दिल्ली DC vs MI Match : आयपीएल 2025 चा 29वा लीग सामना आज म्हणजेच 12 एप्रिल (रविवार) रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता सुरु होईल.
पलटन, दहावी-A ची मंडळी are ready for matchday masti 🎙🤓
— Mumbai Indians (@mipaltan) April 13, 2025
Catch all the fun & charcha on #MILIVE, presented by Lattafa Perfumes, streaming from 6:30 PM today! 🕡#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/bXJFjpkqxZ
दोन्ही संघांची कामगिरी कशी : अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली, दिल्ली कॅपिटल्स संघानं या हंगामात मैदानावर एकतर्फी कामगिरी दाखवली आहे, ज्यात त्यांनी 4 सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. परिणामी सध्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे, जर आपण मुंबई इंडियन्स संघाबद्दल बोललो तर, हा हंगाम त्यांच्यासाठी आतापर्यंत खूपच वाईट राहिला आहे, ज्यात त्यांना 5 सामने खेळल्यानंतर फक्त एकच सामना जिंकता आला आहे.
Aaj ki mehfil, apne ghar mein 💙❤️ pic.twitter.com/iUhspzzBA7
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 13, 2025
दिल्लीची खेळपट्टी कशी असेल : एकेकाळी दिल्लीची खेळपट्टी संथ आणि कमी धावसंख्येसाठी ओळखली जात होती. पण आता ती फलंदाजांची आवडती बनली आहे. यामुळंच आता इथं उच्च धावसंख्या असलेले सामने पाहिले जातात. गेल्या वर्षी झालेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये (DPL) फलंदाजांनी खूप धावा केल्या होत्या. यात काही सामन्यांमध्ये 250 पेक्षा जास्त धावा झाल्या. इथं नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. दरम्यान, सामन्याच्या दिवशी दिल्लीत पावसाचा अंदाज नाही आणि हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे.
Start your Sunday the MI way 🌞💙
— Mumbai Indians (@mipaltan) April 13, 2025
Watch today’s #MIDaily now & get into the game day mood 🎥 👉 https://t.co/efnvlPMHSf#MumbaiIndians #PlayLikeMumbai #DCvMI pic.twitter.com/ydSunN1OF2
मैदानाचा विक्रम कसा : या मैदानावर आतापर्यंत 14 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं 9 वेळा विजय मिळवला आहे. मात्र आयपीएल 2024 मध्ये या मैदानावर खेळल्या गेलेल्या सर्व 5 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं विजय मिळवला. गेल्या वेळी दिल्लीनं याच मैदानावर लखनौला 19 धावांनी हरवलं होतं.
Ebix karo aur Dil se Dilli ko support karo 💙❤️ pic.twitter.com/VUiUv7XNKg
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 13, 2025
हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : आयपीएलमधील दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डवर नजर टाकल्यास, मुंबई इंडियन्सचा संघ थोडा वरचढ असल्याचं दिसून येतं, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये आतापर्यंत 35 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी दिल्लीच्या संघानं 16 सामने जिंकले आहेत, तर मुंबई इंडियन्सच्या संघानं 19 सामने जिंकले आहेत.
Capital city. Maximum energy. Matchday’s here ⚔️🔥#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #DCvMI pic.twitter.com/91taC4OD8S
— Mumbai Indians (@mipaltan) April 13, 2025
राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये : दिल्लीचा स्टार फलंदाज केएल राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यानं शेवटच्या सामन्यात 93 धावा केल्या आणि आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये 185 धावा केल्या आहेत. मधल्या फळीत, स्टब्स आणि आशुतोष शर्मा देखील सतत उपयुक्त योगदान देत आहेत. राहुलला मधल्या फळीत फलंदाजी करायला लावणं संघासाठी उपयुक्त ठरत आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्यानं सलग दोन अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र जॅक फ्रेझर मॅकगर्क संघासाठी चिंतेचा विषय आहे. दरम्यान, दुखापतीनंतर फाफ डु प्लेसिसही चांगल्या लयीत दिसत नाही.
बोल्ट-बुमराहपासून सावध राहण्याची गरज : जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टची जोडी मुंबईच्या गोलंदाजीत मोठं आव्हान निर्माण करु शकते. त्यांच्यासोबत दीपक चहर आणि युवा फिरकी गोलंदाज विघ्नेशही फॉर्ममध्ये आहेत. जर हे त्रिकूट चांगलं काम करत राहिलं तर मुंबई इंडियन्स मैदानावर दिल्ली कॅपिटल्सवर वर्चस्व गाजवू शकेल.
Ab ROAR machega 🐅
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 13, 2025
Taiyaar ho Dilliwalon? 💙❤️ pic.twitter.com/p2vEuUiBGt
रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय : रोहित शर्माचा खराब फॉर्म मुंबईसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्याच्यासोबत, विल जॅक्सलाही अद्याप फलंदाजीनं प्रभावित करता आलेलं नाही. जर दोघांचीही कामगिरी सुधारली तर मुंबईचं पुनरागमन शक्य आहे. संघाला सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्याकडूनही चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. फिनिशर म्हणून, हार्दिक संघाला विजय मिळवून देण्यातही अपयशी ठरत आहे.
दिल्लीच्या गोलंदाजीला धार : या हंगामात दिल्लीची गोलंदाजी उत्कृष्ट राहिली आहे. कर्णधार अक्षर पटेल आणि मिशेल स्टार्क यांच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी प्रत्येक सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. फिरकीमध्ये कुलदीप यादवही संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. याशिवाय मोहित शर्मा आणि मुकेश कुमार यांची गोलंदाजी देखील संघासाठी उपयुक्त ठरेल.
हेही वाचा :