ETV Bharat / entertainment

अनुराग कश्यप हाजिर हो...!! ७ मे रोजी हजर राहण्यासाठी सूरत न्यायालयाची अनुरागला नोटीस - ANURAG KASHYAP

जातीविषयक केलेल्या कमेंटबद्दल अनुराग कश्यपला न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्याला ७ मे रोजी सूरत न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे.

Anurag Kashyap
अनुराग कश्यप ((ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 26, 2025 at 12:39 AM IST

2 Min Read

सूरत (गुजरात) - एका समाजाबद्दल अनुराग कश्यपनं आक्षेपार्ह विधान केल्यामुळं अलीकडेच एका वादाला निमंत्रण मिळालं होतं. यामुळे त्याच्यासमोरच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. सूरत न्यायालयाने कश्यपला ७ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देणारी नोटीस जारी केली आहे. हजर न राहिल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही त्याला न्यायालयानं दिलाय. अनुरागच्या घरी नोटीस पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अनुराग कश्यपला कोर्टात खेचणाऱ्या तक्रारदाराचे वकील कमलेश रावल यांनी सांगितलं की, यावेळी कश्यप यांना त्यांनी केलेल्या विधानाबद्दल माफ केलं जाणार नाही. त्यानं अशा प्रकारे वादग्रस्त विधान केल्याची ही पहिलीच वेळ नसल्याचा दावाही तक्रारदारानं केला आहे.

तक्रारीमध्ये आरोप करण्यात आला आहे की, अनुराग कश्यपनं वारंवार धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. २०२० मध्ये त्यानं हिंदू समाजाबद्दल यापूर्वी केलेली कमेंट आणि २०२४ मध्ये अभिनेता अनिल कपूर यांच्याशी झालेला वाद देखील त्याच्याविरुद्धच्या खटल्याचा भाग आहे.

अनुराग कश्यपनं समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्यावरील बायोपिकशी संबंधी सेन्सॉर बोर्डवर टीका केली होती. यानंतर सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला आणि त्यातील एका पोस्टमुळे एका समुदायाचा अपमान केल्याचा आणि धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप त्याच्यावर झाला. या प्रकारानंतर अनुराग कश्यपनं माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रकरणी आपण शांत राहू शकत नसल्याचं तक्रारदारानं स्पष्ट केलं आहे.

काय आहे अनुराग कश्यपचं वाद्रगस्त प्रकरण? - अनंत महादेवन दिग्दर्शित 'फुले' चित्रपटाला सीबीएफसीनं काही बदलांसह यू प्रमाणपत्र दिलं होतं. या बदलांमध्ये काही शब्द काढून टाकण्याचा समावेश आहे. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी त्याला विरोध केला आणि त्याच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी करण्यात आली. त्यानंतर अनुराग कश्यप यानं सेन्सॉर बोर्डावर टीका केली होती. 'माझ्या आयुष्यातील पहिलं नाटक हे ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर होतं. जर जातीयवाद नसता तर ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले नसत्या आणि त्यांना लढावं लागलं नसतं. आता या समुदायाला हे स्वीकारण्यात काय अडचण आहे किंवा ते स्वतःला वेगळं मानतात का? आता मला सांगा शेवटी मूर्ख कोण आहे?'

यानंतर अनुरागच्या सोशल मीडिया पोस्टवर टीका सुरू झाली. यामध्ये एका व्यक्तीनं अनुरागवर बोचरी टीका केली. याला उत्तर देताना त्यानं जातीवाचक आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर त्याच्यावर खूप टीका सुरू झाल्यानंतर अनुरागनं आपले शब्द मागे घेतले आणि माफी मागितली होती.

हेही वाचा -

सूरत (गुजरात) - एका समाजाबद्दल अनुराग कश्यपनं आक्षेपार्ह विधान केल्यामुळं अलीकडेच एका वादाला निमंत्रण मिळालं होतं. यामुळे त्याच्यासमोरच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. सूरत न्यायालयाने कश्यपला ७ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देणारी नोटीस जारी केली आहे. हजर न राहिल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही त्याला न्यायालयानं दिलाय. अनुरागच्या घरी नोटीस पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अनुराग कश्यपला कोर्टात खेचणाऱ्या तक्रारदाराचे वकील कमलेश रावल यांनी सांगितलं की, यावेळी कश्यप यांना त्यांनी केलेल्या विधानाबद्दल माफ केलं जाणार नाही. त्यानं अशा प्रकारे वादग्रस्त विधान केल्याची ही पहिलीच वेळ नसल्याचा दावाही तक्रारदारानं केला आहे.

तक्रारीमध्ये आरोप करण्यात आला आहे की, अनुराग कश्यपनं वारंवार धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. २०२० मध्ये त्यानं हिंदू समाजाबद्दल यापूर्वी केलेली कमेंट आणि २०२४ मध्ये अभिनेता अनिल कपूर यांच्याशी झालेला वाद देखील त्याच्याविरुद्धच्या खटल्याचा भाग आहे.

अनुराग कश्यपनं समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्यावरील बायोपिकशी संबंधी सेन्सॉर बोर्डवर टीका केली होती. यानंतर सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला आणि त्यातील एका पोस्टमुळे एका समुदायाचा अपमान केल्याचा आणि धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप त्याच्यावर झाला. या प्रकारानंतर अनुराग कश्यपनं माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रकरणी आपण शांत राहू शकत नसल्याचं तक्रारदारानं स्पष्ट केलं आहे.

काय आहे अनुराग कश्यपचं वाद्रगस्त प्रकरण? - अनंत महादेवन दिग्दर्शित 'फुले' चित्रपटाला सीबीएफसीनं काही बदलांसह यू प्रमाणपत्र दिलं होतं. या बदलांमध्ये काही शब्द काढून टाकण्याचा समावेश आहे. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी त्याला विरोध केला आणि त्याच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी करण्यात आली. त्यानंतर अनुराग कश्यप यानं सेन्सॉर बोर्डावर टीका केली होती. 'माझ्या आयुष्यातील पहिलं नाटक हे ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर होतं. जर जातीयवाद नसता तर ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले नसत्या आणि त्यांना लढावं लागलं नसतं. आता या समुदायाला हे स्वीकारण्यात काय अडचण आहे किंवा ते स्वतःला वेगळं मानतात का? आता मला सांगा शेवटी मूर्ख कोण आहे?'

यानंतर अनुरागच्या सोशल मीडिया पोस्टवर टीका सुरू झाली. यामध्ये एका व्यक्तीनं अनुरागवर बोचरी टीका केली. याला उत्तर देताना त्यानं जातीवाचक आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर त्याच्यावर खूप टीका सुरू झाल्यानंतर अनुरागनं आपले शब्द मागे घेतले आणि माफी मागितली होती.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.