ETV Bharat / sports

3269 दिवसांनंतर पांड्याची अर्धशतकी खेळी, RCB चा गुणतालिकेत धमाका; गुजरातला न खेळताच धक्का - DC VS RCB MATCH

आयपीएल 2025 च्या 46व्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सनं पराभव करुन पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं.

RCB Top of Points Table
कृणाल पांड्या (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 28, 2025 at 9:37 AM IST

1 Min Read

दिल्ली RCB Top of Points Table : विराट कोहली आणि कृणाल पांड्या यांच्या शानदार फलंदाजीमुळं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सनं पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीनं 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबी संघानं विराट कोहली आणि कृणाल पांड्याच्या शानदार अर्धशतकांच्या मदतीनं 18.3 षटकांत 4 विकेट्स गमावून 163 धावांचं लक्ष्य गाठलं. विराट कोहलीनं 51 धावांची शानदार खेळी केली. त्यानं आपल्या अर्धशतकी खेळीत 4 चौकार मारले. त्याच वेळी, कृणाल पांड्यानं 9 वर्षांनंतर अर्धशतक ठोकण्याचा चमत्कार केला. कृणालनं 47 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्यानं 5 चौकार आणि 4 षटकार मारले. टिम डेव्हिडनं 5 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारुन 19 धावांची जलद खेळी केली आणि नाबाद परतला.

आरसीबी संघ अव्वल स्थानावर : आरसीबीनं या हंगामात 7 सामने जिंकले आहेत आणि घराबाहेर खेळलेले सर्व 6 सामने जिंकण्याचा शानदार पराक्रम केला आहे. एवढंच नाही तर, आरसीबीनं या हंगामात लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व चारही सामने जिंकले आहेत. दिल्लीचा पराभव करताच आरसीबीचे 14 गुण झाले असून ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाले आहे. तर गुजरात टायटन्स संघ टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. मुंबई इंडियन्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईचे 12 गुण आहेत. तर दिल्ली 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

भुवीचा गोलंदाजीत पराक्रम : तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या आरसीबी संघानं भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर यजमान दिल्ली कॅपिटल्सला 162/8 धावांवर रोखलं. आरसीबीसाठी भुवनेश्वरनं चार षटकांत 33 धावांत तीन बळी घेतले तर जोश हेझलवूडनं 2 बळी घेतले. अशाप्रकारे जोश हेझलवूडनं 10 सामन्यांत 18 बळी घेत पर्पल कॅप जिंकली.

दिल्लीची फलंदाजी अपयशी : दिल्लीचे फलंदाज त्यांच्याच घरच्या मैदानात आरसीबीच्या गोलंदाजीविरुद्ध मोकळेपणाने खेळू शकले नाहीत. फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलनं सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. मात्र यासाठी त्याला 39 चेंडूंचा सामना करावा लागला आणि तो एकही षटकार मारु शकला नाही. ट्रिस्टन स्टब्सनं 18 चेंडूत 34 धावा केल्या. केएल आणि स्टब्स व्यतिरिक्त, इतर कोणताही फलंदाज 30 धावांचा टप्पाही ओलांडू शकला नाही.

हेही वाचा :

  1. बुमराह-बोल्टची घातक गोलंदाजी, मुंबईचा सलग पाचवा विजय; DC, RCB ला धक्का गुणतालिकेत भूकंप
  2. IPL 2025 मध्ये आज दुसऱ्यांदा भिडणार DC vs RCB... कसं असेल वातावरण, पाऊस पडेल का? वाचा

दिल्ली RCB Top of Points Table : विराट कोहली आणि कृणाल पांड्या यांच्या शानदार फलंदाजीमुळं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सनं पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीनं 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबी संघानं विराट कोहली आणि कृणाल पांड्याच्या शानदार अर्धशतकांच्या मदतीनं 18.3 षटकांत 4 विकेट्स गमावून 163 धावांचं लक्ष्य गाठलं. विराट कोहलीनं 51 धावांची शानदार खेळी केली. त्यानं आपल्या अर्धशतकी खेळीत 4 चौकार मारले. त्याच वेळी, कृणाल पांड्यानं 9 वर्षांनंतर अर्धशतक ठोकण्याचा चमत्कार केला. कृणालनं 47 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्यानं 5 चौकार आणि 4 षटकार मारले. टिम डेव्हिडनं 5 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारुन 19 धावांची जलद खेळी केली आणि नाबाद परतला.

आरसीबी संघ अव्वल स्थानावर : आरसीबीनं या हंगामात 7 सामने जिंकले आहेत आणि घराबाहेर खेळलेले सर्व 6 सामने जिंकण्याचा शानदार पराक्रम केला आहे. एवढंच नाही तर, आरसीबीनं या हंगामात लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व चारही सामने जिंकले आहेत. दिल्लीचा पराभव करताच आरसीबीचे 14 गुण झाले असून ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाले आहे. तर गुजरात टायटन्स संघ टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. मुंबई इंडियन्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईचे 12 गुण आहेत. तर दिल्ली 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

भुवीचा गोलंदाजीत पराक्रम : तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या आरसीबी संघानं भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर यजमान दिल्ली कॅपिटल्सला 162/8 धावांवर रोखलं. आरसीबीसाठी भुवनेश्वरनं चार षटकांत 33 धावांत तीन बळी घेतले तर जोश हेझलवूडनं 2 बळी घेतले. अशाप्रकारे जोश हेझलवूडनं 10 सामन्यांत 18 बळी घेत पर्पल कॅप जिंकली.

दिल्लीची फलंदाजी अपयशी : दिल्लीचे फलंदाज त्यांच्याच घरच्या मैदानात आरसीबीच्या गोलंदाजीविरुद्ध मोकळेपणाने खेळू शकले नाहीत. फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलनं सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. मात्र यासाठी त्याला 39 चेंडूंचा सामना करावा लागला आणि तो एकही षटकार मारु शकला नाही. ट्रिस्टन स्टब्सनं 18 चेंडूत 34 धावा केल्या. केएल आणि स्टब्स व्यतिरिक्त, इतर कोणताही फलंदाज 30 धावांचा टप्पाही ओलांडू शकला नाही.

हेही वाचा :

  1. बुमराह-बोल्टची घातक गोलंदाजी, मुंबईचा सलग पाचवा विजय; DC, RCB ला धक्का गुणतालिकेत भूकंप
  2. IPL 2025 मध्ये आज दुसऱ्यांदा भिडणार DC vs RCB... कसं असेल वातावरण, पाऊस पडेल का? वाचा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.