बारामती (पुणे) : जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान हे शेती बरोबरच अनेक क्षेत्रासाठी महत्त्वाच आहे. या तंत्रज्ञानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारमधील लोकांना भेटावं लागतं. शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अनेक वर्ष काम करत आहोत. या कामामध्ये सरकारचा सहभाग असणं गरजेचं आहे. शेवटी या कामात सरकारही आलं पाहिजे. सरकारचे सहकार्य असण्यासाठी प्रतिनिधींशी बोलणं याच्यात काहीही चुकीचं नाही," असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार यांच्या भेटीचं कारण राजकीय नसल्याचं स्पष्ट केलं.
"ठाकरे कुटुंबाच्या एकत्र येण्याबाबत मला काही माहीत नाही. मी त्यांच्याशी बोललो नाही. मी त्यावर का बोलू?," असं म्हणत ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या मुद्द्यावर बोलणं शरद पवार यांनी टाळलं. खासदार शरद पवार यांनी बारामतीत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
पुढील दोन महिने पाणी जपून वापरण्याचा शेतकऱ्यांना सल्ला : राज्याच्या धरणांमध्ये 38% पाणीसाठा आहे. ही काळजी करण्यासाठी गोष्ट आहे. हे काही पहिल्यांदाच घडलं नाही. याच्या पूर्वीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावरही आपण मात केली. माझी खात्री आहे की, शेतकरी देखील पाण्याचा वापर जपून करतील. यावर तेही विचार करतील, असं म्हणत पवार यांनी शेतकऱ्यांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा :
- "स्वार्थासाठी नव्हे तर जनतेसाठी एकत्र आले, तर...", शरद पवार-अजित पवार ऐकीवर राजू शेट्टींची प्रतिक्रिया
- मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! सात धरणात फक्त २८ टक्केच साठा शिल्लक; महापालिकेला करावी लागतेय पाण्यावरची कसरत
- आचार्य पदवी पूर्व परीक्षेतून पत्रकारिता जनसंवाद विषय बाद; संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा गोंधळ