ETV Bharat / state

जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं-अजित पवारांबरोबरच्या भेटीवरून शरद पवारांचा खुलासा - SHARAD PAWAR ON AJIT PAWAR

जनतेची काम करण्यासाठी राजकीय वाद विसरून एकत्र यावं लागतं. अजित पवार यांच्या भेटीवर बोलताना शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. ते बारामतीत बोलत होते.

SHARAD PAWAR ON AJIT PAWAR
शरद पवार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 22, 2025 at 8:18 PM IST

1 Min Read

बारामती (पुणे) : जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान हे शेती बरोबरच अनेक क्षेत्रासाठी महत्त्वाच आहे. या तंत्रज्ञानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारमधील लोकांना भेटावं लागतं. शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अनेक वर्ष काम करत आहोत. या कामामध्ये सरकारचा सहभाग असणं गरजेचं आहे. शेवटी या कामात सरकारही आलं पाहिजे. सरकारचे सहकार्य असण्यासाठी प्रतिनिधींशी बोलणं याच्यात काहीही चुकीचं नाही," असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार यांच्या भेटीचं कारण राजकीय नसल्याचं स्पष्ट केलं.

"ठाकरे कुटुंबाच्या एकत्र येण्याबाबत मला काही माहीत नाही. मी त्यांच्याशी बोललो नाही. मी त्यावर का बोलू?," असं म्हणत ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या मुद्द्यावर बोलणं शरद पवार यांनी टाळलं. खासदार शरद पवार यांनी बारामतीत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना शरद पवार (ETV Bharat Reporter)
एआय तंत्रज्ञान हे शेतीसाठी उपयोगी : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना एआय तंत्रज्ञान शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असं सांगितलं. एआय तंत्रज्ञानामुळं उसाच्या उत्पादनात वाढ झाली. एआयमुळं पाण्यामध्ये 30 टक्के तर, खतामध्ये 35 टक्के बचत होते. आपण या तंत्रज्ञानावर गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहे. याची सुरुवात आम्ही बारामतीमध्ये केली. शेतीचा पोत राखणं, खताची गरज ओळखणं हे एआयमुळं शक्य आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करावा, असं आवाहन शरद पवार यांनी केल. तर सरकारच्यावतीनं आणखी पाच पिकांची एआय तंत्रज्ञानासाठी निवड केली, याचा आपल्याला आनंद होत आहे. या तंत्रज्ञानाबाबत केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी प्रतापराव पवार यांनी चर्चा केली, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.


पुढील दोन महिने पाणी जपून वापरण्याचा शेतकऱ्यांना सल्ला : राज्याच्या धरणांमध्ये 38% पाणीसाठा आहे. ही काळजी करण्यासाठी गोष्ट आहे. हे काही पहिल्यांदाच घडलं नाही. याच्या पूर्वीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावरही आपण मात केली. माझी खात्री आहे की, शेतकरी देखील पाण्याचा वापर जपून करतील. यावर तेही विचार करतील, असं म्हणत पवार यांनी शेतकऱ्यांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा :

  1. "स्वार्थासाठी नव्हे तर जनतेसाठी एकत्र आले, तर...", शरद पवार-अजित पवार ऐकीवर राजू शेट्टींची प्रतिक्रिया
  2. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! सात धरणात फक्त २८ टक्केच साठा शिल्लक; महापालिकेला करावी लागतेय पाण्यावरची कसरत
  3. आचार्य पदवी पूर्व परीक्षेतून पत्रकारिता जनसंवाद विषय बाद; संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा गोंधळ

बारामती (पुणे) : जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान हे शेती बरोबरच अनेक क्षेत्रासाठी महत्त्वाच आहे. या तंत्रज्ञानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारमधील लोकांना भेटावं लागतं. शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अनेक वर्ष काम करत आहोत. या कामामध्ये सरकारचा सहभाग असणं गरजेचं आहे. शेवटी या कामात सरकारही आलं पाहिजे. सरकारचे सहकार्य असण्यासाठी प्रतिनिधींशी बोलणं याच्यात काहीही चुकीचं नाही," असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार यांच्या भेटीचं कारण राजकीय नसल्याचं स्पष्ट केलं.

"ठाकरे कुटुंबाच्या एकत्र येण्याबाबत मला काही माहीत नाही. मी त्यांच्याशी बोललो नाही. मी त्यावर का बोलू?," असं म्हणत ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या मुद्द्यावर बोलणं शरद पवार यांनी टाळलं. खासदार शरद पवार यांनी बारामतीत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना शरद पवार (ETV Bharat Reporter)
एआय तंत्रज्ञान हे शेतीसाठी उपयोगी : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना एआय तंत्रज्ञान शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असं सांगितलं. एआय तंत्रज्ञानामुळं उसाच्या उत्पादनात वाढ झाली. एआयमुळं पाण्यामध्ये 30 टक्के तर, खतामध्ये 35 टक्के बचत होते. आपण या तंत्रज्ञानावर गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहे. याची सुरुवात आम्ही बारामतीमध्ये केली. शेतीचा पोत राखणं, खताची गरज ओळखणं हे एआयमुळं शक्य आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करावा, असं आवाहन शरद पवार यांनी केल. तर सरकारच्यावतीनं आणखी पाच पिकांची एआय तंत्रज्ञानासाठी निवड केली, याचा आपल्याला आनंद होत आहे. या तंत्रज्ञानाबाबत केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी प्रतापराव पवार यांनी चर्चा केली, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.


पुढील दोन महिने पाणी जपून वापरण्याचा शेतकऱ्यांना सल्ला : राज्याच्या धरणांमध्ये 38% पाणीसाठा आहे. ही काळजी करण्यासाठी गोष्ट आहे. हे काही पहिल्यांदाच घडलं नाही. याच्या पूर्वीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावरही आपण मात केली. माझी खात्री आहे की, शेतकरी देखील पाण्याचा वापर जपून करतील. यावर तेही विचार करतील, असं म्हणत पवार यांनी शेतकऱ्यांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा :

  1. "स्वार्थासाठी नव्हे तर जनतेसाठी एकत्र आले, तर...", शरद पवार-अजित पवार ऐकीवर राजू शेट्टींची प्रतिक्रिया
  2. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! सात धरणात फक्त २८ टक्केच साठा शिल्लक; महापालिकेला करावी लागतेय पाण्यावरची कसरत
  3. आचार्य पदवी पूर्व परीक्षेतून पत्रकारिता जनसंवाद विषय बाद; संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा गोंधळ
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.