ETV Bharat / state

दिव्यांगांसह शेतकऱ्यांच्या मागण्याकरिता बच्चू कडू यांचा 'अन्नत्याग'; प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुंडनसह केलं जलसमाधी आंदोलन - BACCHU KADU NEWS

माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी मंगळवारी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत मुंडन आणि जलसमाधी आंदोलन केलं.

Bacchu Kadu hunger strike
मुंडन आंदोलन (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 11, 2025 at 8:13 AM IST

Updated : June 11, 2025 at 8:19 AM IST

1 Min Read

अमरावती - शेतकरी आणि दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी माजी मंत्री बच्चू कडूंनी आपल्या मागण्या संदर्भात गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. आपल्या नेत्याच्या आंदोलनाला पाठिंबा देत चांदूरबाजार तालुक्यातील प्रहार कार्यकर्त्यांनी तालुक्यात दोन ठिकाणी आंदोलन केलं. तहसील कार्यालयाच्या परिसरात मुंडन आंदोलन तर पूर्णा प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन केलं.



शेतकरी आणि दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी माजी आमदार बच्चू कडूंनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ, मनरेगाच्या मजुरीत वाढ, सेंद्रिय खतांना अनुदान आणि दूध उत्पादकांना योग्य दर अशा सरकारकडं मागण्या केल्या आहेत. तरी सरकारनं या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्याकरीता प्रहार कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी मुंडन आंदोलन केलं.

अनेक कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी- चांदूर बाजार तहसील कार्यालयाच्या परिसरात प्रहार तालुकाप्रमुख संतोष किटकले यांच्या नेतृत्वात आज शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडन करून तहसीलदार रामदास शेळके यांना निवेदन दिलं. यावेळी दीपक भोंगाडे, शिवाजी बंड, अरुण गोंडीकर, मुजफ्फर हुसेन, सचिन खुळे, प्रदीप बंड, मुन्ना बोंडे, संदीप मोहोड, गजानन ठाकरे, राहुल खापरे, मंगेश चौधरी, विलास शहाणे, सतीश घोम, रोहित मेंढे, गजेंद्र गायकी, संदीप देशमुख, बाळासाहेब वाकोळे, मनीष एकलारे, सागर निंभोरकर, श्रीकांत धोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होते.

Bacchu Kadu hunger strike
जलसमाधी आंदोलन (Source- ETV Bharat Reporter)



विश्रोळी धरणात उतरले कार्यकर्ते- विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पावर मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये प्रकल्पाच्या पाण्यामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये भगवंत दामेदर, मोहित देशमुख, आकाश औतकर, मदन बावणे, बबन झटाले ,अनिल निंबोरकर, अमित ठाकूर प्रकाश सह्यांदे ,प्रभुदास शेळके, रामेश्वर नवघरे, स्वराज डरागे, अतुल ठाकरे, अशोक अलोने, यांच्यासह अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी होते. या दोन्ही आंदोलनामध्ये चांदूरबाजार ठाणेदार संतोष टाले आणि ब्राह्मणासाठी ठाणेदार उल्हास राठोड यांनी चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात होता.

  • आज (बुधवारी चांदूर बाजार बंद)- बुधवारी चांदुर बाजार शहरातील कृषी केंद्र आणि मेडीकल -वगळता संपूर्ण बाजारपेठ दुपारी 12 ते 2 वाजेपर्यत बंद ठेवणार असल्याचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं.

हेही वाचा-

  1. अंत्ययात्रा निघेपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहणार; बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन, अमरावतीत काढली मिरवणूक
  2. राकेश टिकैत यांनी केलं बच्चू कडू यांचं तोंडभरुन कौतुक; म्हणाले, "आमदार असो की नसो..."

अमरावती - शेतकरी आणि दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी माजी मंत्री बच्चू कडूंनी आपल्या मागण्या संदर्भात गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. आपल्या नेत्याच्या आंदोलनाला पाठिंबा देत चांदूरबाजार तालुक्यातील प्रहार कार्यकर्त्यांनी तालुक्यात दोन ठिकाणी आंदोलन केलं. तहसील कार्यालयाच्या परिसरात मुंडन आंदोलन तर पूर्णा प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन केलं.



शेतकरी आणि दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी माजी आमदार बच्चू कडूंनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ, मनरेगाच्या मजुरीत वाढ, सेंद्रिय खतांना अनुदान आणि दूध उत्पादकांना योग्य दर अशा सरकारकडं मागण्या केल्या आहेत. तरी सरकारनं या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्याकरीता प्रहार कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी मुंडन आंदोलन केलं.

अनेक कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी- चांदूर बाजार तहसील कार्यालयाच्या परिसरात प्रहार तालुकाप्रमुख संतोष किटकले यांच्या नेतृत्वात आज शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडन करून तहसीलदार रामदास शेळके यांना निवेदन दिलं. यावेळी दीपक भोंगाडे, शिवाजी बंड, अरुण गोंडीकर, मुजफ्फर हुसेन, सचिन खुळे, प्रदीप बंड, मुन्ना बोंडे, संदीप मोहोड, गजानन ठाकरे, राहुल खापरे, मंगेश चौधरी, विलास शहाणे, सतीश घोम, रोहित मेंढे, गजेंद्र गायकी, संदीप देशमुख, बाळासाहेब वाकोळे, मनीष एकलारे, सागर निंभोरकर, श्रीकांत धोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होते.

Bacchu Kadu hunger strike
जलसमाधी आंदोलन (Source- ETV Bharat Reporter)



विश्रोळी धरणात उतरले कार्यकर्ते- विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पावर मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये प्रकल्पाच्या पाण्यामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये भगवंत दामेदर, मोहित देशमुख, आकाश औतकर, मदन बावणे, बबन झटाले ,अनिल निंबोरकर, अमित ठाकूर प्रकाश सह्यांदे ,प्रभुदास शेळके, रामेश्वर नवघरे, स्वराज डरागे, अतुल ठाकरे, अशोक अलोने, यांच्यासह अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी होते. या दोन्ही आंदोलनामध्ये चांदूरबाजार ठाणेदार संतोष टाले आणि ब्राह्मणासाठी ठाणेदार उल्हास राठोड यांनी चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात होता.

  • आज (बुधवारी चांदूर बाजार बंद)- बुधवारी चांदुर बाजार शहरातील कृषी केंद्र आणि मेडीकल -वगळता संपूर्ण बाजारपेठ दुपारी 12 ते 2 वाजेपर्यत बंद ठेवणार असल्याचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं.

हेही वाचा-

  1. अंत्ययात्रा निघेपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहणार; बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन, अमरावतीत काढली मिरवणूक
  2. राकेश टिकैत यांनी केलं बच्चू कडू यांचं तोंडभरुन कौतुक; म्हणाले, "आमदार असो की नसो..."
Last Updated : June 11, 2025 at 8:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.