ETV Bharat / state

राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केलाय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया - CM DEVENDRA FADNAVIS

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis And Rahul Gandh
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 7, 2025 at 7:15 PM IST

Updated : June 7, 2025 at 8:55 PM IST

2 Min Read

नागपूर : राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकी पूर्वीच हार स्वीकार केली आहे. पराभवाच्या मानसिकतेतून ते बोलत आहेत.

राहुल गांधींनी मतदारांचा अपमान केला : "मी नेहमी असं म्हणतो की, जोपर्यंत राहुल गांधी जमिनीवर उतरणार नाहीत, तथ्य समजून घेणार नाहीत, जोपर्यंत स्वतःच खोटं बोलत राहतील, स्वतःलाच खोटे आश्वासन देत आणि दिलासा देत राहतील तोपर्यंत त्यांचा पक्ष निवडणुका जिंकू शकत नाही. त्यांना जागावं लागेल आणि यथार्थ समजावा लागेल, नाहीतर ते अशी बेताल वक्तव्यं करत राहतील, नेहमी खोटं बोलत राहतील" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राहुल गांधी मतदारांचा अपमान करत आहेत. राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या मतदारांचाही अपमान केलाय, मी त्याचा निषेध करतो. या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांना ही माहीत नसतं की काय बोलत आहेत, ऐकणारा देखील ते समजत नाही.

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)



रोज खोटं बोलण्याची राहुल गांधींना सवय : महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या अचानक कशी वाढली? यावर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, रोज-रोज खोटं बोललं की लोकांना तेचं खरं वाटू लागतं असं राहुल गांधींंना वाटत असल्यामुळं सातत्यानं त्याच त्या गोष्टी ते बोलत असतात. हा आरोप त्यांनी यापूर्वी देखील केलेला होता. त्याला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये किती मतदार वाढले होते? या निवडणुकीत किती मतदार वाढले याचं उत्तर दिलं आहे. तरी देखील रोज खोटं बोलायचं ही सवयचं राहुल गांधी यांना लागलेली आहे. ते स्वतःच्या मनाला समजत आहे, जोपर्यंत ते सत्य स्वीकारणार नाहीत आणि जागे होऊन जमिनीवर येऊन काम करणार नाही तोवर त्यांच्या पक्षाला भवितव्य नाही. राहुल गांधी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम करत आहेत.



खरंच ठाकरे बंधूंना उत्सुकता आहे का? : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येत असल्याची चर्चा ही गेल्या काही दिवसांपासून रोज रंगलेली आहे. या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, "दोन्ही भावांच्या युतीवर रोज काय बोलणार. मी कालच बोललो, जेवढी उत्सुकता दोन भावांना नसेल तेवढी मीडियाला आहे. तुम्ही रोज पतंग उडून राहिलेत, त्यावर उत्तर देत बसणार नाही."

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अहिल्यादेवींच्या जन्मगावी प्रतिज्ञा; कार्यक्रमाला पवारांची अनुपस्थिती
  2. संपूर्ण देश सैन्य दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या पाठीशी - मुख्यमंत्री फडणवीस
  3. 'प्रशांत कोरटकरला स्वतःच मुख्यमंत्री फडणवीस आहे असा भास होतो का', असीम सरोदे यांना नेमकं काय म्हणायचं?

नागपूर : राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकी पूर्वीच हार स्वीकार केली आहे. पराभवाच्या मानसिकतेतून ते बोलत आहेत.

राहुल गांधींनी मतदारांचा अपमान केला : "मी नेहमी असं म्हणतो की, जोपर्यंत राहुल गांधी जमिनीवर उतरणार नाहीत, तथ्य समजून घेणार नाहीत, जोपर्यंत स्वतःच खोटं बोलत राहतील, स्वतःलाच खोटे आश्वासन देत आणि दिलासा देत राहतील तोपर्यंत त्यांचा पक्ष निवडणुका जिंकू शकत नाही. त्यांना जागावं लागेल आणि यथार्थ समजावा लागेल, नाहीतर ते अशी बेताल वक्तव्यं करत राहतील, नेहमी खोटं बोलत राहतील" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राहुल गांधी मतदारांचा अपमान करत आहेत. राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या मतदारांचाही अपमान केलाय, मी त्याचा निषेध करतो. या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांना ही माहीत नसतं की काय बोलत आहेत, ऐकणारा देखील ते समजत नाही.

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)



रोज खोटं बोलण्याची राहुल गांधींना सवय : महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या अचानक कशी वाढली? यावर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, रोज-रोज खोटं बोललं की लोकांना तेचं खरं वाटू लागतं असं राहुल गांधींंना वाटत असल्यामुळं सातत्यानं त्याच त्या गोष्टी ते बोलत असतात. हा आरोप त्यांनी यापूर्वी देखील केलेला होता. त्याला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये किती मतदार वाढले होते? या निवडणुकीत किती मतदार वाढले याचं उत्तर दिलं आहे. तरी देखील रोज खोटं बोलायचं ही सवयचं राहुल गांधी यांना लागलेली आहे. ते स्वतःच्या मनाला समजत आहे, जोपर्यंत ते सत्य स्वीकारणार नाहीत आणि जागे होऊन जमिनीवर येऊन काम करणार नाही तोवर त्यांच्या पक्षाला भवितव्य नाही. राहुल गांधी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम करत आहेत.



खरंच ठाकरे बंधूंना उत्सुकता आहे का? : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येत असल्याची चर्चा ही गेल्या काही दिवसांपासून रोज रंगलेली आहे. या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, "दोन्ही भावांच्या युतीवर रोज काय बोलणार. मी कालच बोललो, जेवढी उत्सुकता दोन भावांना नसेल तेवढी मीडियाला आहे. तुम्ही रोज पतंग उडून राहिलेत, त्यावर उत्तर देत बसणार नाही."

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अहिल्यादेवींच्या जन्मगावी प्रतिज्ञा; कार्यक्रमाला पवारांची अनुपस्थिती
  2. संपूर्ण देश सैन्य दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या पाठीशी - मुख्यमंत्री फडणवीस
  3. 'प्रशांत कोरटकरला स्वतःच मुख्यमंत्री फडणवीस आहे असा भास होतो का', असीम सरोदे यांना नेमकं काय म्हणायचं?
Last Updated : June 7, 2025 at 8:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.