ETV Bharat / sports

मुंबईचा विजयी 'चौकार', गुणतालिकेत भूकंप; 'ऑरेंज आर्मी'चं आव्हान संपल्यात जमा - MI BEAT SRH

आयपीएलच्या 41व्या सामन्यात मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबादचा सात विकेटनं दारुण पराभव केला आहे.

Mumbai Beat Hyderabad
मुंबई इंडियन्स (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 23, 2025 at 11:07 PM IST

2 Min Read

हैदराबाद Mumbai Beat Hyderabad : येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 41व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादचा सात विकेटनं दारुण पराभव केला आहे. हैदराबादनं दिलेलं 144 धावांचं लक्ष्य मुंबईनं 16 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात आरामशीर पार केलं. यासह मुंबईनं हंगामातील पाचवा विजय मिळवत गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे, तर सनरायझर्स हैदराबादचा आठ सामन्यातील हा सहावा पराभव आहे. परिणामी त्यांचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडल्यात जमा आहे.

रोहितचं सलग दुसरं अर्धशतक : हैदराबादनं दिलेल्या 144 धावांच्या लक्षाचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या दुसऱ्याच षटकात सलामीवीर रियान रिकेलटनला जयदेव उनाडकटनं स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. मात्र यानंतर रोहित शर्मा आणि विल जॅक या दोघांमध्ये 64 धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. डावाच्या दहाव्या षटकात विल जॅक 22 धावा करुन बाद झाला. मात्र तोपर्यंत सामन्यात मुंबईनं मजबूत आघाडी घेतली होती. यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवसह रोहित शर्मानं पुन्हा 53 धावांची अर्धशतकी भागीदारी करत संघाचा विजय जवळपास निश्चित केला. परंतु आक्रमक फटका मारण्याच्या नादात 15व्या शतकात रोहित शर्मा 70 धावांवर बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव (40) आणि तिलक वर्मा (2) यांनी अभेद्य भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.‌

हैदराबादचं टॉप ऑर्डर नेस्तनाबूत : या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. मात्र हैदराबादला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा करत हैदराबादची अवस्था 5 षटकात 4 बाद 15 धावा केली होती. ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर यांनी अचूक गोलंदाजी करत हैदराबादची टॉप ऑर्डर पूर्णपणे नेस्तनाबूत केली. आक्रमक सुरुवातीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हैदराबाद संघाला या सामन्यात उलट चित्र पाहायला मिळालं. मात्र यानंतर हेनरिक क्लासेस (71) आणि अभिनव मनोहर (43) यांनी 99 धावांची भागीदारी करत संघाला सुरुवातीच्या पडझडीतून बाहेरच काढलं नाही, तर संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचाही काम केलं. या दोघांच्या खेळीच्या बळावर हैदराबादनं निर्धारित 20 षटकात 8 बाद 143 धावांची मजल मारली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक 4 तर दीपक चहरनं दोन विकेट घेतल्या.

हैदराबादची अवस्था वाईट : यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी हैदराबादच्या फलंदाजीबाबत मोठमोठी भाकीतं वर्तवली जात होती. याची चुणूक त्यांनी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दाखवली देखील. मात्र त्या सामन्यानंतर त्यांची फलंदाजी सातत्यानं अपयशी ठरत आहे. परिणामी संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. आजचा सामना गमावल्यामुळं हैदराबादचे आता आठ सामन्यात केवळ चारच गुण झाले आहेत. प्लेऑफची फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने हे मोठ्या अंतरानं जिंकावे लागतील, तसंच इतर संघाच्या निकालावरही त्यांचं प्ले शऑफचं भवितव्य अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा :

  1. 'भारत-पाकिस्तान सामने सर्वत्र बंद करा...' IPL दिग्गजानं व्यक्त केला संताप
  2. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर BCCI नं घेतले 4 मोठे निर्णय; आजच्या IPL सामन्यावर होणार थेट परिणाम

हैदराबाद Mumbai Beat Hyderabad : येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 41व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादचा सात विकेटनं दारुण पराभव केला आहे. हैदराबादनं दिलेलं 144 धावांचं लक्ष्य मुंबईनं 16 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात आरामशीर पार केलं. यासह मुंबईनं हंगामातील पाचवा विजय मिळवत गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे, तर सनरायझर्स हैदराबादचा आठ सामन्यातील हा सहावा पराभव आहे. परिणामी त्यांचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडल्यात जमा आहे.

रोहितचं सलग दुसरं अर्धशतक : हैदराबादनं दिलेल्या 144 धावांच्या लक्षाचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या दुसऱ्याच षटकात सलामीवीर रियान रिकेलटनला जयदेव उनाडकटनं स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. मात्र यानंतर रोहित शर्मा आणि विल जॅक या दोघांमध्ये 64 धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. डावाच्या दहाव्या षटकात विल जॅक 22 धावा करुन बाद झाला. मात्र तोपर्यंत सामन्यात मुंबईनं मजबूत आघाडी घेतली होती. यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवसह रोहित शर्मानं पुन्हा 53 धावांची अर्धशतकी भागीदारी करत संघाचा विजय जवळपास निश्चित केला. परंतु आक्रमक फटका मारण्याच्या नादात 15व्या शतकात रोहित शर्मा 70 धावांवर बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव (40) आणि तिलक वर्मा (2) यांनी अभेद्य भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.‌

हैदराबादचं टॉप ऑर्डर नेस्तनाबूत : या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. मात्र हैदराबादला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा करत हैदराबादची अवस्था 5 षटकात 4 बाद 15 धावा केली होती. ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर यांनी अचूक गोलंदाजी करत हैदराबादची टॉप ऑर्डर पूर्णपणे नेस्तनाबूत केली. आक्रमक सुरुवातीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हैदराबाद संघाला या सामन्यात उलट चित्र पाहायला मिळालं. मात्र यानंतर हेनरिक क्लासेस (71) आणि अभिनव मनोहर (43) यांनी 99 धावांची भागीदारी करत संघाला सुरुवातीच्या पडझडीतून बाहेरच काढलं नाही, तर संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचाही काम केलं. या दोघांच्या खेळीच्या बळावर हैदराबादनं निर्धारित 20 षटकात 8 बाद 143 धावांची मजल मारली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक 4 तर दीपक चहरनं दोन विकेट घेतल्या.

हैदराबादची अवस्था वाईट : यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी हैदराबादच्या फलंदाजीबाबत मोठमोठी भाकीतं वर्तवली जात होती. याची चुणूक त्यांनी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दाखवली देखील. मात्र त्या सामन्यानंतर त्यांची फलंदाजी सातत्यानं अपयशी ठरत आहे. परिणामी संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. आजचा सामना गमावल्यामुळं हैदराबादचे आता आठ सामन्यात केवळ चारच गुण झाले आहेत. प्लेऑफची फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने हे मोठ्या अंतरानं जिंकावे लागतील, तसंच इतर संघाच्या निकालावरही त्यांचं प्ले शऑफचं भवितव्य अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा :

  1. 'भारत-पाकिस्तान सामने सर्वत्र बंद करा...' IPL दिग्गजानं व्यक्त केला संताप
  2. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर BCCI नं घेतले 4 मोठे निर्णय; आजच्या IPL सामन्यावर होणार थेट परिणाम
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.