ETV Bharat / state

शाळेच्या पहिल्या दिवशी आश्रमशाळांत होणार 'विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव'; आदिवासी विकास मंत्री अशोक उईके - ASHOK UIKE OM ASHRAM SCHOOL

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Ashok Uike On Ashram School
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 14, 2025 at 9:31 PM IST

1 Min Read

मुंबई : राज्यात सोमवारपासून (16 जून) शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आहे. या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी राज्य सरकार पुढं सरसावलं आहे. या दिवशी आपपल्या विभागातील खासदार, आमदार यांनी शासकीय शाळांमध्ये जाऊन शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करावं, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये 'विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव' साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

Ashok Uike On Ashram School
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Reporter)

विद्यार्थ्यांशी लोकप्रतिनिधी साधणार संवाद : राज्यातील नाशिक, ठाणे, पालघर या ठिकाणी 16 जून रोजी शासकीय आश्रमशाळा सुरु होणार आहेत. तर अमरावती, नागपूर इथं 30 जूनला आश्रमशाळा सुरु होणार आहेत. दरम्यान, आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात एकूण 497 शासकीय आश्रमशाळा आहेत. तर अनुदानित आश्रमशाळा 554 आहेत. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी 'विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव' उपक्रमात मंत्री, खासदार, आमदार हे राज्यातील विविध आश्रमशाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच यावेळी विद्यार्थ्यांचं फूल देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

आश्रमशाळांत शिक्षक आणि परिचारिका भरती : दरम्यान, पुढं बोलताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणाले की, "आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची भरती आगामी काळात करण्यात येणार आहे. विभागाच्या शासकीय आश्रमशाळांत 1791 शिक्षकांची पदं बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यास शासनानं मान्यता दिली आहे. तर यात उच्च माध्यमिक शिक्षक 229, माध्यमिक शिक्षक 455, पदवीधर प्राथमिक शिक्षक 120, प्राथमिक शिक्षक इंग्रजी 178, प्राथमिक शिक्षक मराठी 809 असे एकूण 1791 शिक्षक भरती लवकरच करण्यात येईल. तर परिचारिका (नर्सेस) यांची एकूण 499 पदांची बाह्यस्त्रोताद्वारे भरती केली जाणार आहे."

हेही वाचा :

  1. चंद्रपुरात राज्यात सर्वाधिक डायलिसिस करण्याचा विक्रम ; रुग्णांना मिळते मोफत सुविधा, विस्तारित कक्षाचं उद्घाटन
  2. Food Poisson : भंडाऱ्यामधील आश्रमशाळेतील ४१ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
  3. आदिवासी नृत्य करून भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा विजयी जल्लोष

मुंबई : राज्यात सोमवारपासून (16 जून) शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आहे. या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी राज्य सरकार पुढं सरसावलं आहे. या दिवशी आपपल्या विभागातील खासदार, आमदार यांनी शासकीय शाळांमध्ये जाऊन शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करावं, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये 'विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव' साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

Ashok Uike On Ashram School
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Reporter)

विद्यार्थ्यांशी लोकप्रतिनिधी साधणार संवाद : राज्यातील नाशिक, ठाणे, पालघर या ठिकाणी 16 जून रोजी शासकीय आश्रमशाळा सुरु होणार आहेत. तर अमरावती, नागपूर इथं 30 जूनला आश्रमशाळा सुरु होणार आहेत. दरम्यान, आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात एकूण 497 शासकीय आश्रमशाळा आहेत. तर अनुदानित आश्रमशाळा 554 आहेत. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी 'विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव' उपक्रमात मंत्री, खासदार, आमदार हे राज्यातील विविध आश्रमशाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच यावेळी विद्यार्थ्यांचं फूल देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

आश्रमशाळांत शिक्षक आणि परिचारिका भरती : दरम्यान, पुढं बोलताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणाले की, "आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची भरती आगामी काळात करण्यात येणार आहे. विभागाच्या शासकीय आश्रमशाळांत 1791 शिक्षकांची पदं बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यास शासनानं मान्यता दिली आहे. तर यात उच्च माध्यमिक शिक्षक 229, माध्यमिक शिक्षक 455, पदवीधर प्राथमिक शिक्षक 120, प्राथमिक शिक्षक इंग्रजी 178, प्राथमिक शिक्षक मराठी 809 असे एकूण 1791 शिक्षक भरती लवकरच करण्यात येईल. तर परिचारिका (नर्सेस) यांची एकूण 499 पदांची बाह्यस्त्रोताद्वारे भरती केली जाणार आहे."

हेही वाचा :

  1. चंद्रपुरात राज्यात सर्वाधिक डायलिसिस करण्याचा विक्रम ; रुग्णांना मिळते मोफत सुविधा, विस्तारित कक्षाचं उद्घाटन
  2. Food Poisson : भंडाऱ्यामधील आश्रमशाळेतील ४१ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
  3. आदिवासी नृत्य करून भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा विजयी जल्लोष
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.