cinnamon and Fennel water Benefits: दिवस कसा सुरु करतो यावर आरोग्य प्रतिबिंबित होतं. दिवसाची सुरुवात चांगल्या गोष्टीने केल्यास तुम्ही फक्त निरोगी राहत नाही तर दिवसभर उत्साही देखील राहता. असेच एक पेय आहे. ज्याने दिवसाची सुरुवात या पेयानं केल्यास पचनक्रिया, चयापचय आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते. ते पेय आहे दालचिनी बडीशेप पाणी. सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायल्यास तुम्हीला ताजेतवाणे वाटते. हे दोन्ही मसाल्याचे घटक शतकानुशतके आयुर्वेदात त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी वापरले जातात. पोषणतज्ञ डॉ. श्रीलता याच्याया मते, त्यात लोह, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम लाइकोपीन आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. दालचिनीमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडट्स आढळतात. जे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात. तसंच याच्या सेवनाने रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्याचबरोबर पिंपल्स दूर करून त्वचा निखारण्यासाठी हे उत्तम आहे.

- दालचिनी आणि बडीशेप पाणी पिण्याचे फायदे
- पचनास मदत: दालचिनी आणि बडीशेप हे दोन्ही घटक पचनासाठी खूप प्रभावी आहेत. यातील हाय फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. तसंच गॅस, पोटफुगी, पोटदुखी, अपचन आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी हे पाणी चांगलं आहे.
- वजन कमी करण्यासाठी फायदेशीर: दालचिनी कॅलरी बर्न करण्यास मदत करून चयापचय दर वाढवण्यास मदत करते. दालचिनी पाणी प्यायल्यास शरीरावरील अतिरिक्त चरबी जलद जाळण्यास मदत होते. याशिवाय ते भूक नियंत्रित करते आणि वारंवार खाण्याची इच्छा देखील कमी करते. यामुळे पोट आणि कंबरेभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
- रोगप्रतिकार शक्ती मजबूत: दालचिनी आणि बडीशेपमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडट्स रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत. तसंच इतर संसर्गजन्य आजारापासून तुमचा बचाव करण्यासाठी देखील हे चांगलं आहे. विशेषत: हिवाळ्यात दालचिणी पाणी प्यायल्यास सर्दी, खोकला टाळण्यासाठी हे उत्तम आहे. दुसरीकडे बडीशेपमध्ये नैसर्गिक मूत्रवर्धक गुणधर्म आहेत, जे अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत करतात.

- शरीर योग्यरित्या डिटॉक्स: प्रदूषण, प्रतिक्रिया केलेले अन्न आणि ताणतणावामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. दालचिनी आणि बडीशेप पाणी हे उत्तम डिटॉक्स आहे. शरीर योग्यरित्या डिटॉक्स करण्यासाठी तसंच मूत्रपिंड स्वच्छ करण्यासाठी हे मदत करते. दालचिनी आतड्यांमधील हानिकारक घटकांशी लढण्यासाठीअँटीबॅक्टेरियल गुणधर्म जोडते. याच्या नियमित सेवनानं शरीर योग्यरित्या डिटॉक्स होते.
- रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित: बडीशेप आणि दालचिनी पाणी इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यासाठी चांगलं आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. विशेषत: मधुमेह असलेल्यांसाठी हे एक उत्तम पेय आहे. बडीशेपमध्ये अनिथोल असते जे रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करते आणि मूत्रपिंड, यकृत आणि डोळ्यांना होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते. तसंच दालचिनी एक इन्सुलिनसारखेच कार्य करते.
- हृदयाचे आरोग्य सुधारते: दालचिनी आणि बडीशेप पाणी प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडट्स कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. तसंच यातील नैसर्गिक कौमरिनमुळे रक्तवाहिन्या अंरुद होण्यास प्रतिबंधित करते.
- चमकदार त्वचा: दालचिनी आणि बडीशेप पाणी पचनक्रिया सुधारून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते. यामुळे त्वचेवरील जळजळ कमी होते. तसंच बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. जी त्वचेला आतून पोषण देतात. दालचिनी बडीशेप पाणी रक्ताभिसरण सुधारते आणि नैसर्गिक चमक प्रदान करते.
- दालचिनी बडीशेप पाणी कसं तयार करावं: एका ग्लासामध्ये पाणी घ्या आणि त्यात दालचिनी आणि बडीशेप रात्रभर भिजू ठेवा. सकाळी उपाशी पोटी गाळून गरम करून प्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात लिंबाचा रस घालू शकता. यामुळे त्याचे आणखी फायदे होतात.
(अस्वीकरण: सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिली आहे. ईटीव्ही भारताबद्दल किंवा माहितीच्या वैज्ञानिक वैधतेबद्दल कोणतेही समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी, डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7328489/