ETV Bharat / state

"दहशतवाद्यांच्या दहा पिढ्या विसरणार नाहीत अशी अद्दल घडवा"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर राज ठाकरेंचा संताप - PAHALGAM TERROR ATTACK

मनसे अध्यश्र राज ठाकरे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. या परिस्थितीत मनसे केंद्र सरकारसोबत असल्याचंही राज ठाकरेंनी जाहीर केलं.

Raj Thackeray on Pahalgam Terror Attack
पहलगाम दहशतवादी हल्ला - राज ठाकरे (ANI/File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 23, 2025 at 8:53 AM IST

2 Min Read

मुंबई : मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. बंदूकधारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये स्थानिकांचा देखील समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. "सरकारनं या हल्ल्याच्या सूत्रधारांना धडा शिकवावा व त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना केंद्र सरकारच्या मागे उभी असेल," असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

या प्रसंगात सरकारच्या पाठीशी : राज ठाकरे लिहितात की, "जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील."

10 पिढ्यांचा आठवून थरकाप उडेल : "केंद्र सरकारनं या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा. 1972 साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यानंतर इस्रायलने या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत. केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमचं संपवेल." अशी अपेक्षा देखील राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टद्वारे व्यक्त केली.

सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊ : "या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली. एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना धर्म विचारला. ही तुमची मुजोरी? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की, या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ. या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे." असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मनसे सरकारच्या सोबत : "केंद्र सरकारनं काश्मीरमधून 370 कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे. पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी. हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये. त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाचा काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल." असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला.

हेही वाचा -

  1. पहलगाम दहशतवादी हल्लात 26 पर्यटकांचा मृत्यू; सौदीचा दौरा अर्थ्यावर सोडून पंतप्रधान मायदेशी, मुंबईतही हायअलर्ट
  2. पहलगाम दहशतवादी हल्ला : महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा मृत्यू,डोंबिवलीमधील तिघांचा अंत, अनेकजण जखमी
  3. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून निषेध, अमित शाह श्रीनगरच्या दौऱ्यावर जाणार

मुंबई : मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. बंदूकधारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये स्थानिकांचा देखील समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. "सरकारनं या हल्ल्याच्या सूत्रधारांना धडा शिकवावा व त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना केंद्र सरकारच्या मागे उभी असेल," असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

या प्रसंगात सरकारच्या पाठीशी : राज ठाकरे लिहितात की, "जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील."

10 पिढ्यांचा आठवून थरकाप उडेल : "केंद्र सरकारनं या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा. 1972 साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यानंतर इस्रायलने या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत. केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमचं संपवेल." अशी अपेक्षा देखील राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टद्वारे व्यक्त केली.

सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊ : "या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली. एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना धर्म विचारला. ही तुमची मुजोरी? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की, या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ. या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे." असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मनसे सरकारच्या सोबत : "केंद्र सरकारनं काश्मीरमधून 370 कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे. पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी. हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये. त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाचा काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल." असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला.

हेही वाचा -

  1. पहलगाम दहशतवादी हल्लात 26 पर्यटकांचा मृत्यू; सौदीचा दौरा अर्थ्यावर सोडून पंतप्रधान मायदेशी, मुंबईतही हायअलर्ट
  2. पहलगाम दहशतवादी हल्ला : महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा मृत्यू,डोंबिवलीमधील तिघांचा अंत, अनेकजण जखमी
  3. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून निषेध, अमित शाह श्रीनगरच्या दौऱ्यावर जाणार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.