ETV Bharat / sports

चेन्नई-मुंबई 5, कोलकाता 3... आतापर्यंत कोणत्या संघानं किती वेळा जिंकलं IPL? वाचा यादी - ALL SEASON WINNERS

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2008 मध्ये सुरु झाली आणि तेव्हापासून या स्पर्धेनं क्रिकेट चाहत्यांना खूप उत्साह दिला आहे.

all season winners and runner up list
आतापर्यंत कोणत्या संघानं किती वेळा जिंकलं IPL? (ETV Bharat Graphics)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : June 3, 2025 at 11:40 PM IST

1 Min Read

अहमदाबाद IPL Winners List : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2008 मध्ये सुरु झाली आणि तेव्हापासून या स्पर्धेनं क्रिकेट चाहत्यांना खूप उत्साह दिला आहे. दरवर्षी एक नवीन संघ विजेता म्हणून उदयास येतो, तर काही संघांनी स्पर्धेत वर्चस्व गाजवलं आहे. आयपीएलच्या 18 व्या हंगामात, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्ज संघात अंतिम सामना झाला. या सामन्यात आरसीबीनं 6 धावांनी विजय मिळवत विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे.

खेळाडूंसाठी पर्वणी : ही अशी स्पर्धा आहे ज्यानं त्या खेळाडूंना रातोरात चमकवलं ज्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळत नव्हती. इतकंच नाही तर या स्पर्धेत अशा अज्ञात खेळाडूंनाही परत आणलं ज्यांना राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं असेल किंवा ज्यांची कारकीर्द ठप्प झाली असेल. त्यांना पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळाली.

कोणत्या संघानं खेळल्या सर्वाधिक वेळा फायनल : स्पर्धेच्या इतिहासत चेन्नई सुपर किंग्जनं सर्वाधिक वेळा (10) आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्सनं सहा वेळा आणि केकेआरनं 4 वेळा अंतिम फेरी गाठली आहे. चेन्नई सुपर किंग्जनं 10 पैकी पाच वेळा विजेतेपद जिंकलं आहे आणि पाच वेळा उपविजेतेपद मिळवलं आहे.

all season winners and runner up list
आतापर्यंत कोणत्या संघानं किती वेळा जिंकलं IPL? (ETV Bharat Graphics)

मुंबईनं जिंकल्या 6 पैकी 5 फायनल : तर मुंबईनं सहा पैकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय चार वेळा फायनल खेळलेल्या केकेआर संघानं ३ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. आरसीबी संघानंही 3 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु आजपर्यंत त्यांना एकही विजेतेपद जिंकता आलेलं नाही.

गुजरातही राहिला विजेता : दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांनीही प्रत्येकी एकदा अंतिम सामना खेळला आहे. ज्यामध्ये 2008 च्या पहिल्या आयपीएल हंगामात आरआरनं विजेतेपद जिंकलं होतं, तर पंजाब-दिल्ली संघांना एकही विजेतेपद जिंकता आलं नव्हतं. गुजरात टायटन्सनं 2022 मध्ये पदार्पण केलं आणि आतापर्यंत त्यांनी दोनदा आयपीएल फायनल खेळली आहे.

हेही वाचा :

  1. च्या मारी...! ODI सामन्यापूर्वी 'ट्राफीक'मध्ये अडकला संघ, सायकल चालवत मैदानावर पोहोचले खेळाडू; पाहा व्हिडिओ
  2. बंगळुरु-पंजाब यांच्यातील फायनल सामना रद्द झाल्यास कोण होणार नवा विजेता? BCCI चा नियम काय, वाचा

अहमदाबाद IPL Winners List : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2008 मध्ये सुरु झाली आणि तेव्हापासून या स्पर्धेनं क्रिकेट चाहत्यांना खूप उत्साह दिला आहे. दरवर्षी एक नवीन संघ विजेता म्हणून उदयास येतो, तर काही संघांनी स्पर्धेत वर्चस्व गाजवलं आहे. आयपीएलच्या 18 व्या हंगामात, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्ज संघात अंतिम सामना झाला. या सामन्यात आरसीबीनं 6 धावांनी विजय मिळवत विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे.

खेळाडूंसाठी पर्वणी : ही अशी स्पर्धा आहे ज्यानं त्या खेळाडूंना रातोरात चमकवलं ज्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळत नव्हती. इतकंच नाही तर या स्पर्धेत अशा अज्ञात खेळाडूंनाही परत आणलं ज्यांना राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं असेल किंवा ज्यांची कारकीर्द ठप्प झाली असेल. त्यांना पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळाली.

कोणत्या संघानं खेळल्या सर्वाधिक वेळा फायनल : स्पर्धेच्या इतिहासत चेन्नई सुपर किंग्जनं सर्वाधिक वेळा (10) आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्सनं सहा वेळा आणि केकेआरनं 4 वेळा अंतिम फेरी गाठली आहे. चेन्नई सुपर किंग्जनं 10 पैकी पाच वेळा विजेतेपद जिंकलं आहे आणि पाच वेळा उपविजेतेपद मिळवलं आहे.

all season winners and runner up list
आतापर्यंत कोणत्या संघानं किती वेळा जिंकलं IPL? (ETV Bharat Graphics)

मुंबईनं जिंकल्या 6 पैकी 5 फायनल : तर मुंबईनं सहा पैकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय चार वेळा फायनल खेळलेल्या केकेआर संघानं ३ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. आरसीबी संघानंही 3 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु आजपर्यंत त्यांना एकही विजेतेपद जिंकता आलेलं नाही.

गुजरातही राहिला विजेता : दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांनीही प्रत्येकी एकदा अंतिम सामना खेळला आहे. ज्यामध्ये 2008 च्या पहिल्या आयपीएल हंगामात आरआरनं विजेतेपद जिंकलं होतं, तर पंजाब-दिल्ली संघांना एकही विजेतेपद जिंकता आलं नव्हतं. गुजरात टायटन्सनं 2022 मध्ये पदार्पण केलं आणि आतापर्यंत त्यांनी दोनदा आयपीएल फायनल खेळली आहे.

हेही वाचा :

  1. च्या मारी...! ODI सामन्यापूर्वी 'ट्राफीक'मध्ये अडकला संघ, सायकल चालवत मैदानावर पोहोचले खेळाडू; पाहा व्हिडिओ
  2. बंगळुरु-पंजाब यांच्यातील फायनल सामना रद्द झाल्यास कोण होणार नवा विजेता? BCCI चा नियम काय, वाचा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.