नागपूर- मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी (युद्धाची खुमखुमी दाखविणाऱ्या) पाकिस्तानविरुद्ध युद्ध नको, असे विधान केल्यानंतर काँग्रेसच्या आणखी एक ज्येष्ठ नेत्यानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर वादग्रस्त विधान केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी धर्म विचारण्याकरिता दहशतवाद्यांना वेळ असतो का? असा प्रश्न उपस्थित केला. ते माध्यमांशी बोलत होते.
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारनं घ्यावी. दहशतवाद्यांनी लोकांना मारण्यापूर्वी धर्म विचारल्याचं सरकार म्हणत आहे. पण, दहशतवाद्यांना हे सर्व करण्यासाठी वेळ आहे का? काही लोक म्हणतात, तसं घडलं नाही. दहशतवाद्यांना जात किंवा धर्म नसतो. दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना ओळखून योग्य कारवाई करा. ही देशाची भावना आहे.
- पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, हे सर्व लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. त्यांनी (मुख्यमंत्री सिद्धरामय्या) म्हटलं की पाकिस्तानशी युद्ध होऊ नये. पण जर सरकार युद्धासाठी तयार असेल तर ते करावं. सरकारकडून पाकिस्तानचे पाणी थांबवण्याबद्दल बोलण्यात येत आहे. पण, तसे करण्यास आणखी २० वर्षे लागतील.
#WATCH | Mumbai | On Vijay Wadettiwar's statement on Pahalgam terror attack, Maharashtra CM Devendra Fadnavis says, " this is a very insensitive and foolish statement. giving such a statement is like encouraging our enemies." pic.twitter.com/0LVERW14KP
— ANI (@ANI) April 28, 2025
- विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. हे अत्यंत असंवेदनशील आणि मूर्खासारखं विधान आहे. असे विधान करणं म्हणजं आपल्या शत्रूंना प्रोत्साहन देण्यासारखे आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
काँग्रेसनं पक्षाचं नाव बदलावं- काँग्रेसचे आमदार विजय वड्डेटीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. काँग्रेसनं नाव बदलून पाकिस्तानमधील पक्ष करावं. एकीकडे राहुल गांधी सर्वपक्षीय बैठकीत येऊन दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याचं सांगतात. दुसरीकडे काँग्रेसचे नेते हिंदू पीडितांची खिल्ली उडवतात. त्यांचं दुटप्पी धोरण चालणार नाही. काँग्रेसनं आज पुन्हा एकदा व्होट बँकेचं राजकारण सुरू केलं आहे. वड्डेटीवार यांनी २६/११ च्या हल्ल्यात पाकिस्तानला क्लीन चिट दिली होती. पाकिस्तानबद्दल काँग्रेस किती मवाळ असणार आहे, असे पूनावाला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं.
#WATCH | On Congress MLA Vijay Wadettiwar's remarks over #PahalgamTerroristAttack, BJP National Spokesperson Shehzad Poonawalla says, " congress leaders are competing to give a clean chit to pakistan one after the other... now vijay wadettiwar says that the government is… https://t.co/ql3zauFoNT pic.twitter.com/4cEvnWEwdV
— ANI (@ANI) April 28, 2025
सिद्धरामैय्या यांनी काय म्हटलं होतं?कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी पहलगाम हल्ल्यावर आम्ही युद्धाच्या बाजूनं नाही, असं वक्तव्य केलं होतं. काश्मीरमध्ये शांतता सुनिश्चित आणि काश्मीर खोऱ्यात सुरक्षा बळकट करण्याची त्यांनी गरज व्यक्त केली. सिद्धरामैय्या यांच्या विधानावर टीका करताना भाजपाचे खासदार संबित पात्रा यांनी काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप केला. राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. राहुल गांधी, सिद्धरामय्या आणि तिम्मापूर यांची विधाने पाकिस्तानी टीव्हीवर प्रसारित केली जात असल्याचं पात्रा यांनी म्हटलं.
हेही वाचा-