पुणे : जम्मू - काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे. यातील दोन पर्यटक हे पुण्याचे असून, काही पर्यटक अजूनही तिथेच अडकले आहेत. आम्हाला सुखरूप आणण्याची विनंती अडकलेल्या पर्यंटकांकडून प्रशासनाला केली जात आहे.
पहलगामवरून श्रीनगर येथे सुखरूप पोहोचले : पुणे शहर व आजूबाजूच्या शिरूर, दौंड इत्यादी ठिकाणचे 65 प्रवासी हे श्रीनगर येथे अडकले आहेत. पुण्यातील हडपसर येथील आदित्य खटाटे यांनी व्हिडिओ करत शासनानं आम्हाला लवकरात लवकर सुखरूप परत आणावं, अशी विनंती केली आहे. पुणे, शिरूर, दौंड इत्यादी ठिकाणचे रहिवासी असे एकूण ६५ लोक श्रीनगर येथील हॉटेल माउंटनमध्ये आहेत. हे सर्व पर्यटक मंगळवारी पहलगामवरून श्रीनगर येथे सुखरूप पोहोचले आहेत. "आम्हाला श्रीनगर येथून सुखरूप आपल्या जिल्ह्यात म्हणजेच पुणे येथे पोहोचवावं," अशी विनंती या पर्यटकांकडून प्रशासनास करण्यात आली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू; अडकलेले पर्यटक लवकर येणार राज्यात
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल.
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत.
इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत.
वरील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 23, 2025
पुण्यातील 65 पर्यटक अडकले : श्रीनगरमध्ये अडकलेल्या प्रवाशांमध्ये ज्योती झुरंगे, आदित्य खटाटे,जनार्दन खटाटे, मनीषा खटाटे, काजल पोरे, ज्ञानेश्वर जवळकर, साधना जवळकर, निलेश उंबरकर, ज्योती उंबरकर, आर्या उंबरकर, भूमी उंबरकर, प्रसाद सावंत, दीपा सावंत, राकेश टकले, अश्विनी टकले, सिद्धांत टकले, सुनील निकम, रेखा निकम, दिपाली गायकवाड, वैष्णवी गायकवाड, तेजश्री गायकवाड, मनीषा गायकवाड यांचा समावेश आहे.
पुण्यातील 2 पर्यटकांचा मृत्यू : पुण्यातील दोन कुटुंबं ही काश्मीरला फिरायला गेले होते. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणवोटे हे कुटुंबियांसह पहलगामला पर्यटनासाठी गेले होते. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोळी लागून जगदाळे आणि गणवोटे हे जखमी झाले होते, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
हेही वाचा -