ETV Bharat / sports

3 वर्षानंतर मुंबई पलटणनं 'व्हिसल पोडू'ला हरवलं; रोहित-सूर्या ठरले 'गेमचेंजर' - MI VS CSK MATCH

आयपीएल 2025 चा 38 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात, मुंबई इंडियन्सनं सहज विजय मिळवला

MI Beat CSK by 9 Wickets
3 वर्षानंतर मुंबई पलटणनं 'व्हिसल पोडू'ला हरवलं (AP)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 20, 2025 at 11:38 PM IST

1 Min Read

मुंबई MI Beat CSK by 9 Wickets : आयपीएलमध्ये खराब सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्स संघ पुनरागमन करण्यासाठी ओळखला जातो. या हंगामातही असंच काहीसं दिसून येत आहे. पहिल्या 5 सामन्यात फक्त 1 विजय मिळवणाऱ्या मुंबईने आता विजयांची हॅटट्रिक गाठली आहे. आयपीएल 2025 चा 38 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सनं 9 विकेटनं सहज विजय मिळवला आणि सीएसकेविरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला. विशेष म्हणजे मुंबईनं तिन वर्षानंतर चेन्नईला आयपीएल सामन्यात पराभूत केलं आहे. यासह त्यांनी या हंगामातील चौथा विजय मिळवत ते आता गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.

पांड्यानं जिंकली नाणेफेक : मुंबई इंडियन्सनं या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळला, ज्यात त्यांना 4 विकेट्सनं पराभव पत्करावा लागला. पण त्यांनी हा सामना जिंकून पराभवाची परतफेड केली. हार्दिक पांड्यानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. उच्च धावसंख्येच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकांत केवळ 176 धावा करता आल्या.

जडेजा-दुबेची अर्धशतकी खेळी : चेन्नई सुपर किंग्ज संघाला पहिल्या 11 षटकांत 3 गडी गमावून फक्त 73 धावा करता आल्या. यानंतर, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी अर्धशतकं झळकावली आणि त्यांच्या संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. शिवम दुबेनं 32 चेंडूत 50 धावा केल्या. त्याच वेळी, रवींद्र जडेजा 35 चेंडूत 53 धावा करून नाबाद राहिला. याशिवाय, 17 वर्षीय आयुष म्हात्रेनं 15 चेंडूत 32 धावांची खेळी केली. सलामीवीर शेख रशीदनंही 19 धावांचं योगदान दिलं. दुसरीकडे, मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 2 बळी घेतले. दीपक चहर, अश्विनी कुमार आणि मिचेल सँटनर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

रोहितचं नाबाद अर्धशतक : या सामन्यात रोहित शर्मानं दमदार खेळी केली आणि त्याच्या संघासाठी धावांचा पाठलाग करणं सोपं केलं. त्यानं या हंगामातील पहिलं अर्धशतक झळकावलं. त्याचं फॉर्ममध्ये पुनरागमन हे मुंबईसाठी चांगले संकेत आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त, सूर्यकुमार यादवनंही अर्धशतकी खेळी केली. रोहितनं नाबाद 76 आणि सूर्यानं नाबाद 68 धावा केल्या आणि मुंबईने हा सामना 9 विकेट्सनं जिंकला.

हेही वाचा :

  1. मुल्लानपूर झालं 'बदलापूर'... RCB नं 48 तासांत घेतला पराभवाचा बदला; गुणतालिकेत भूकंप
  2. मुंबईचा मराठमोळा खेळाडू CSK कडून मुंबईविरुद्ध करणार IPL पदार्पण? चेन्नई संघात होणार मोठा बदल

मुंबई MI Beat CSK by 9 Wickets : आयपीएलमध्ये खराब सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्स संघ पुनरागमन करण्यासाठी ओळखला जातो. या हंगामातही असंच काहीसं दिसून येत आहे. पहिल्या 5 सामन्यात फक्त 1 विजय मिळवणाऱ्या मुंबईने आता विजयांची हॅटट्रिक गाठली आहे. आयपीएल 2025 चा 38 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सनं 9 विकेटनं सहज विजय मिळवला आणि सीएसकेविरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला. विशेष म्हणजे मुंबईनं तिन वर्षानंतर चेन्नईला आयपीएल सामन्यात पराभूत केलं आहे. यासह त्यांनी या हंगामातील चौथा विजय मिळवत ते आता गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.

पांड्यानं जिंकली नाणेफेक : मुंबई इंडियन्सनं या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळला, ज्यात त्यांना 4 विकेट्सनं पराभव पत्करावा लागला. पण त्यांनी हा सामना जिंकून पराभवाची परतफेड केली. हार्दिक पांड्यानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. उच्च धावसंख्येच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकांत केवळ 176 धावा करता आल्या.

जडेजा-दुबेची अर्धशतकी खेळी : चेन्नई सुपर किंग्ज संघाला पहिल्या 11 षटकांत 3 गडी गमावून फक्त 73 धावा करता आल्या. यानंतर, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी अर्धशतकं झळकावली आणि त्यांच्या संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. शिवम दुबेनं 32 चेंडूत 50 धावा केल्या. त्याच वेळी, रवींद्र जडेजा 35 चेंडूत 53 धावा करून नाबाद राहिला. याशिवाय, 17 वर्षीय आयुष म्हात्रेनं 15 चेंडूत 32 धावांची खेळी केली. सलामीवीर शेख रशीदनंही 19 धावांचं योगदान दिलं. दुसरीकडे, मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 2 बळी घेतले. दीपक चहर, अश्विनी कुमार आणि मिचेल सँटनर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

रोहितचं नाबाद अर्धशतक : या सामन्यात रोहित शर्मानं दमदार खेळी केली आणि त्याच्या संघासाठी धावांचा पाठलाग करणं सोपं केलं. त्यानं या हंगामातील पहिलं अर्धशतक झळकावलं. त्याचं फॉर्ममध्ये पुनरागमन हे मुंबईसाठी चांगले संकेत आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त, सूर्यकुमार यादवनंही अर्धशतकी खेळी केली. रोहितनं नाबाद 76 आणि सूर्यानं नाबाद 68 धावा केल्या आणि मुंबईने हा सामना 9 विकेट्सनं जिंकला.

हेही वाचा :

  1. मुल्लानपूर झालं 'बदलापूर'... RCB नं 48 तासांत घेतला पराभवाचा बदला; गुणतालिकेत भूकंप
  2. मुंबईचा मराठमोळा खेळाडू CSK कडून मुंबईविरुद्ध करणार IPL पदार्पण? चेन्नई संघात होणार मोठा बदल
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.