भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी सुपर-8 फेरीत किती सामने जिंकावे लागतील? काय आहे समीकरण
भारतीय क्रिकेट संघानं आयसीसी टी-20 विश्वचषकात शानदार कामगिरी करत सुपर-8 मध्ये स्थान मिळवलं आहे.

Published : February 21, 2026 at 12:42 PM IST
अहमदाबाद Team India in Semifinal : भारतीय क्रिकेट संघानं आयसीसी टी-20 विश्वचषकात शानदार कामगिरी करत सुपर-8 मध्ये स्थान मिळवलं आहे. आता, संघाकडे आणखी तीन सामने आहेत, जे जिंकून सूर्यकुमार यादव आपला अजिंक्य रथ उपांत्य फेरीत नेण्याचा प्रयत्न करेल. मात्र, हे सोपं नसेल. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजशी सामना करेल. तिन्ही संघ मजबूत आहेत आणि ही एक निकराची लढत असेल. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी संघाला किती सामने जिंकावे लागतील याबद्दल चाहत्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल.
It's game on! 💪 Eight teams chasing one trophy at the 2026 #T20WorldCup 🏆
— ICC (@ICC) February 21, 2026
Don't miss it. Broadcast details here 👉 https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/lbg18Y2fSg
टी-20 विश्वचषकात भारताची कामगिरी : भारतानं आतापर्यंत आयसीसी टी-20 विश्वचषकात अपवादात्मक कामगिरी केली आहे. गट टप्प्यात एकही सामना न गमावता संघ सुपर-8 मध्ये पोहोचला आहे. भारतानं यूएसएविरुद्ध 29 धावांनी विजय मिळवला, त्यानंतर नामिबियाविरुद्ध 93 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शेवटच्या गट सामन्यात त्यांनी नेदरलँड्सचा 17 धावांनी पराभव केला.
सुपर-8 मध्ये भारत कोणत्या संघांचा सामना करेल?
- रविवार, 22 फेब्रुवारी - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद), संध्याकाळी 7 वाजता
- गुरुवार, 26 फेब्रुवारी - भारत विरुद्ध झिम्बाब्वे, एमए चिदंबरम स्टेडियम (चेन्नई), संध्याकाळी 7 वाजता
- रविवार, 1 मार्च - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, ईडन गार्डन्स (कोलकाता), संध्याकाळी 7 वाजता
Group Stage ✅
— Star Sports (@StarSportsIndia) February 20, 2026
Up Next ▶️ Super 8s ⏳
What was your favourite moment from the group stage? 👀
ICC Men's #T20WorldCup SUPER 8 👉 #NZvPAK | SAT, 21 FEB, 6 PM pic.twitter.com/YpdsDmi8KU
उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी किती सामने जिंकावे लागतील? : टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 साठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला 20 संघांचे चार गट तयार करण्यात आले होते, प्रत्येक गटात पाच संघ होते. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-8 मध्ये पोहोचले. जर टीम इंडियानं या फेरीतील तीनपैकी तीन सामने जिंकले तर ते थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. भारत तीनपैकी दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, परंतु हे गटातील उर्वरित संघांच्या नेट रन रेटवरुन निश्चित केलं जाईल. अंतिम चारमध्ये प्रवेश करण्यासाठी, प्रत्येक संघाला किमान दोन सामने जिंकावे लागतील.
नेट रन रेट हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरेल : भारतीय संघानं आतापर्यंत तिन्ही सामने जिंकले आहेत आणि या गटात त्यांचा सर्वोत्तम नेट रन रेट आहे. भारताचा नेट रन रेट 2.5 च्या वर आहे, तर दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दोनपेक्षा कमी गुणांनी मागे आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर टीम इंडिया सुपर-8 मध्ये दोन सामने जिंकली तर त्यांना चार गुण मिळतील. सूर्यकुमार यादवच्या संघाला भारताइतकेच गुण असलेल्या संघावर नेट रन रेटचा फायदा कायम ठेवावा लागेल. त्यानंतरच ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरु शकतील.
हेही वाचा :

