयसीसीनं सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे. अतिरिक्त वेळ नियोजित दिवशी 90 मिनिटं आणि राखीव दिवशी 120 मिनिटं असेल. मात्र, निकालासाठी दोन्ही संघांना किमान 10 षटकं फलंदाजी करावी लागेल. जर सामना राखीव दिवशी हलवला गेला तर पहिल्या दिवशी जिथं थांबवण्यात आला होता त्याच ठिकाणावरुन खेळ पुन्हा सुरू होईल. उपांत्य फेरीचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता खेळवले जातील. मात्र, जर सामना राखीव दिवशी हलवला गेला तर वेळ बदलली जाईल. खरं तर, राखीव दिवशी दुपारी 3:00 वाजता सामना सुरु होईल.
...and then there were FOUR! 😍
— Star Sports (@StarSportsIndia) March 2, 2026
Super 8s ✅
It's time for the knock-outs ⏳#T20WorldCup #INDvENG #SAvNZ pic.twitter.com/6XGNZ2JoaI
राखीव दिवशी सामना कुठून सुरु होईल? : जर सामना राखीव दिवशी हलवला गेला तर दोन परिस्थिती उद्भवू शकतात. जर सामना नियोजित दिवशी सुरु झाला तर तो थांबलेल्या धावसंख्येवरुन सुरु राहील. जर सामन्याच्या दिवशी षटक कमी केले गेले तर राखीव दिवशी समान षटक लागू होतील. दुसऱ्या परिस्थितीत, जर सामना नियोजित दिवशी कमी केलेल्या षटकांनी सुरु झाला नाही किंवा अजिबात सुरु होऊ शकला नाही, तर सामना राखीव दिवशी 20-20 षटकांच्या स्वरुपात खेळवला जाईल. जर राखीव दिवस वापरला गेला आणि तरीही निकाल लागला नाही, तर गट स्थानानुसार पुढं जाणाऱ्या संघाचा निर्णय घेतला जाईल.
भारत आणि इंग्लंड सलग तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक सेमीफायनलमध्ये आमनेसामने : भारत आणि इंग्लंड सलग तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी 2022 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला उपांत्य सामना झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव झाला होता. त्यानंतर 2024 च्या टी-20 विश्वचषकातही भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने आले होते, त्यानंतर भारतानं इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आणि विश्वचषक विजेतेपद जिंकण्यातही यश मिळवलं.
हेही वाचा :

