ETV Bharat / sports

भारतीय तिरंदाजीचे प्रणेते श्याम लाल मीना यांचं निधन; देशाच्या पहिल्या ऑलिम्पिक तिरंदाजी संघाचे होते सदस्य

भारतीय तिरंदाजीचे प्रणेते श्याम लाल मीना यांचं प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या 61व्या वर्षी निधन झालं. रविवारी (२४ मे) रात्री रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Shyam Lal Meena Passes Away
भारतीय तिरंदाजीचे प्रणेते श्याम लाल मीना यांचं निधन (Shyam Lal Meena X)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : May 27, 2026 at 10:42 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

Shyam Lal Meena Passes Away : भारतीय तिरंदाजीचे प्रणेते श्याम लाल मीना यांचं प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या 61व्या वर्षी निधन झालं. रविवारी (२४ मे) रात्री रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्याम लाल मीना गेल्या काही वर्षांपासून यकृताच्या समस्येनं त्रस्त होतं. त्यांच्या निधनानं भारतीय तिरंदाजीच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा अंत झाला आहे.

श्याम लाल मीना यांना श्रद्धांजली : भारतीय तिरंदाजी संघटनेनं या माजी तिरंदाजाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, "1988 च्या सेऊल ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते दिवंगत श्याम लाल मीना यांना श्रद्धांजली. भारतीय तिरंदाजीतील त्यांचं योगदान आणि वारसा नेहमीच आदरानं स्मरणात राहील."

1987 मध्ये जिंकलं कांस्य पदक : 4 मार्च 1965 रोजी राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील केवडिया गावात जन्मलेल्या मीना यांनी सामान्य परिस्थितीतून पुढं येत जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं. ते लिंबा राम आणि रजत हळदर यांच्यासह भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाचा भाग होते, ज्या संघानं कोलकाता इथं 1987 च्या आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.

1988 ऑलिम्पिकसाठी पात्रता : हे पदक भारतीय तिरंदाजीचं पहिलं मोठं आंतरराष्ट्रीय यश मानलं जातं आणि यामुळं संघ 1988 च्या सेऊल ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला, जो ऑलिम्पिक तिरंदाजीमधील देशाचा पहिला सहभाग होता. भारतीय क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल मीना यांना 1989 मध्ये अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

तिरंदाजी प्रशिक्षक म्हणूनही कार्य : स्पर्धात्मक कारकिर्दीनंतरही, मीना बांसवाडा येथील जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात तिरंदाजी प्रशिक्षक म्हणून या खेळात खोलवर गुंतलेले राहिले. त्यांनी आपली सेवानिवृत्तीनंतरची वर्षे तरुण तिरंदाजांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि राजस्थानमधील तळागाळातील प्रतिभा विकसित करण्यासाठी समर्पित केली. राजस्थानमधील एका छोट्या गावातून भारतीय तिरंदाजीच्या संस्थापक पित्यांपैकी एक बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खेळाडूंच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे.

हेही वाचा :

  1. Norway Chess: मराठमोळ्या दिव्याची विजयी 'चाल', आर्मागेडॉनमध्ये हम्पीचा पराभव; गुकेश-प्रज्ञानंदाची मात्र निराशा
  2. Singapore Open: पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात; सात्विक-चिराग जोडीलाही पहिल्या फेरीत यश
  3. 'ऑरेंज आर्मी' विजयी परंपरा कायम राखणार? 2023 पासून राजस्थानची विजयाची पाटी कोरी