बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना आणि इतर सेलिब्रिटींनी केले मतदान...
गुरुवारी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना आणि इतर सेलिब्रिटींनी मतदान केले आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 15, 2026 at 11:39 AM IST
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुका आज 15 जानेवारी सुरु झाल्या आहेत. गुरुवार सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली, अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी मतदान केलं. बीएमसी निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचणाऱ्या पहिल्या सेलिब्रिटींपैकी एक होता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार.
अक्षय कुमार : बॉलिवूड स्टार अक्षय कुमार सकाळी लवकर जुहू येथील गांधी शिक्षण भवन येथे त्याच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचला. मतदान केल्यानंतर, अक्षयनं मतदान केंद्राबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना, अभिनेत्यानं मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. अभिनेता म्हणाला, "आज बीएमसी निवडणूक आहे. मी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करतो, जेणेकरून आपण मतदानाद्वारे योग्य व्यक्ती निवडू शकू." मुंबईकरांना बाहेर येऊन मतदान करण्याचे आवाहन करताना, अभिनेता म्हणाला की, "शहरातील नागरिकांना त्याचे भविष्य ठरवण्याची शक्ती आहे. मतदारांना फक्त बोलणे थांबवून लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे अक्षयनं आवाहन केले. पुढं अक्षय म्हणाला, "जर आपल्याला मुंबईचे खरे नायक व्हायचे असेल, तर आपण फक्त संवादात सहभागी होऊ नये, तर बाहेर येऊन मतदान केले पाहिजे."
#WATCH | Mumbai: Actor Akshay Kumar arrives at a polling station at Gandhi Shikshan Bhavan to cast his vote for BMC elections. pic.twitter.com/K6kbDrGgAc
— ANI (@ANI) January 15, 2026
#WATCH | Mumbai: After casting his vote, Actor Akshay Kumar says, " today, the voting for bmc is taking place. as mumbaikars, we have the remote control with us today. i would request all the people of mumbai to come out in large numbers and cast their votes. if we have to be the… https://t.co/AOlWRmnx1V pic.twitter.com/19RmBgMFB7
— ANI (@ANI) January 15, 2026
ट्विंकल खन्ना : अक्षय कुमारबरोबर, त्याची पत्नी, अभिनेत्री ट्विंकल खन्ना देखील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचली. मतदान केल्यानंतर, अभिनेत्री ट्विंकल खन्ना म्हणाली, "मला वाटते की यामुळं आपल्याला नियंत्रणाची भावना मिळते, याशिवाय थोडी शक्ती मिळते आणि मी सवय आणि आशा यामुळं मतदान करत आहे."
#WATCH | Mumbai: After casting her vote for the BMC elections, Actress Twinkle Khanna says, " i think it gives us a sense of control, a little bit of power over the narrative, and i am voting both out of habit and hope. " pic.twitter.com/ygl3FPi5XM
— ANI (@ANI) January 15, 2026
#WATCH | Mumbai: After casting his vote for the BMC elections, Musician Vishal Dadlani says, " ...hopefully, whoever wins will hold the elections on time. this is very important for the country, for democracy. but given the state of our city in the last few days, the hope is that… pic.twitter.com/v9vGyNuJ52
— ANI (@ANI) January 15, 2026
विशाल ददलानी : नाना पाटेकर यांच्यासह संगीतकार विशाल ददलानी यांनीही बीएमसी निवडणुकीसाठी मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी म्हटलं, "आशा आहे की, जो कोणी जिंकेल तो वेळेवर निवडणुका घेईल. हे देशासाठी, लोकशाहीसाठी खूप महत्वाचे आहे. मात्र गेल्या काही दिवसांत आपल्या शहराची स्थिती पाहता, मला आशा आहे की, परिस्थिती सुधारेल. मी लोकांना मतदान करण्यास सांगणे बंद केले आहे." याशिवाय त्यांनी पुढं म्हटलं, "मी येथे जे पाहतो ते म्हणजे तिथे फारसे लोक उपस्थित नाहीत. आत जास्त अधिकारी आहेत, जे खूप लज्जास्पद आहे. प्रत्येक भारतीयाला याचे दुःख झाले पाहिजे. जर आपण आपल्या देशाची काळजी घेतली नाही, जर आपण त्याची जबाबदारी घेतली नाही, तर जे घडत आहे ते असेच घडत राहील. सर्वप्रथम, हवा आणि पाणी स्वच्छ असले पाहिजे, जे मानवी जीवनासाठी मूलभूत गरजा आहेत."
#WATCH | Mumbai: After casting his vote for the BMC elections, Actor Nana Patekar says, " ... i understand that the sign of my existence is to vote and for this i travelled 3-4 hours (from pune) and i am returning immediately. so please do vote." pic.twitter.com/HL7yHUvcaR
— ANI (@ANI) January 15, 2026
नाना पाटेकर : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी मतदान करण्यासाठी पुण्याहून मतदान केंद्रापर्यंत प्रवास केला. मतदान केल्यानंतर नाना पाटेकर म्हणाले, "मी हे माझ्या अस्तित्वाचे प्रतीक मानतो आणि मी यासाठी (पुण्याहून) 3-4 तास प्रवास केला आणि मी लगेच परत जात आहे. म्हणून कृपया मतदान करा." या हाय-प्रोफाइल मतदारांव्यतिरिक्त, सकाळीच शहरातील अनेक मतदान केंद्रांवर लांब रांगा दिसल्या, ज्यामुळं मतदानाची सुरुवात खूप उत्साहवर्धक झाली असल्याचे दिसून आले. अनेक मतदारांनी सांगितलं की, त्यांनी दिवस उशिरा लांब रांगा टाळण्यासाठी लवकर मतदान करणे पसंत केले.
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये गुरुवारी मतदान होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड सारख्या प्रमुख शहरांसाठी हे महत्त्वाचे मानले जातात. राज्य निवडणूक आयोगाच्या मते, 29 महानगरपालिकांच्या 893 वॉर्डांमधील 2,869 जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या 15,908 उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी एकूण 3.48 लाख मतदार मतदान करतील. राज्यात एकूण 39092 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

