ETV Bharat / sports

"मला खूप हसू..." 245 धावा काढूनही मॅच हरल्यानंतर नेमकं काय म्हणाला श्रेयस अय्यर? - SHREYAS IYER STATEMENT

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जनं सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 245 धावा केल्या. यानंतर एसआरएचनं हे लक्ष्य सहज गाठलं.

Shreyas Iyer Statement
245 धावा काढूनही मॅच हरल्यानंतर नेमकं काय म्हणाला श्रेयस अय्यर? (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 13, 2025 at 9:50 AM IST

1 Min Read

हैदराबाद Shreyas Iyer Statement : सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाला 8 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. तेही जेव्हा संघानं प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या होत्या. पंजाबकडून श्रेयस अय्यरनं शानदार खेळी केली आणि 82 धावा केल्या, परंतु अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडनं त्यांचा डाव खराब केला. अभिषेकनं स्फोटक फलंदाजी करत 141 धावा केल्या आणि संघाला विजयाकडं नेलं. आता सामन्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरनं संघाच्या क्षेत्ररक्षणाबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे.

पराभवासाठी क्षेत्ररक्षण जबाबदार धरलं : पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, "ही एक उत्तम धावसंख्या होती. पण ज्या पद्धतीनं त्यांनी दोन षटकं शिल्लक असताना हे लक्ष्य गाठलं ते पाहून मला खूप हसू येत आहे. आम्ही क्षेत्ररक्षणात आणखी चांगले होऊ शकलो असतो. डावाच्या चौथ्या षटकात यश ठाकूरच्या नो बॉलवर अभिषेक शर्मालाही संधी मिळाली. आम्हाला दोन उत्तम झेल घेता आले असते. तो (अभिषेक) थोडा भाग्यवान होता, जरी त्यानं एक शानदार खेळी केली. झेल तुमचे सामने जिंकतात आणि आम्ही तिथं ते चुकवले. आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही पण आम्हाला पुन्हा बसून नियोजन करावं लागेल."

अभिषेक शर्माचं कौतुक : श्रेयस अय्यर पुढं म्हणाला की, "ज्या पद्धतीनं ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी सलामीची भागीदारी केली. ती हुशार होती. त्यांनी आम्हाला फारशी संधी दिली नाही. फर्ग्युसन तुम्हाला विकेट मिळवून देऊ शकतो, पण हे (दुखापत) घडते, ते खेळाचा एक भाग आहे. पुढं जाताना आपण या गोष्टी शिकल्या पाहिजेत. दव पडल्यामुळं आमच्यासाठी परिस्थिती थोडी कठीण झाली." अभिषेकच्या खेळीबद्दल बोलताना तो म्हणाला की, मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी ही एक होती.

सामन्यात काय झालं : पंजाब किंग्जनं दिलेल्या 246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादनं अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडच्या खेळीमुळं हे लक्ष्य सहज गाठलं. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी झाली. अभिषेकनं त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली आणि 141 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त, हेडनं 66 धावांचं योगदान दिलं. या खेळाडूंसमोर पंजाब किंग्जचे गोलंदाज टिकू शकले नाहीत. पंजाबकडून फक्त अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल यांनाच विकेट घेता आल्या.

हेही वाचा :

  1. 'शर्माजी'च्या पोरानं पंजाबच्या किंग्जविरुद्ध केला रेकॉर्ड्सचा 'अभिषेक'; शतकाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
  2. 111 चेंडूत 247 धावा... 'ऑरेंज आर्मी'समोर पंजाबचे 'किंग्ज' धाराशायी
  3. 'गुजरात एक्सप्रेस'ला लखनऊच्या 'नवाबां'नी लावला ब्रेक; मार्कराम-पुरनचच्या वादळासमोर GT चे गोलंदाज निष्प्रभ

हैदराबाद Shreyas Iyer Statement : सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाला 8 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. तेही जेव्हा संघानं प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या होत्या. पंजाबकडून श्रेयस अय्यरनं शानदार खेळी केली आणि 82 धावा केल्या, परंतु अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडनं त्यांचा डाव खराब केला. अभिषेकनं स्फोटक फलंदाजी करत 141 धावा केल्या आणि संघाला विजयाकडं नेलं. आता सामन्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरनं संघाच्या क्षेत्ररक्षणाबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे.

पराभवासाठी क्षेत्ररक्षण जबाबदार धरलं : पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, "ही एक उत्तम धावसंख्या होती. पण ज्या पद्धतीनं त्यांनी दोन षटकं शिल्लक असताना हे लक्ष्य गाठलं ते पाहून मला खूप हसू येत आहे. आम्ही क्षेत्ररक्षणात आणखी चांगले होऊ शकलो असतो. डावाच्या चौथ्या षटकात यश ठाकूरच्या नो बॉलवर अभिषेक शर्मालाही संधी मिळाली. आम्हाला दोन उत्तम झेल घेता आले असते. तो (अभिषेक) थोडा भाग्यवान होता, जरी त्यानं एक शानदार खेळी केली. झेल तुमचे सामने जिंकतात आणि आम्ही तिथं ते चुकवले. आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही पण आम्हाला पुन्हा बसून नियोजन करावं लागेल."

अभिषेक शर्माचं कौतुक : श्रेयस अय्यर पुढं म्हणाला की, "ज्या पद्धतीनं ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी सलामीची भागीदारी केली. ती हुशार होती. त्यांनी आम्हाला फारशी संधी दिली नाही. फर्ग्युसन तुम्हाला विकेट मिळवून देऊ शकतो, पण हे (दुखापत) घडते, ते खेळाचा एक भाग आहे. पुढं जाताना आपण या गोष्टी शिकल्या पाहिजेत. दव पडल्यामुळं आमच्यासाठी परिस्थिती थोडी कठीण झाली." अभिषेकच्या खेळीबद्दल बोलताना तो म्हणाला की, मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी ही एक होती.

सामन्यात काय झालं : पंजाब किंग्जनं दिलेल्या 246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादनं अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडच्या खेळीमुळं हे लक्ष्य सहज गाठलं. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी झाली. अभिषेकनं त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली आणि 141 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त, हेडनं 66 धावांचं योगदान दिलं. या खेळाडूंसमोर पंजाब किंग्जचे गोलंदाज टिकू शकले नाहीत. पंजाबकडून फक्त अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल यांनाच विकेट घेता आल्या.

हेही वाचा :

  1. 'शर्माजी'च्या पोरानं पंजाबच्या किंग्जविरुद्ध केला रेकॉर्ड्सचा 'अभिषेक'; शतकाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
  2. 111 चेंडूत 247 धावा... 'ऑरेंज आर्मी'समोर पंजाबचे 'किंग्ज' धाराशायी
  3. 'गुजरात एक्सप्रेस'ला लखनऊच्या 'नवाबां'नी लावला ब्रेक; मार्कराम-पुरनचच्या वादळासमोर GT चे गोलंदाज निष्प्रभ
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.