Coconut Water VS Sugarcane Juice: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वत:ला हायड्रेटेड ठेवणे फार महत्त्वाचे आहे. कारण उष्णतेमुळे जास्त प्रमाणात तहान लागते. तसंच शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी, निर्जलीकरण रोखण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी पाण्यासोबतच नारळ पाणी आणि उसाचा रस उत्तम भूमिका बजावते. उन्हाळ्याच्या हंगामात दोन्ही पेय लोकप्रिय आहेत. चला तर जाणून घेऊया नारळ पाणी की उसाचा रस आरोग्याच्या दृष्टीनं कोणता आहे सर्वोत्तम.

- उसाचा रस: उसाचा रस हा भारतातील एक लोकप्रिय उन्हीळी पेय आहे. जो त्वरीत ऊर्जा आणि थंडावा प्रदान करतो. यात कॅल्शियम, मॅग्नेशिय, इलेक्ट्रोलाइट्स, लोह पुरेशा प्रमाणात आढळतात.

- उसाचा रस पिण्याचे फायदे
- इटपट ऊर्जा: उसाच्या रसात नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीराला जलद आणि प्रभावी ऊर्जा प्रदान करते. शरीरात साखरेची पातळी कमी असेल तर उसाचा रस पिऊन ती भरली जावू शकते.

- हाडांसाठी चांगला: उसाच्या रसात कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात. जे हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते. उसाचा रस पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे तोंडाद्वारे येणारी दुर्गंधी रोखण्यासाठी प्रभावीपणे काम करतो.
- कावीळसाठी उत्तम पर्याय: उसाचा रस यकृताच्या आरोग्यासाठी चांगला आहे. कावीळ झाल्यास उसाचा रस प्यायल्याने ते लवकर बरे होऊ शकते. तसंच ऊसाच्या रसातील अँटीऑक्सिडंट्स यकृताच्या संसर्गापासून संरक्षण करते. उसाचा रस तुमच्या शरीराला आवश्यक असलेले प्रथिने आणि पोषक तत्वे पुरवण्यास मदत करतो. आजारातून लवकर बरे होण्यासाठी उसाचा रस पूरक आहे.
- अँटीऑक्सिडंट्स समृद्ध: उसाच्या रसात पॉलीफेनॉल मुबलक प्रमाणात आढळतात. जे ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यास मदत करतात. परिणामी त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
- पचनास मदत करते: उसाच्या रसात असलेले आहारातील फायबर आणि नैसर्गिक एंजाइम पचनास मदत करतात आणि आम्लता रोखण्यास मदत करतात.
- कुणी प्यावं उसाचा रस: आहारतज्ञ आणि वजन व्यवस्थापन तज्ञ डॉ. प्रत्यक्ष भारद्वाज यांच्या मते , आठवड्यातून 3 ते 4 वेळा उसाचा रस कमी प्रमाणात पिणे चांगले. मात्र, उसाचा रस प्रत्येकासाठी योग्य नाही. “उसाच्या रसात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेह असलेल्यांनी ते टाळावे. साखर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने, नियमित सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी त्यांचे सेवन मर्यादित करावे,” असे डॉ. भारद्वाज म्हणतात.
- नारळ पाणी: नारळाच्या पाण्याला त्याच्या उत्कृष्ट हायड्रेटिंग गुणधर्मांमुळे आणि पोषक तत्वांनी समृद्ध प्रोफाइलमुळे अनेकदा निसर्गाचे क्रीडा पेय म्हटले जाते.

- पोटॅशियमचे प्रमाण जास्त: नारळाच्या पाण्यात इतर स्पोर्ट्स ड्रिंक्सच्या तुलनेत जास्त पोटॅशियम आढळतात, जे इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास आणि स्नायूंच्या क्रॅम्पला प्रतिबंधित करण्यास मदत करतात.
- कमी कॅलरीज: नारळाच्या पाण्यात नैसर्गिकर साखर आणि कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे ते वजन व्यवस्थापनासाठी आदर्श आहे.

- पचनास मदत करते: विषारी पदार्थ बाहेर काढण्यासआणि आतड्यांच्या आरोग्यास समर्थन देण्यास नारळ पाणी चांगलं आहे. नारळ पाणी नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून काम करते, ज्यामुळे पोट फुगणे यासारख्या समस्या दूर होतात.

- किती वेळा प्यावे?
"नारळाचे पाणी दररोज सेवन केले जाऊ शकते, कारण त्यात साखरेचे प्रमाण कमी असते आणि ते आवश्यक खनिजे प्रदान करते. मात्र, जास्त प्रमाणात सेवन केल्याने सोडियमचे असंतुलन होऊ शकते, म्हणून ते मर्यादित प्रमाणात प्या," डॉ. भारद्वाज म्हणतात.
उसाचा रस आणि नारळ पाणी हे दोन्हीही उत्तम नैसर्गिक उन्हाळी पेये आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे आहेत. जर तुम्हाला जलद ऊर्जा हवी असेल, तर उसाचा रस हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु तो माफक प्रमाणात सेवन करावा. दररोज हायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट संतुलन आणि कमी कॅलरीज असलेल्या पर्यायासाठी नारळ पाणी उत्तम आहे. हायड्रेटेड रहा, निरोगी रहा आणि या ताजेतवान्या पेयांच्या नैसर्गिक गुणांचा आनंद घ्या.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3880661/
https://www.sciencedirect.com/topics/agricultural-and-biological-sciences/sugarcane-juice
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/22449517/
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/24835026/