Super-8 मधील भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळं रद्द होणार? अहमदाबादमधून आली मोठी अपडेट
टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 फेरीत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत.

Published : February 22, 2026 at 1:05 PM IST
अहमदाबाद IND vs SA Match : 2026 च्या टी-20 विश्वचषकाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघासारखे अपराजित संघ रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील. क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना अत्यंत रोमांचक ठरणार आहे.
Super 8 DOUBLE HEADER action coming your way 😍
— ICC (@ICC) February 22, 2026
Your #T20WorldCup broadcast details 👉 https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/0cCdtzb8dg
या सामन्यात हवामान कसं असेल : टीम इंडियानं आतापर्यंतचे सर्व सामने प्रभावी निकालांसह जिंकले आहेत, अगदी पाकिस्तानसारख्या संघालाही सहज पराभूत केलं आहे. परंतु यावेळी दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघासमोर हा सामना रोमांचक होणार आहे. शनिवारचा पहिला सुपर-8 सामना (पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड) पावसामुळं रद्द करण्यात आला. मात्र, आजचा सामना भारतात खेळवला जाईल आणि चांगली बातमी अशी आहे की पावसाची शक्यता नाही.
It’s Super 8️⃣ Sunday! 🔥
— Star Sports (@StarSportsIndia) February 22, 2026
Start with a win & take a big step toward the semi-finals! 💪
Who will emerge victorious today? ✍️
ICC Men’s #T20WorldCup | #SLvENG #INDvSA pic.twitter.com/kgQWvaoBMn
अहमदाबादमधील हवामान कसं असेल : भारतीय हवामान खात्यानुसार, गुजरात प्रदेश, सौराष्ट्र-कच्छ, दीव, दमण आणि दादरा-नगर हवेली इथं कोरडं हवामान अपेक्षित आहे. आज अहमदाबादमध्ये आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. येथील तापमान सध्या 23 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवलं गेलं आहे, ज्यामध्ये 21 ते 31 अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज आहे. स्वच्छ हवामानामुळं सामना व्यत्यय येण्याची शक्यता खूपच कमी आहे, ज्यामुळं प्रेक्षकांना सामन्याचा थरार पूर्णपणे अनुभवता येईल.
खेळपट्टी कशी असेल : खेळपट्टीबाबत बोलायचं झालं तर, नरेंद्र मोदी स्टेडियम फलंदाजांसाठी चांगलं मानलं जातं. सुरुवातीला ते गोलंदाजांना अनुकूल असते, परंतु जसजसे वेळ जातो तसतसं ते मंदावते, ज्यामुळं फलंदाजांना फायदा होतो. याच मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील एक रोमांचक डबल सुपर ओव्हर सामना आधीच खेळला गेला आहे.
𝐑𝐮𝐧𝐬 𝐰𝐢𝐥𝐥 𝐟𝐥𝐲. 𝐒𝐭𝐮𝐦𝐩𝐬 𝐰𝐢𝐥𝐥 𝐫𝐚𝐭𝐭𝐥𝐞. 𝐇𝐞𝐚𝐫𝐭𝐬 𝐰𝐢𝐥𝐥 𝐫𝐚𝐜𝐞.
— Star Sports (@StarSportsIndia) February 22, 2026
Ahmedabad, buckle up - these two powerhouses are set for an all-out showdown! 🥵
ICC Men’s #T20WorldCup SUPER 8 👉 #INDvSA | SUN, 22 FEB, 6 PM pic.twitter.com/ReMppQ99yX
रद्द झालेल्या सामन्यासाठी किती गुण दिले जातील? : जर सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. कोणत्याही संघाला विजयाचा फायदा मिळणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशा सामन्याचा नेट रन रेटवर कोणताही परिणाम होणार नाही. याचा अर्थ पॉइंट टेबलमध्ये फक्त एक पॉइंट जोडला जाईल, परंतु विजयासाठी कोणालाही दोन पॉइंट मिळणार नाहीत.
प्रत्येक संघाला तीन संधी मिळतील : सुपर-8 मध्ये, प्रत्येक संघाला तीन सामने खेळावे लागतील. प्रत्येक सामना दोन गुणांचा आहे. त्यामुळं, जर पावसामुळं सामना रद्द झाला तर तो संघांसाठी मोठा तोटा ठरु शकतो. विशेषतः ज्या संघांना नेट रन रेटच्या आधारे उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहायचं आहे त्यांच्यासाठी. विजयामुळं दोन गुण मिळतात, तर रद्द झालेल्या सामन्यामुळं फक्त एक गुण मिळतो. या स्पर्धेत पावसानं आधीच भूमिका बजावली आहे. झिम्बाब्वे आणि आयर्लंडमधील सामना रद्द करण्यात आला, ज्यामुळं दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आणि त्यांच्या क्रमवारीवर परिणाम झाला.
हेही वाचा :

