ETV Bharat / opinion

भारत संयुक्त अरब अमिरात संबंधांची मजबुतीच्या दिशेने वाटचाल - INDIA AND UNITED ARAB EMIRATES

शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम यांच्या भारत भेटीनंतर भारत आणि युएईमधील संबंध अधिक दृढ झाले आहेत. वाचा यासंदर्भातील हर्ष कक्कर यांचा लेख.

दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम आणि नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट
दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम आणि नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट (PIB)
author img

By Major General Harsha Kakar

Published : April 15, 2025 at 7:40 PM IST

Updated : April 15, 2025 at 8:01 PM IST

4 Min Read

दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम यांनी अलिकडेच भारत दौरा केला. ते युएईचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री देखील आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान, संरक्षण, परराष्ट्र तसेच उद्योग आणि पुरवठा मंत्री यांच्यासह अनेक बैठका झाल्या. काही करारांवर स्वाक्षरीही करण्यात आली.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भेटीनंतर ट्विट केले की, ‘दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल-मकतूम यांना भेटून आनंद झाला. भारत-यूएई व्यापक धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यात दुबईने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही विशेष भेट आमच्या घनिष्ठ मैत्रीला पुन्हा पुष्टी देते आणि भविष्यात आणखी मजबूत सहकार्याचा मार्ग मोकळा करते.’ गेल्या काही वर्षांत भारत-यूएई संबंध वाढत आहेत.

युवराजांनी ट्विट केले, ‘आमच्या संभाषणातून युएई-भारत संबंधांच्या बळकटीची पुष्टी झाली, जे विश्वासावर बांधलेले आहेत, इतिहासाने आकारलेले आहेत आणि संधी, नावीन्य तसंच शाश्वत समृद्धीने भरलेले भविष्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाने प्रेरित आहेत.’ युएईमध्ये सुमारे ४० लाख भारतीय लोक राहतात, ज्यापैकी बहुतेक जण दुबई आणि त्याच्या आसपास राहतात आणि काम करतात. युएई हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताचा दुसरा सर्वात मोठा निर्यात होणारा देश आहे आणि थेट परकीय गुंतवणुकीचा चौथा सर्वात मोठा स्रोत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०२५ रोजी नवी दिल्ली येथे दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची गळाभेट घेतली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०२५ रोजी नवी दिल्ली येथे दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची गळाभेट घेतली (PIB)

मध्य पूर्वेतून भारताची कच्च्या तेलाची आयात जानेवारी २०२५ मध्ये ५१% (डिसेंबर २०२४) वरून ५३.८९% पर्यंत वाढली. हे सुरक्षित असणे आवश्यक आहे, म्हणूनच संरक्षण सहकार्याला महत्त्व प्राप्त होते. युएईचे संरक्षण मंत्री असलेल्या क्राउन प्रिन्सनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा देखील केली. संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘दोन्ही नेत्यांनी सक्रिय तटरक्षक सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सामंजस्य कराराद्वारे या गोष्टीला औपचारिक स्वरुप देऊन संबंध अधिक मजबूत केले. संरक्षण उद्योगांमधील जवळचे सहकार्य हा द्विपक्षीय सहकार्याचा अविभाज्य भाग असावा यावर त्यांना विश्वास होता.’

राजनाथ सिंह म्हणाले, ‘येत्या काही वर्षांत, आम्ही संरक्षण सहकार्य, सह-उत्पादन आणि सह-विकास प्रकल्प, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत. भारत आणि युएई दोघेही या प्रदेशात शांतता आणि समृद्धीसाठी काम करण्यास वचनबद्ध आहेत.’ असे नाही की भारत आणि युएईमध्ये सध्या लष्करी सहभागाची कमतरता आहे.

दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम आणि नरेंद्र मोदी
दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम आणि नरेंद्र मोदी (PIB)

अबू धाबीमधील भारतीय दूतावासाने त्यांच्या वेबसाइटवर संरक्षण सहकार्याबद्दल उल्लेख केला आहे की, ‘दोन्ही देशांमध्ये खाते प्रमुखांच्या पातळीवर नियमित उच्च-स्तरीय देवाणघेवाण, कार्यात्मक पातळीवरील देवाणघेवाण आणि लष्करी शिक्षण देवाणघेवाण झाली आहे. दोन्ही देशांच्या नौदलाच्या जहाजांनी नियमितपणे द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी संवाद केला केला आहे.’

वेबसाईटवर पुढे म्हटले आहे की, ‘भारत आणि युएई सुरक्षा आणि संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वार्षिक संरक्षण संवाद आयोजित करतात. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य मंत्रालय स्तरावर संयुक्त संरक्षण सहकार्य समिती आणि मुख्यालय स्तरावर नौदल कर्मचारी चर्चेद्वारे चालवले जाते.’ दोन्ही बाजूंमधील कार्यात्मक सहकार्य वाढवणे हा याचा हेतू आहे.

भारत आणि युएईने यापूर्वी संयुक्त नौदल आणि हवाई सराव केले आहेत. दोन्ही देशांच्या नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांनी एकमेकांच्या बंदरांना भेटी दिल्या आहेत. २०१५ पासून भारताने अबूधाबी मिशनमध्ये संरक्षण संलग्नक नियुक्त केले आहे. ज्यामुळे सहकार्य वाढले आहे. भारताकडे सध्या ओमानमध्ये लष्कराचे एक हक्काचे ठिकाण आहे आणि या प्रदेशातील मस्कत नौदल तळावर बर्थिंग अधिकारही भारताला आहेत. दोन्ही देशांच्या तटरक्षक दलाची जहाजे एकमेकांच्या बंदरांना भेट देतात आणि संयुक्त सराव देखील करतात.

दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम आणि नरेंद्र मोदी
दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम आणि नरेंद्र मोदी चर्चा करताना (PIB)

युएई आणि भारतीय शिष्टमंडळांनी दोन्ही देशांमध्ये आयोजित केलेल्या हवाई शोमध्ये भाग घेतला. सोमाली चाचेगिरी आणि हुथी बंडखोरांविरुद्ध भारतीय नौदलाने केलेल्या कारवाईमुळे त्यांच्या पारंपारिक बचावात्मक दृष्टिकोनातून आक्रमक दृष्टिकोनाकडे बदल दिसून येतो आणि मध्य पूर्वेतील त्यांच्या मित्र राष्ट्रांना फायदा होतो कारण त्यांच्याकडे या धोक्यांना रोखण्यासाठी लष्करी शक्ती नाही. लष्करी गुप्तचर माहिती सामायिकरण संरक्षण संबंधांमध्ये एक आधारस्तंभ आहे.

भारतीय सशस्त्र दल आणि युएई यांच्यातील संयुक्त सरावांमुळे परस्पर कार्यक्षमता वाढली आहे आणि 'मेक इन इंडिया' उपकरणे देखील चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रदेशात भारताला निव्वळ सुरक्षा प्रदाता म्हणून देखील मान्यता मिळालेली आहे. सध्याच्या भेटीदरम्यान, 'मेक इन इंडिया' आणि 'मेक इन द एमिरेट्स' उपक्रमांतर्गत संरक्षण उपकरणांच्या संयुक्त उत्पादनावर चर्चा झाली. भारताने युएईला स्वदेशी आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली देखील देऊ केल्या. युएईने ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्यावर चर्चा सुरू आहे.

सुरक्षा वाढवण्यासाठी तटरक्षक दलाच्या सहकार्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्याची स्थिती समाधानकारक मानली जात असली तरी, दोन्ही बाजूंमधील कराराद्वारे यात आणखी मजबूती यायला पाहिजे. संरक्षण करार आधीच अस्तित्वात असल्याने अतिरिक्त सामंजस्य करार म्हणून ते आवश्यक आहे.

सामूहिक छायाचित्रात दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि इतर
सामूहिक छायाचित्रात दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि इतर (PIB)

भारत युएईबरोबर आर्थिक भागीदारी वाढवत आहे, विशेषतः IMEEC (भारत, मध्य पूर्व, युरोप आर्थिक कॉरिडॉर) मध्ये जसजशी आपुलकी वाढत आहे तसतसे हे प्राधान्यानं घडत आहे. सध्या चालू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षामुळे मात्र यात थोडा खोडा पडला आहे. भारत आणि UAE हे I2U2 (भारत, इस्रायल, अमेरिका आणि UAE गट) चे सदस्य आहेत. दोन्ही धोरणात्मक हेतू असलेले आर्थिक गट आहेत. हे बायडेन प्रशासनाने सुरू केले होते आणि सध्याच्या अमेरिकन प्रशासनाकडून त्यांना पाठिंबा आहे.

UAE आणि इतर अरब देश देखील भारतीय नौदलाच्या नेतृत्वाखालील हिंदी महासागर नौदल समन्वयाचे सदस्य आहेत. याची स्थापना २००८ मध्ये झाली. हे एक हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरील देशांच्या नौदल प्रमुखांना भेटण्यासाठी आणि द्विपक्षीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ आहे. दर दोन वर्षांनी याची बैठक होत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये UAE ला शेवटची भेट दिली होती. तिथे द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. यावेळी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान मोदी या महिन्याच्या अखेरीस सौदी अरेबियाला भेट देणार आहेत. संयुक्त सराव आणि इतर विषयांसह वाढत्या लष्करी देवाणघेवाणीसह दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार आहे. भारत लष्करी उपकरणे निर्यात करण्याचा देखील प्रयत्न करत आहे. मध्य पूर्वेतील भारताची वाढती जवळीक, ज्यामध्ये लष्करी करारांचा समावेश आहे, यातून पाकिस्तानचा प्रभाव कमी होतो त्याचबरोबर त्यांच्यावर दबावही वाढवते.

भारत आणि युएईचे बहुआयामी संबंध आहेत ज्यात व्यापार, लष्करी मुत्सद्देगिरी आणि गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण यांचा समावेश आहे. भारतीय सुरक्षा संस्थांनी शोधलेल्या अनेकांना मध्य पूर्वेतून हद्दपार करण्यात आले आहे. दहशतवादविरोधी आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात वाढलेले सहकार्य देखील यात जोडले गेले आहे. युएईकडे भारतातील संरक्षण संशोधनासाठी निधी देण्यासाठी संसाधने देखील आहेत, ज्याचा दोन्ही देशांना फायदा होईल. अलीकडील भेटीमुळे युएई आणि भारत यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढेल यात शंकाच नाही.

टीप : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक आहेत. येथे मांडलेली तथ्ये आणि मतांशी ईटीव्ही भारत सहमत असेलच असे नाही.

दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम यांनी अलिकडेच भारत दौरा केला. ते युएईचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री देखील आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान, संरक्षण, परराष्ट्र तसेच उद्योग आणि पुरवठा मंत्री यांच्यासह अनेक बैठका झाल्या. काही करारांवर स्वाक्षरीही करण्यात आली.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भेटीनंतर ट्विट केले की, ‘दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल-मकतूम यांना भेटून आनंद झाला. भारत-यूएई व्यापक धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यात दुबईने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही विशेष भेट आमच्या घनिष्ठ मैत्रीला पुन्हा पुष्टी देते आणि भविष्यात आणखी मजबूत सहकार्याचा मार्ग मोकळा करते.’ गेल्या काही वर्षांत भारत-यूएई संबंध वाढत आहेत.

युवराजांनी ट्विट केले, ‘आमच्या संभाषणातून युएई-भारत संबंधांच्या बळकटीची पुष्टी झाली, जे विश्वासावर बांधलेले आहेत, इतिहासाने आकारलेले आहेत आणि संधी, नावीन्य तसंच शाश्वत समृद्धीने भरलेले भविष्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाने प्रेरित आहेत.’ युएईमध्ये सुमारे ४० लाख भारतीय लोक राहतात, ज्यापैकी बहुतेक जण दुबई आणि त्याच्या आसपास राहतात आणि काम करतात. युएई हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताचा दुसरा सर्वात मोठा निर्यात होणारा देश आहे आणि थेट परकीय गुंतवणुकीचा चौथा सर्वात मोठा स्रोत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०२५ रोजी नवी दिल्ली येथे दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची गळाभेट घेतली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०२५ रोजी नवी दिल्ली येथे दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची गळाभेट घेतली (PIB)

मध्य पूर्वेतून भारताची कच्च्या तेलाची आयात जानेवारी २०२५ मध्ये ५१% (डिसेंबर २०२४) वरून ५३.८९% पर्यंत वाढली. हे सुरक्षित असणे आवश्यक आहे, म्हणूनच संरक्षण सहकार्याला महत्त्व प्राप्त होते. युएईचे संरक्षण मंत्री असलेल्या क्राउन प्रिन्सनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा देखील केली. संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘दोन्ही नेत्यांनी सक्रिय तटरक्षक सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सामंजस्य कराराद्वारे या गोष्टीला औपचारिक स्वरुप देऊन संबंध अधिक मजबूत केले. संरक्षण उद्योगांमधील जवळचे सहकार्य हा द्विपक्षीय सहकार्याचा अविभाज्य भाग असावा यावर त्यांना विश्वास होता.’

राजनाथ सिंह म्हणाले, ‘येत्या काही वर्षांत, आम्ही संरक्षण सहकार्य, सह-उत्पादन आणि सह-विकास प्रकल्प, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत. भारत आणि युएई दोघेही या प्रदेशात शांतता आणि समृद्धीसाठी काम करण्यास वचनबद्ध आहेत.’ असे नाही की भारत आणि युएईमध्ये सध्या लष्करी सहभागाची कमतरता आहे.

दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम आणि नरेंद्र मोदी
दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम आणि नरेंद्र मोदी (PIB)

अबू धाबीमधील भारतीय दूतावासाने त्यांच्या वेबसाइटवर संरक्षण सहकार्याबद्दल उल्लेख केला आहे की, ‘दोन्ही देशांमध्ये खाते प्रमुखांच्या पातळीवर नियमित उच्च-स्तरीय देवाणघेवाण, कार्यात्मक पातळीवरील देवाणघेवाण आणि लष्करी शिक्षण देवाणघेवाण झाली आहे. दोन्ही देशांच्या नौदलाच्या जहाजांनी नियमितपणे द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी संवाद केला केला आहे.’

वेबसाईटवर पुढे म्हटले आहे की, ‘भारत आणि युएई सुरक्षा आणि संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वार्षिक संरक्षण संवाद आयोजित करतात. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य मंत्रालय स्तरावर संयुक्त संरक्षण सहकार्य समिती आणि मुख्यालय स्तरावर नौदल कर्मचारी चर्चेद्वारे चालवले जाते.’ दोन्ही बाजूंमधील कार्यात्मक सहकार्य वाढवणे हा याचा हेतू आहे.

भारत आणि युएईने यापूर्वी संयुक्त नौदल आणि हवाई सराव केले आहेत. दोन्ही देशांच्या नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांनी एकमेकांच्या बंदरांना भेटी दिल्या आहेत. २०१५ पासून भारताने अबूधाबी मिशनमध्ये संरक्षण संलग्नक नियुक्त केले आहे. ज्यामुळे सहकार्य वाढले आहे. भारताकडे सध्या ओमानमध्ये लष्कराचे एक हक्काचे ठिकाण आहे आणि या प्रदेशातील मस्कत नौदल तळावर बर्थिंग अधिकारही भारताला आहेत. दोन्ही देशांच्या तटरक्षक दलाची जहाजे एकमेकांच्या बंदरांना भेट देतात आणि संयुक्त सराव देखील करतात.

दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम आणि नरेंद्र मोदी
दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम आणि नरेंद्र मोदी चर्चा करताना (PIB)

युएई आणि भारतीय शिष्टमंडळांनी दोन्ही देशांमध्ये आयोजित केलेल्या हवाई शोमध्ये भाग घेतला. सोमाली चाचेगिरी आणि हुथी बंडखोरांविरुद्ध भारतीय नौदलाने केलेल्या कारवाईमुळे त्यांच्या पारंपारिक बचावात्मक दृष्टिकोनातून आक्रमक दृष्टिकोनाकडे बदल दिसून येतो आणि मध्य पूर्वेतील त्यांच्या मित्र राष्ट्रांना फायदा होतो कारण त्यांच्याकडे या धोक्यांना रोखण्यासाठी लष्करी शक्ती नाही. लष्करी गुप्तचर माहिती सामायिकरण संरक्षण संबंधांमध्ये एक आधारस्तंभ आहे.

भारतीय सशस्त्र दल आणि युएई यांच्यातील संयुक्त सरावांमुळे परस्पर कार्यक्षमता वाढली आहे आणि 'मेक इन इंडिया' उपकरणे देखील चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रदेशात भारताला निव्वळ सुरक्षा प्रदाता म्हणून देखील मान्यता मिळालेली आहे. सध्याच्या भेटीदरम्यान, 'मेक इन इंडिया' आणि 'मेक इन द एमिरेट्स' उपक्रमांतर्गत संरक्षण उपकरणांच्या संयुक्त उत्पादनावर चर्चा झाली. भारताने युएईला स्वदेशी आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली देखील देऊ केल्या. युएईने ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्यावर चर्चा सुरू आहे.

सुरक्षा वाढवण्यासाठी तटरक्षक दलाच्या सहकार्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्याची स्थिती समाधानकारक मानली जात असली तरी, दोन्ही बाजूंमधील कराराद्वारे यात आणखी मजबूती यायला पाहिजे. संरक्षण करार आधीच अस्तित्वात असल्याने अतिरिक्त सामंजस्य करार म्हणून ते आवश्यक आहे.

सामूहिक छायाचित्रात दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि इतर
सामूहिक छायाचित्रात दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल-मकतूम, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि इतर (PIB)

भारत युएईबरोबर आर्थिक भागीदारी वाढवत आहे, विशेषतः IMEEC (भारत, मध्य पूर्व, युरोप आर्थिक कॉरिडॉर) मध्ये जसजशी आपुलकी वाढत आहे तसतसे हे प्राधान्यानं घडत आहे. सध्या चालू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षामुळे मात्र यात थोडा खोडा पडला आहे. भारत आणि UAE हे I2U2 (भारत, इस्रायल, अमेरिका आणि UAE गट) चे सदस्य आहेत. दोन्ही धोरणात्मक हेतू असलेले आर्थिक गट आहेत. हे बायडेन प्रशासनाने सुरू केले होते आणि सध्याच्या अमेरिकन प्रशासनाकडून त्यांना पाठिंबा आहे.

UAE आणि इतर अरब देश देखील भारतीय नौदलाच्या नेतृत्वाखालील हिंदी महासागर नौदल समन्वयाचे सदस्य आहेत. याची स्थापना २००८ मध्ये झाली. हे एक हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरील देशांच्या नौदल प्रमुखांना भेटण्यासाठी आणि द्विपक्षीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ आहे. दर दोन वर्षांनी याची बैठक होत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये UAE ला शेवटची भेट दिली होती. तिथे द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. यावेळी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान मोदी या महिन्याच्या अखेरीस सौदी अरेबियाला भेट देणार आहेत. संयुक्त सराव आणि इतर विषयांसह वाढत्या लष्करी देवाणघेवाणीसह दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार आहे. भारत लष्करी उपकरणे निर्यात करण्याचा देखील प्रयत्न करत आहे. मध्य पूर्वेतील भारताची वाढती जवळीक, ज्यामध्ये लष्करी करारांचा समावेश आहे, यातून पाकिस्तानचा प्रभाव कमी होतो त्याचबरोबर त्यांच्यावर दबावही वाढवते.

भारत आणि युएईचे बहुआयामी संबंध आहेत ज्यात व्यापार, लष्करी मुत्सद्देगिरी आणि गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण यांचा समावेश आहे. भारतीय सुरक्षा संस्थांनी शोधलेल्या अनेकांना मध्य पूर्वेतून हद्दपार करण्यात आले आहे. दहशतवादविरोधी आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात वाढलेले सहकार्य देखील यात जोडले गेले आहे. युएईकडे भारतातील संरक्षण संशोधनासाठी निधी देण्यासाठी संसाधने देखील आहेत, ज्याचा दोन्ही देशांना फायदा होईल. अलीकडील भेटीमुळे युएई आणि भारत यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढेल यात शंकाच नाही.

टीप : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक आहेत. येथे मांडलेली तथ्ये आणि मतांशी ईटीव्ही भारत सहमत असेलच असे नाही.

Last Updated : April 15, 2025 at 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.