ETV Bharat / state

ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, असाच महाराष्ट्राचा कल - किशोरी पेडणेकर - KISHORI PEDNEKAR

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असाच महाराष्ट्राचा कल असल्याचे स्पष्ट केले आहे.

Kishori Pednekar
किशोरी पेडणेकर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 19, 2025 at 8:42 PM IST

2 Min Read

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचे संकेत दिले. यानंतर शनिवारी उद्धव ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ बाबी बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्यासोबत जाण्याची तयारी राज ठाकरे यांनी दाखविल्यामुळे राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असाच महाराष्ट्राचा कल असल्याचे स्पष्ट केले आहे.

वाचाळवीरांनी थोडे दिवस शांत बसावे : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे घडूच नये, अशी नियत असणारे लोक नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. भूतकाळ उकरून काढत बसून यात अडचण येईल अशी वक्तव्य केली जात आहेत, ती बंद करावीत असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला. तसेच, दोघे एकत्र येणे मराठी माणसाच्या हिताचे असून प्रवक्त्यांनी थोडे दिवस शांत बसावे. त्यांची मते सांगत बसू नये कारण हे दोघे फक्त पक्ष प्रमुख नाहीत तर सख्खी भावंडे आहेत. त्यामुळे वाचाळवीरांनी कोणता अजेंडा राबवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, हे बघावे असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

एकत्र येऊन मराठी माणसासाठी काम करावे : चंदू मामा यांनी ठाकरे बंधूंची जडणघडण जवळून पहिली आहे. त्यामुळे त्यांना वाटणारी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची तळमळ महाराष्ट्र्रातील जनतेची देखील आहे. दोन भाऊ एकत्र यावेत त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्यावेत. गेल्या काही वर्षात मुंबई आणि महाराष्ट्रामधील उद्योग बाहेरील राज्यात जात आहेत. याचा विचार करून एकत्र येऊन मराठी माणसासाठी काम करावे, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.


वाद किरकोळ; महाराष्ट्र मोठा : दरम्यान, अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते का? अजून तुम्ही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र खूप मोठा आहे. कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद शुल्लक आहेत. एकत्र येणे आणि एकत्र राहाणे फार कठीण गोष्ट आहे, मला असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. फक्त माझ्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतच आहे. मी तर म्हणतो सगळ्या महाराष्ट्रातील पक्षातील मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा", असे उत्तर राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिले.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचे संकेत दिले. यानंतर शनिवारी उद्धव ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ बाबी बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्यासोबत जाण्याची तयारी राज ठाकरे यांनी दाखविल्यामुळे राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असाच महाराष्ट्राचा कल असल्याचे स्पष्ट केले आहे.

वाचाळवीरांनी थोडे दिवस शांत बसावे : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे घडूच नये, अशी नियत असणारे लोक नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. भूतकाळ उकरून काढत बसून यात अडचण येईल अशी वक्तव्य केली जात आहेत, ती बंद करावीत असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला. तसेच, दोघे एकत्र येणे मराठी माणसाच्या हिताचे असून प्रवक्त्यांनी थोडे दिवस शांत बसावे. त्यांची मते सांगत बसू नये कारण हे दोघे फक्त पक्ष प्रमुख नाहीत तर सख्खी भावंडे आहेत. त्यामुळे वाचाळवीरांनी कोणता अजेंडा राबवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, हे बघावे असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

एकत्र येऊन मराठी माणसासाठी काम करावे : चंदू मामा यांनी ठाकरे बंधूंची जडणघडण जवळून पहिली आहे. त्यामुळे त्यांना वाटणारी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची तळमळ महाराष्ट्र्रातील जनतेची देखील आहे. दोन भाऊ एकत्र यावेत त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्यावेत. गेल्या काही वर्षात मुंबई आणि महाराष्ट्रामधील उद्योग बाहेरील राज्यात जात आहेत. याचा विचार करून एकत्र येऊन मराठी माणसासाठी काम करावे, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.


वाद किरकोळ; महाराष्ट्र मोठा : दरम्यान, अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते का? अजून तुम्ही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र खूप मोठा आहे. कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद शुल्लक आहेत. एकत्र येणे आणि एकत्र राहाणे फार कठीण गोष्ट आहे, मला असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. फक्त माझ्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतच आहे. मी तर म्हणतो सगळ्या महाराष्ट्रातील पक्षातील मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा", असे उत्तर राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिले.

हेही वाचा :

"आमच्यातले वाद, भांडण छोटी", राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना युतीसाठी पुन्हा टाळी ?

महायुतीत अजित पवारांचं वजन वाढल्यानं एकनाथ शिंदे नाराज? पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीतील 'इनकमिंग' वाढलं!

'औरंगजेबानं नागरिकांवर अत्याचार केले, मात्र काही लोक त्याला नायक मानतात': राजनाथ सिंहांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.