अहिल्यानगर (शिर्डी) : "काँग्रेस पार्टी आज नाही तर, स्वातंत्र्य मिळण्याआधीपासूनच लोकांना विभक्त करण्याचं काम करत आली आहे. स्वातंत्र्याआधी पाकिस्तानमध्ये 10 लाख हिंदूंची हत्या करण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसचे लोक काही बोलले नव्हते. गेल्या सत्तर वर्षांपासून काँग्रेसचे काही लोक, भूमाफीया, वक्फ बोर्डाच्या लोकांनी लाखो एकर जमीन लुटली आहे. मात्र, त्यांनी एकाही गरीब मुस्लिमाचा फायदा केलेला नाही. त्यामुळे आता वक्फ बोर्डाच्या जमिनी सुरक्षित ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे," अशी माहिती केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिली. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी सहपत्नी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जातीय वाद वाढवण्याचं काम आजही सुरू : आजही तेलंगाणा राज्यात बघितलं तर, मोठमोठे मुस्लिम नेते, ओवीसींच्या पक्षाच्या लोकांनी आणि काँग्रेस नेत्यांनी हजारो एकर जमीनीवर कब्जा केला आहे. एआयएमआयएम पार्टीच्या लोकांनी बेनामी मॅरेज हॉल तयार केले आहेत. त्यांना कोणतेही सरकार विचारत नाही. जातीय वाद वाढवण्याचं ते आजही काम करत आहेत, असा आरोप केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी शिर्डीत साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना केला.
साई बाबांच्या समाधीचे सहपत्नीक दर्शन : केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज सहपत्नीक शिर्डीला येऊन साईबाबांच्या सामधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी रेड्डी यांनी सहपत्नीक साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. साईबाबांच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी साई मूर्ती आणि शाल देऊन रेड्डी यांचा सत्कार केला.
हेही वाचा :