ETV Bharat / politics

महायुतीत अजित पवारांचं वजन वाढल्यानं एकनाथ शिंदे नाराज? पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीतील 'इनकमिंग' वाढलं! - AJIT PAWAR NCP INCOMING

अर्थखात्यामुळं अजित पवारांचं राजकीय वर्तुळात वजन वाढलं आहे. अनेक नेते सध्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी इच्छूक असल्यानं एकनाथ शिंदेंच्या नाराजीत वाढ झाली आहे.

eknath shinde ajit pawar
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री अजित पवार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 18, 2025 at 11:49 PM IST

1 Min Read

सातारा - राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी महायुतीत दोन नंबरचे नेते म्हणून आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं असून ते नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवारांचं महायुतीतील वजन पाहता राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू झालं आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यातील अनेक नेते राष्ट्रवादी प्रवेशासाठी रांगेत असून येत्या तीन-चार दिवसात त्यांचाही प्रवेश होणार आहे.

महायुतीत अजित पवारांचं वजन का वाढलं? : अजित पवार हे महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत. त्यामुळं अनेक नेते अजित पवारांच्या संपर्कात येत आहेत. मतदार संघातील कामे मार्गी लावायची असतील तर अजितदादांबरोबर गेलं पाहिजे, अशी इच्छा कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडे व्यक्त करत आहेत. मतदार संघावरील पकड पुन्हा घट्ट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव साखर पट्ट्यातील नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांसोबत जाण्यास पसंती दिली आहे. त्यामुळंच अजित पवारांचं महायुतीत वजन वाढल्याचं आणि एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळतंय.

सांगली जिल्ह्यातील मातब्बरांचा लवकरच प्रवेश : सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे यांच्यासह माजी आमदार विलासराव जगताप, आणि राजेंद्र आण्णा देशमुख या चार माजी आमदारांचा येत्या तीन-चार दिवसांत अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. चौघांपैकी शिवाजीराव नाईक आणि राजेंद्र आण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. विलासराव जगताप हे भाजपमधून बाहेर पडले आहेत तर अजितराव घोरपडे सध्या कोणत्याच पक्षात नाहीत. विधानसभा निवडणुकीत चौघांच्याही वाट्याला अपयश आल्यानं राजकीय भवितव्यासाठी कोणत्या पक्षात जायचं, याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्या चार बैठका झाल्या. अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अजित पवारांशी देखील त्यांची चर्चा झाली असल्याचं कळतंय.

कराडमधून सुरू होणार अजितदादांची घोडदौड : कराड दक्षिणमधील काँग्रेसचे माजी मंत्री, लोकनेते विलासकाका उंडाळकरांचे सुपूत्र ॲड. उदयसिंह पाटील हे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. त्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. उंडाळकर कुटुंबाची मूळ विचारधारा काँग्रेसची आहे. त्यामुळं भाजप ऐवजी काँग्रेसशी मिळती जुळती विचारधारा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे अजितदादांची राजकीय घोडदौड कराडमधून सुरू होणार आहे.

हेही वाचा - 'ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही, तेच हिंदी भाषेचा विरोध करतात'; अजित पवारांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका

सातारा - राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी महायुतीत दोन नंबरचे नेते म्हणून आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं असून ते नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवारांचं महायुतीतील वजन पाहता राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू झालं आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यातील अनेक नेते राष्ट्रवादी प्रवेशासाठी रांगेत असून येत्या तीन-चार दिवसात त्यांचाही प्रवेश होणार आहे.

महायुतीत अजित पवारांचं वजन का वाढलं? : अजित पवार हे महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत. त्यामुळं अनेक नेते अजित पवारांच्या संपर्कात येत आहेत. मतदार संघातील कामे मार्गी लावायची असतील तर अजितदादांबरोबर गेलं पाहिजे, अशी इच्छा कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडे व्यक्त करत आहेत. मतदार संघावरील पकड पुन्हा घट्ट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव साखर पट्ट्यातील नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांसोबत जाण्यास पसंती दिली आहे. त्यामुळंच अजित पवारांचं महायुतीत वजन वाढल्याचं आणि एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळतंय.

सांगली जिल्ह्यातील मातब्बरांचा लवकरच प्रवेश : सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे यांच्यासह माजी आमदार विलासराव जगताप, आणि राजेंद्र आण्णा देशमुख या चार माजी आमदारांचा येत्या तीन-चार दिवसांत अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. चौघांपैकी शिवाजीराव नाईक आणि राजेंद्र आण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. विलासराव जगताप हे भाजपमधून बाहेर पडले आहेत तर अजितराव घोरपडे सध्या कोणत्याच पक्षात नाहीत. विधानसभा निवडणुकीत चौघांच्याही वाट्याला अपयश आल्यानं राजकीय भवितव्यासाठी कोणत्या पक्षात जायचं, याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्या चार बैठका झाल्या. अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अजित पवारांशी देखील त्यांची चर्चा झाली असल्याचं कळतंय.

कराडमधून सुरू होणार अजितदादांची घोडदौड : कराड दक्षिणमधील काँग्रेसचे माजी मंत्री, लोकनेते विलासकाका उंडाळकरांचे सुपूत्र ॲड. उदयसिंह पाटील हे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. त्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. उंडाळकर कुटुंबाची मूळ विचारधारा काँग्रेसची आहे. त्यामुळं भाजप ऐवजी काँग्रेसशी मिळती जुळती विचारधारा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे अजितदादांची राजकीय घोडदौड कराडमधून सुरू होणार आहे.

हेही वाचा - 'ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही, तेच हिंदी भाषेचा विरोध करतात'; अजित पवारांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.