ETV Bharat / sports

'भारत बदला घेईल...' पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर क्रिकेटपटू संतापले - PAHALGAM TERROR ATTACK

पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेटपटूंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Cricketers Reacts on Pahalgam Terror Attack
पहलगाम दहशतवादी हल्ला (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 23, 2025 at 10:36 AM IST

2 Min Read

अनंतनाग Cricketers Reacts on Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम इथं 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. दहशतवाद्यांनी एका विशिष्ट धर्माच्या पर्यटकांना लक्ष्य केलं, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील लोक या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत आहेत. या घटनेनंतर भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडूही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आहेत. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं पोस्ट करत स्पष्टपणे म्हटलं आहे की भारत दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याला प्रत्युत्तर देईल.

गौतम गंभीर : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं की, "मी मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत आहे. यासाठी पूर्णपणे जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. भारत बदला घेईल."

हरभजन सिंग : माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगनही पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शोक व्यक्त केला आणि लिहिलं की, "या क्रूर हल्ल्यात जीव गमावलेल्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. हे माफ केलं जाऊ शकत नाही."

युवराज सिंग : युवराज सिंगनं लिहिलं, "पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळं मला खूप दुःख झालं आहे. मी पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करतो. आपण आशा आणि मानवतेमध्ये एकजूट राहूया."

सुरेश रैना : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू सुरेश रैनानंही याबाबत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं की, "काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळं मन दु:खी आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत आपल्या शूर सैन्या, जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलांसोबत एकजुटीनं उभा आहे. न्यायाचा विजय होईल."

वीरेंद्र सेहवाग: भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं याबाबत लिहिलं की, "पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या निंदनीय दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींसाठी प्रार्थना करतो."

शिखर धवन : तसंच शिखर धवननंही पोस्ट करत लिहिलं, "पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्यामुळं मी खूप दुःखी आणि धक्कादायक आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. न्याय नक्कीच मिळेल. कृपया सुरक्षित राहा."

आकाश चोप्रा : समालेचक आकाश चोप्रानंही पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यानं लिहिलं, "पहलगाममधील अकल्पनीय अत्याचार. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना संवेदना. शांती. आशा आहे की गुन्हेगार (आणि त्यांच्या समर्थकांना) ओळखलं जाईल, त्यांना पकडलं जाईल आणि त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल."

शुभमन गिल : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आणि सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं की "माझ्या प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. अशा हिंसाचारासाठी आपल्या देशात कोणतंही स्थान नाही."

दिल्ली कॅपिटल्स : दिल्ली कॅपिटल्स संघानंही सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि लिहिलं की, "पहलगाममधील दुःखद घटना हृदयद्रावक आहे. या घटनेतील बळी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि प्रभावित झालेल्या सर्वांसाठी आमचं हृदय दुःखी आहे. या दुःखाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्यासोबत एकता व्यक्त करतो."

हेही वाचा :

  1. दिल्लीचा विजयी 'सिक्सर'... लखनऊच्या नवाबांच्या दुसऱ्यांदा पराभव
  2. IPL सामन्यात उत्साह वाढवणाऱ्या चीअरलीडर्संना किती पगार मिळतो? कशी होते त्यांची निवड?

अनंतनाग Cricketers Reacts on Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम इथं 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. दहशतवाद्यांनी एका विशिष्ट धर्माच्या पर्यटकांना लक्ष्य केलं, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील लोक या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत आहेत. या घटनेनंतर भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडूही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आहेत. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं पोस्ट करत स्पष्टपणे म्हटलं आहे की भारत दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याला प्रत्युत्तर देईल.

गौतम गंभीर : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं की, "मी मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत आहे. यासाठी पूर्णपणे जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. भारत बदला घेईल."

हरभजन सिंग : माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगनही पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शोक व्यक्त केला आणि लिहिलं की, "या क्रूर हल्ल्यात जीव गमावलेल्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. हे माफ केलं जाऊ शकत नाही."

युवराज सिंग : युवराज सिंगनं लिहिलं, "पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळं मला खूप दुःख झालं आहे. मी पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करतो. आपण आशा आणि मानवतेमध्ये एकजूट राहूया."

सुरेश रैना : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू सुरेश रैनानंही याबाबत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं की, "काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळं मन दु:खी आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत आपल्या शूर सैन्या, जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलांसोबत एकजुटीनं उभा आहे. न्यायाचा विजय होईल."

वीरेंद्र सेहवाग: भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं याबाबत लिहिलं की, "पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या निंदनीय दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींसाठी प्रार्थना करतो."

शिखर धवन : तसंच शिखर धवननंही पोस्ट करत लिहिलं, "पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्यामुळं मी खूप दुःखी आणि धक्कादायक आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. न्याय नक्कीच मिळेल. कृपया सुरक्षित राहा."

आकाश चोप्रा : समालेचक आकाश चोप्रानंही पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यानं लिहिलं, "पहलगाममधील अकल्पनीय अत्याचार. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना संवेदना. शांती. आशा आहे की गुन्हेगार (आणि त्यांच्या समर्थकांना) ओळखलं जाईल, त्यांना पकडलं जाईल आणि त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल."

शुभमन गिल : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आणि सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं की "माझ्या प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. अशा हिंसाचारासाठी आपल्या देशात कोणतंही स्थान नाही."

दिल्ली कॅपिटल्स : दिल्ली कॅपिटल्स संघानंही सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि लिहिलं की, "पहलगाममधील दुःखद घटना हृदयद्रावक आहे. या घटनेतील बळी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि प्रभावित झालेल्या सर्वांसाठी आमचं हृदय दुःखी आहे. या दुःखाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्यासोबत एकता व्यक्त करतो."

हेही वाचा :

  1. दिल्लीचा विजयी 'सिक्सर'... लखनऊच्या नवाबांच्या दुसऱ्यांदा पराभव
  2. IPL सामन्यात उत्साह वाढवणाऱ्या चीअरलीडर्संना किती पगार मिळतो? कशी होते त्यांची निवड?
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.