टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कोणाशी भिडणार; कधी होणार सामना?
आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियानं आपलं स्थान निश्चित केलं आहे. सेमीफायनलमध्ये भारत कोणाशी सामना करणार हे देखील निश्चित झालं आहे.

Published : March 2, 2026 at 9:31 AM IST
कोलकाता IND vs ENG Semifinal : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियानं आपलं स्थान निश्चित केलं आहे. सेमीफायनलमध्ये भारत कोणाशी सामना करणार हे देखील निश्चित झालं आहे. तारीख आणि वेळ देखील निश्चित झाली आहे. आता टी-20 विश्वचषक 2026 मध्ये दोन दिवस कोणतेही सामने होणार नाहीत. यानंतर, स्पर्धेचा पुढील टप्पा सुरु होईल, ज्यामध्ये दोन उपांत्य फेरी आणि नंतर अंतिम सामना असेल.
𝐀𝐧𝐝 𝐭𝐡𝐞𝐧 𝐭𝐡𝐞𝐫𝐞 𝐰𝐞𝐫𝐞 𝐟𝐨𝐮𝐫 🤩
— ICC (@ICC) March 1, 2026
The #T20WorldCup 2026 semi-finals are locked 🔒
More details➡️ https://t.co/0UKXfuke7c pic.twitter.com/IxJeZvr5M3
उपांत्य फेरीसाठी चार संघांची नावं निश्चित : टी-20 विश्वचषक 2026 चा दुसरा टप्पा, म्हणजेच सुपर-8 सामने संपले आहेत. आता फक्त तीन सामने शिल्लक आहेत. दोन उपांत्य फेरीचे सामने खेळले जातील, त्यानंतर अंतिम सामना, म्हणजेच जेतेपद सामना. दरम्यान, चार उपांत्य फेरीतील संघांची नावं देखील निश्चित झाली आहेत. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडनंतर, टीम इंडिया देखील सेमीफायनलसाठी निश्चित झाली आहे.
India seal the #T20WorldCup 2026 semi-final spot with an emphatic victory over West Indies 👏
— ICC (@ICC) March 1, 2026
📝: https://t.co/NqHEWKEn3o pic.twitter.com/65lPlOmjkm
पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमनेसामने : पहिला सेमीफायनल सामना 4 मार्च रोजी खेळला जाईल. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना खेळला जाईल. यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल, तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. तर दुसरा सेमीफायनल भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. अंतिम सामना, म्हणजेच जेतेपदाचा सामना 8 मार्च रोजी खेळला जाईल. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
India are through to the #T20WorldCup semi-finals ✨ pic.twitter.com/431RyYOLqw
— ICC (@ICC) March 1, 2026
भारत आणि इंग्लंड सलग तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक सेमीफायनलमध्ये आमनेसामने : भारत आणि इंग्लंड सलग तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी 2022 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला उपांत्य सामना झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव झाला होता. त्यानंतर 2024 च्या टी-20 विश्वचषकातही भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने आले होते, त्यानंतर भारतानं इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आणि विश्वचषक विजेतेपद जिंकण्यातही यश मिळवलं.
हेही वाचा :

