ETV Bharat / sports

RCB वर बंदी घालणार? बेंगळुरु घटनेनंतर BCCI मोठी अ‍ॅक्शन घेण्याच्या तयारीत - BCCI ACTION ON RCB

RCB च्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी होऊन 11 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. आता या प्रकरणानंतर, बीसीसीआय आयपीएलमध्ये आरसीबीवर बंदी घालण्याची शक्यता आहे.

BCCI Action on RCB
बेंगळुरु घटनेनंतर BCCI मोठी अ‍ॅक्शन घेण्याच्या तयारीत (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : June 8, 2025 at 11:00 AM IST

1 Min Read

बेंगळुरु BCCI Action on RCB : आयपीएल 2025 चं विजेतेपद जिंकल्यानंतर, एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयी परेड आणि भव्य विजयोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान, स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. ज्यात 11 निष्पाप चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर, आरसीबीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या दोन अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. या प्रकरणात एकाला अटकही करण्यात आली आहे. या सगळ्यात आरसीबी संघ अडकला आहे. या प्रकरणानंतर, बीसीसीआय आरसीबीला आयपीएल 2026 मध्ये सहभागी करुन घेण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते.

बीसीसीआय बंदी घालण्यासारखा मोठा निर्णय घेणार का? : आरसीबीच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या इतक्या मोठ्या चुकीसाठी कोण जबाबदार आहे याचा तपास सुरु आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयसमोर एक मोठा प्रश्न आहे की जर या चुकीमध्ये आरसीबी संघाचं नाव आलं तर ते पुढं काय निर्णय घेतील. आयपीएलमधील सर्व फ्रँचायझी व्यावसायिक संस्था म्हणून काम करतात, परंतु त्यांचा सहभाग बीसीसीआयच्या करारांद्वारे नियंत्रित केला जातो आणि त्या करारांमध्ये सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित अनेक कलमं समाविष्ट असतात. जर तपासकर्त्यांनी या गंभीर निष्काळजीपणाशी थेट आरसीबी व्यवस्थापनाचा संबंध जोडला, तर बीसीसीआयला न्याय देण्यासाठी आणि लीगची विश्वासार्हता राखण्यासाठी आरसीबीविरुद्ध मोठी कारवाई करावी लागू शकते.

काय म्हणाले BCCI सचिव : यातच बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी क्रिकबझशी बोलताना या घटनेवरुन मोठं वक्तव्य केलंय. सैकिया म्हणाले, 'काही पातळीवर बीसीसीआयला काहीतरी करावं लागेल. आम्ही गप्प राहू शकत नाही. हा आरसीबीचा खाजगी कार्यक्रम होता. पण, भारतातील क्रिकेटसाठी बीसीसीआय जबाबदार आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करु.'

11 निष्पाप चाहत्यांचा मृत्यू अनेक जण जखमी : गेल्या मंगळवारी, आरसीबीनं पंजाब किंग्जचा पराभव करुन त्यांचं पहिलं विजेतेपद जिंकलं. त्यानंतर संपूर्ण संघ आणि बंगळुरुचे चाहते खूप आनंदी झाले. दुसऱ्या दिवशी, बुधवारी, संघ बेंगळुरुला पोहोचला, तिथं ते त्यांच्या चाहत्यांसोबत विजय साजरा करणार होते. पण हे उत्सवी वातावरण काही क्षणातच शोकात बदललं. लाखोंच्या गर्दीमुळं अचानक चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले.

हेही वाचा :

  1. विराट कोहलीला अटक होणार का...? बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणात विराटविरुद्ध तक्रार दाखल
  2. Explainer: स्वतःला चेंगराचेंगरीतून कसं वाचवायचं? गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी कशी होते, वाचा सविस्तर

बेंगळुरु BCCI Action on RCB : आयपीएल 2025 चं विजेतेपद जिंकल्यानंतर, एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयी परेड आणि भव्य विजयोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान, स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. ज्यात 11 निष्पाप चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर, आरसीबीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या दोन अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. या प्रकरणात एकाला अटकही करण्यात आली आहे. या सगळ्यात आरसीबी संघ अडकला आहे. या प्रकरणानंतर, बीसीसीआय आरसीबीला आयपीएल 2026 मध्ये सहभागी करुन घेण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते.

बीसीसीआय बंदी घालण्यासारखा मोठा निर्णय घेणार का? : आरसीबीच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या इतक्या मोठ्या चुकीसाठी कोण जबाबदार आहे याचा तपास सुरु आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयसमोर एक मोठा प्रश्न आहे की जर या चुकीमध्ये आरसीबी संघाचं नाव आलं तर ते पुढं काय निर्णय घेतील. आयपीएलमधील सर्व फ्रँचायझी व्यावसायिक संस्था म्हणून काम करतात, परंतु त्यांचा सहभाग बीसीसीआयच्या करारांद्वारे नियंत्रित केला जातो आणि त्या करारांमध्ये सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित अनेक कलमं समाविष्ट असतात. जर तपासकर्त्यांनी या गंभीर निष्काळजीपणाशी थेट आरसीबी व्यवस्थापनाचा संबंध जोडला, तर बीसीसीआयला न्याय देण्यासाठी आणि लीगची विश्वासार्हता राखण्यासाठी आरसीबीविरुद्ध मोठी कारवाई करावी लागू शकते.

काय म्हणाले BCCI सचिव : यातच बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी क्रिकबझशी बोलताना या घटनेवरुन मोठं वक्तव्य केलंय. सैकिया म्हणाले, 'काही पातळीवर बीसीसीआयला काहीतरी करावं लागेल. आम्ही गप्प राहू शकत नाही. हा आरसीबीचा खाजगी कार्यक्रम होता. पण, भारतातील क्रिकेटसाठी बीसीसीआय जबाबदार आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करु.'

11 निष्पाप चाहत्यांचा मृत्यू अनेक जण जखमी : गेल्या मंगळवारी, आरसीबीनं पंजाब किंग्जचा पराभव करुन त्यांचं पहिलं विजेतेपद जिंकलं. त्यानंतर संपूर्ण संघ आणि बंगळुरुचे चाहते खूप आनंदी झाले. दुसऱ्या दिवशी, बुधवारी, संघ बेंगळुरुला पोहोचला, तिथं ते त्यांच्या चाहत्यांसोबत विजय साजरा करणार होते. पण हे उत्सवी वातावरण काही क्षणातच शोकात बदललं. लाखोंच्या गर्दीमुळं अचानक चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले.

हेही वाचा :

  1. विराट कोहलीला अटक होणार का...? बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणात विराटविरुद्ध तक्रार दाखल
  2. Explainer: स्वतःला चेंगराचेंगरीतून कसं वाचवायचं? गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी कशी होते, वाचा सविस्तर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.