"पाच कोटी रुपये देण्यास नकार दिल्यानं..."; ममतांवर गंभीर आरोप करत माजी दिग्गज क्रिकेटपटूनं सोडली TMC
माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीनं मंगळवारी तृणमूल काँग्रेससोबतचे संबंध तोडले. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या दारुण पराभवानंतर अवघ्या एका दिवसात त्यानं पक्षावर गंभीर आरोप केले.

Published : May 6, 2026 at 12:09 PM IST
कोलकाता Manoj Tiwary Quits TMC : माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीनं मंगळवारी तृणमूल काँग्रेससोबतचे संबंध तोडले. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या दारुण पराभवानंतर अवघ्या एका दिवसात, तिवारीनं आरोप केला की, पाच कोटी रुपये देण्यास नकार दिल्यामुळं पक्षानं त्यांना हावडा येथील शिबपूर मतदारसंघातून तिकीट नाकारलं. विशेष म्हणजे मनोज तिवारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये क्रीडा राज्यमंत्री होता.
He is Manoj Tiwary, An Ex Cricketer and Ex MLA of TMC!!
— Rohit (@Iam_Rohit_G) May 5, 2026
He Joined TMC and Fought Elections from Shibpur in 2021.
He won from Shibpur and became Minister in TMC Govt.
He remained silent on TMCs Atrocities, Scams and Dictatorship.
Today, Manoj Tiwary comes on the Media and says… pic.twitter.com/mfvIKlr63c
काय म्हणाला मनोज तिवारी : पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा करताना वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना तिवारी म्हणाला, "केवळ ज्यांना मोठी रक्कम देणं परवडत होतं, त्यांनाच तिकीट मिळवता आले. यावेळी, किमान 70 ते 72 उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये दिले. माझ्याकडेही पैशांची मागणी करण्यात आली होती, पण मी नकार दिला. ज्यांनी पैसे दिले, त्यांच्यापैकी किती जण निवडणूक जिंकले ते पाहा. जिथेपर्यंत तृणमूलचा संबंध आहे, तो अध्याय आता माझ्यासाठी पूर्णपणे संपला आहे."
जबरदस्तीनं राजकारणात आणलं : पुढं बोलताना तिवारी म्हणाला की, 2019 मध्ये तृणमूलनं त्याला लोकसभेचं तिकीट देऊ केलं असलं तरी, राजकारणात येण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता. अखेरीस त्यानं 2021 च्या विधानसभा निवडणुकीत शिबपूरमधून निवडणूक लढवली आणि तो जिंकला. तो म्हणाला, "त्यावेळी मी आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळत होतो आणि रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास गंभीर होतो, तेव्हा दीदी (ममता बॅनर्जी) यांनी मला लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितलं. मी नम्रपणे नकार दिला, पण 2021 च्या निवडणुकीपूर्वी दीदींनी मला पुन्हा बोलावलं आणि म्हणाल्या, 'मनोज, माझ्याकडे तुझ्यासाठी एक संदेश आहे आणि अरुप तो तुला देईल.' मला शिबपूरमधून निवडणूक लढवण्यास सांगितलं गेलं आणि मला वाटलं की मी काहीतरी अर्थपूर्ण बदल घडवून आणू शकेन."
BIG : मनोज तिवारी ने TMC छोड़ दी है.
— Kamalraj Singh (@kamalrajsingh_) May 5, 2026
Manoj Tiwary कह रहा है कि टिकट के बदले 5 करोड़ रुपए TMC ने मांगे थे
ये कुछ भी बोले लेकिन सच यही है कल तक ये खुद Mamata Banerjee के डर से या सत्ता के लालच मे चुप बैठे थे
Article 164 #MamataBanerjee #electionresult2026 #bengalpolls2026 pic.twitter.com/BKcP0753Hl
पक्षावर गंभीर आरोप : मनोज तिवारीनं असा आरोप केला की, तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाहीचा अभाव आहे. तो म्हणाला, "मी अशा बैठकांना उपस्थित राहिलो आहे जिथं तृणमूलच्या सर्व मंत्र्यांना आमंत्रित केलं होतं. मला राज्यमंत्र्यांच्या नावाखाली केवळ एक 'लॉलीपॉप' दिला गेला, ज्याला काहीच अर्थ नव्हता. जर मी उभा राहून म्हणालो, 'दीदी, मला तुमचं लक्ष एका विशिष्ट समस्येकडे वेधायचं आहे,' तर त्या आम्हाला मध्येच थांबवून म्हणायच्या, माझ्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही." त्याच्या वारंवारच्या प्रयत्नांनंतरही हावडा जिल्ह्यातील खराब सांडपाणी आणि गटार व्यवस्थेची गंभीर समस्या कधीच सुटली नसल्याचंही त्यानं सांगितलं. "विद्यमान आमदार म्हणून मी माझ्या मतदारसंघात गटारांची कामे करून घेण्यासाठी सर्वत्र फिरलो, पण ज्या लोकांनी वर्षानुवर्षे हावडा नगरपालिकेवर नियंत्रण ठेवले होते आणि निवडणुका होऊ दिल्या नाहीत, त्यांनी कधीच पर्वा केली नाही," असंही तिवारी म्हणाला.
मनोज तिवारीची क्रिकेट कारकीर्द : मनोज तिवारीनं 148 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये 47.86 च्या सरासरीनं 10,195 धावा केल्या, ज्यात 30 शतकांचा समावेश आहे. तसंच 169 लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्यानं 42.28 च्या सरासरीनं 5581 धावा केल्या, ज्यात सहा शतकांचा समावेश आहे. तिवारीनं भारतासाठी 12 वनडे सामनेही खेळले, ज्यात त्यानं 26.09 च्या सरासरीनं 287 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्यानं तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.
हेही वाचा :

