ETV Bharat / sports

"वानखेडेची खेळपट्टी खूप..." मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला पॅट कमिन्स? - MI VS SRH MATCH

सनरायझर्स हैदराबादच्या परभवानंतर कर्णधार पॅट कमिन्सच्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Pat Cummins Statement
पॅट कमिन्स (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 18, 2025 at 2:39 PM IST

1 Min Read

मुंबई Pat Cummins Statement : आयपीएल 2025 च्या हंगामातील 33वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं 4 विकेट्सनं विजय मिळवला. यासह मुंबई इंडियन्सनं सलग दोन सामन्यात विजय मिळवत स्वतःला स्पर्धेत जिवंत ठेवलं आहे. मात्र सनरायझर्स हैदराबादच्या परभवानंतर कर्णधार पॅट कमिन्सच्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

काय म्हणाला पॅट कमिन्स : खरं तर मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर पॅट कमिन्सनं वानखेडेच्या खेळपट्टीला जबाबदार धरलं आहे. तो म्हणाला, "ही खूप कठीण खेळपट्टी होती. आम्हाला खेळपट्टी वेगवान असेल अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही 160 धावा केल्या, त्या खूप कमी होत्या." तसंच आम्ही देखील चांगली गोलंदाजी केली, मात्र योग्यवेळी विकेट्स घेऊ शकलो नसल्याचं पॅट कमिन्सनं सांगितलं.

हैदराबादची फलंदाजी अपयशी : या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या फलंदाजी कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली पण तरीही हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अभिषेकनं 28 चेंडूत 40 धावा केल्या तर ट्रॅव्हिस हेडनं 29 चेंडूत 28 धावा केल्या. तसंच हेनरिक क्लासेननं 28 चेंडूत 37 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, विल जॅक्सनं 2 बळी घेतले, तर याशिवाय जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

मुंबईचा तिसरा विजय : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सनं हैदराबादचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात सनरायझर्सनं प्रथम फलंदाजी केली पण संथ खेळपट्टीवर त्यांचे स्फोटक फलंदाज अपेक्षेनुसार फलंदाजी करु शकले नाहीत आणि संघ फक्त 162 धावा करु शकला. प्रत्येक फलंदाजाच्या छोट्या पण जलद खेळीमुळं मुंबईनं हे लक्ष्य 18.1 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केलं. यासह, मुंबईला 7 सामन्यांमधील तिसरा विजय मिळाला, तर सनरायझर्सचा तेवढ्याच सामन्यांमधील हा पाचवा पराभव होता.

हेही वाचा :

  1. 5 सामने गमावल्यानंतर 'ऑरेंज आर्मी' प्लेऑफमध्ये पोहोचेल? असं आहे समीकरण
  2. Happy Birthday IPL... 2008 मध्ये आजच्याच दिवशी झाली होती सुरुवात; पहिल्याच सामन्यात RCB 140 धावांनी झाली होती पराभूत

मुंबई Pat Cummins Statement : आयपीएल 2025 च्या हंगामातील 33वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं 4 विकेट्सनं विजय मिळवला. यासह मुंबई इंडियन्सनं सलग दोन सामन्यात विजय मिळवत स्वतःला स्पर्धेत जिवंत ठेवलं आहे. मात्र सनरायझर्स हैदराबादच्या परभवानंतर कर्णधार पॅट कमिन्सच्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

काय म्हणाला पॅट कमिन्स : खरं तर मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर पॅट कमिन्सनं वानखेडेच्या खेळपट्टीला जबाबदार धरलं आहे. तो म्हणाला, "ही खूप कठीण खेळपट्टी होती. आम्हाला खेळपट्टी वेगवान असेल अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही 160 धावा केल्या, त्या खूप कमी होत्या." तसंच आम्ही देखील चांगली गोलंदाजी केली, मात्र योग्यवेळी विकेट्स घेऊ शकलो नसल्याचं पॅट कमिन्सनं सांगितलं.

हैदराबादची फलंदाजी अपयशी : या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या फलंदाजी कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली पण तरीही हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अभिषेकनं 28 चेंडूत 40 धावा केल्या तर ट्रॅव्हिस हेडनं 29 चेंडूत 28 धावा केल्या. तसंच हेनरिक क्लासेननं 28 चेंडूत 37 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, विल जॅक्सनं 2 बळी घेतले, तर याशिवाय जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

मुंबईचा तिसरा विजय : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सनं हैदराबादचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात सनरायझर्सनं प्रथम फलंदाजी केली पण संथ खेळपट्टीवर त्यांचे स्फोटक फलंदाज अपेक्षेनुसार फलंदाजी करु शकले नाहीत आणि संघ फक्त 162 धावा करु शकला. प्रत्येक फलंदाजाच्या छोट्या पण जलद खेळीमुळं मुंबईनं हे लक्ष्य 18.1 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केलं. यासह, मुंबईला 7 सामन्यांमधील तिसरा विजय मिळाला, तर सनरायझर्सचा तेवढ्याच सामन्यांमधील हा पाचवा पराभव होता.

हेही वाचा :

  1. 5 सामने गमावल्यानंतर 'ऑरेंज आर्मी' प्लेऑफमध्ये पोहोचेल? असं आहे समीकरण
  2. Happy Birthday IPL... 2008 मध्ये आजच्याच दिवशी झाली होती सुरुवात; पहिल्याच सामन्यात RCB 140 धावांनी झाली होती पराभूत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.