ETV Bharat / entertainment

सिनेमाचे पहिले जादूगार आणि भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके - DADASAHEB PHALKE BIRTH ANNIVERSARY

भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांची १५५ वी जयंती आज साजरी होत आहे. भारतात चित्रपट निर्मितीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या महान दिग्गजांबद्दल अधिक समजून घेऊयात.

birth anniversary of Dadasaheb Phalke
दादासाहेब फाळके यांची १५५ वी जयंती (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 30, 2025 at 7:21 AM IST

4 Min Read

दादासाहेब फाळके हे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत अतिशय आदरानं घेतलं जातं. त्यांनी १९१३ मध्ये भारतात पहिल्यांदा पूर्ण लांबीचा 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट बनवल्यानं त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा जनक मानलं जातं. त्यांच्या नावानं दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेजगतात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. ३० एप्रिल १८७० जन्मलेल्या या महान व्यक्तिमत्वाचा आज १५५ वा जन्मदिन साजरा होत आहे. यानिमित्तानं या प्रतिभावंत दिग्गजांविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.

कलाअभ्यासक दादासाहेब फाळके -

महाराष्ट्राच्या नाशिक शहरालगतच्या त्र्यंबकेश्वर जन्मलेल्या दादासाहेबांचं मूळ नाव धुंडिराज गोविंद फाळके असं आहे. संस्कृत पंडितांच्या घरी जन्मलेल्या दादासाहेबांना कलेची आवड अगदी लहानपणापासूनच होती. चित्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले आणि १८८५ मध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनंतर त्यांनी बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठातील कला भवनमध्ये शिल्पकला, अभियांत्रिकी, रेखाचित्र, चित्रकला आणि छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. गुजरातमधील गोध्रामध्ये त्यांनी फोटोग्राफर म्हणून कामाला सुरुवात केली. याकाळात प्लेगच्या साथीमुळं त्यांच्या पहिल्या पत्नीला आणि मुलाला जीव गमवावा लागला. त्यांनी गुजरात सोडले, परंतु यादरम्यान त्यांनी अनेक प्रकारच्या कामाचा अनुभव घेतला. छपाईचं तंत्र त्यांना अवगत असल्यानं त्यांनी एक प्रिंटिंग प्रेसही सुरू केला. याची आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्याच्या निमित्तानं त्यांनी जर्मनीचाही दौरा केला. चित्रकला हा त्यांच्या आवडीचा विषय असल्यानं त्यांनी प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा यांच्यासाठी देखील काम केलं होतं.

हरहुन्नरी प्रतिभावंत दादासाहेब फाळके -

दादासाहेब फाळकेंना अनेक कला अवगत असल्यानं त्यांचे सतत नवनवे प्रयोग सुरू असायचे. याकाळात त्यांनी अगदी जादूची आवडही जोपासली होती. लोक जमा करुन त्यांना प्रभावित करायचे, नकला करुन मनोरंजन करायचे, प्रसंगी जादूचे प्रयोगही करायचे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची वेगळी क्षमता फाळकेंनी आत्मसात केली होती. याच काळात मुंबईत काही सिनेमाची थिएटर्स सुरू झाली होती. पडद्यावर दिसणारी खरीखुरी चित्रं प्रेक्षकांना आचंबीत करत होती. दादासाहेब फाळकेंना हे चित्रपट पाहण्याचा शौक लागला. ते एक खेळ संपला की दुसरा, तिसरा, चौथा असे सलग चित्रपट पाहायचे. काही वेळा ते थिएटरमध्येच झोपून दुसऱ्या दिवशी पुढच्या चित्रपटालाही हजेरी लावत. १९११ मध्ये मुंबईत प्रदर्शित झालेल्या 'द लाईफ ऑफ क्राइस्ट' या युरोपियन चित्रपटानं त्यांना भारतीय कथांवर आधारित चित्रपट बनवण्याची प्रेरणा दिली. भारतीय पैराणिक विषयावरील चित्रपट आपण बनवायचा हे त्यांनी आपल्या मनाशी ठाम निश्चित केलं. राजा रवि वर्मा यांच्याबरोबर देव देवतांची चित्रं त्यांनी बनवली असल्यामुळं पौराणिक पात्रं कशी असायला हवीत याचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर अगोदरच तयार होतं.

कर्ज काढून खरेदी केला मुव्ही कॅमेरा -

चित्रपट बनवायचा तर त्याच्यासाठी कॅमेरा असायला हवा. त्यावेळी भारतात मुव्ही कॅमेरा पाहायला मिळणंही शक्य नव्हतं. त्यांनी अशा कॅमेऱ्याबद्दलची माहिती मिळवली आणि त्यासाठी इंग्लंडला जायची तयारी केली. कॅमेरा खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे मित्रांकडून उधार घेऊन, कर्ज आणि पत्नीचे दागिने गहान ठेवून पैसे जमा केले आणि त्यांनी इंग्लंड गाठलं. तिथं जाऊन त्यांनी चित्रपटसृष्टीचे प्रणेते सेसिल हेपवर्थ यांच्याकडून चित्रपट निर्मितीचे कौशल्य शिकून घेतले. तिथून त्यांनी चित्रपट निर्मितीसाठीचा अद्यावत विल्यमसन कॅमेरा आणि इतर महत्त्वाची उपकरणं खरेदी केली आणि भारतात परतले.

'राजा हरिश्चंद्र' चित्रपटाची निर्मिती -

भारतात परतल्यानंतर दादासाहेब फाळकेंनी आपल्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या जुळवाजुळवीला सुरुवात केली. यासाठी त्यांनी राजा हरिश्चंद्राची कथा निवडली आणि त्याची पडद्यावर मांडणी करण्यासाठी पटकथा तयार केली. परंतु सर्वात मोठी अडचण होती कलाकारांची. नाटकात काम करणारे हौशी पुरुष कलाकार त्यांना मिळाले, परंतु स्त्री कलाकार मिळवण मोठं जिकरीच ठरलं. अखेर पुरुष कलाकारांनाच स्त्री कलाकाराच्या भूमिकेसाठी तयार केलं. 'राजा हरिश्चंद्र'च्या पत्नी राणी तारामतीची भूमिका करण्यासाठी त्यांना एका पुरूषाला (अण्णा साळुंके) घ्यावं लागलं. सिनेमाच्या निर्मितीत प्रचंड अडथळे येत होते, त्यावर मात करत त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि इतर मदतनीसांच्या एकत्रित अथक प्रयत्नांनंतर आणि सहा महिने सत्तावीस दिवसांच्या शूटिंगनंतर 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट तयार झाला आणि भारताचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याचं महान कार्य दादासाहेब फाळके यांच्या हातून घडलं. या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि कॅमेरामन म्हणूनही त्यांनीच काम केलं होतं. ३ मे १९१३ रोजी 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला चित्रपट भारतात पहिल्यांदाच रिलीज झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाला प्रारंभ झाला.

९५ चित्रपटांची निर्मिती करणारे दादासाहेब फाळके -

दादासाहेब फाळकेंना पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या अनुभवानं खूप काही शिकवलं. त्यांनी पुढे जाऊन विविध स्पेशल इफेक्ट्स आणि ट्रिक-फोटोग्राफीचे प्रयोग केले आणि प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली. १९१७ मध्ये दादासाहेब फाळके यांनी हिंदुस्तान फिल्म कंपनीचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. त्यांच्या १९ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी ९५ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आणि २७ लघुपट बनवले. त्यांचे काही महान हिट चित्रपट म्हणजे 'लंका दहन' (१९१७), 'श्री कृष्ण जन्म' (१९१८), 'सैरंद्री' (१९२०), 'शकुंतला' (१९२०) आणि 'गुरु द्रोणाचार्य' (१९२३) हे सर्व मूकपट होते. त्यांनी बनवलेला "गंगावतरण (१९३७)" हा शेवटचा चित्रपट बोलपट होता.

दादासाहेब फाळकेंनी महिलांसाठी उघडले सिनेसृष्टीचे दरवाजे -

'राजा हरिश्चंद्र'मध्ये स्त्री कलाकार मिळत नसल्यानं त्यांनी जरी तडजोड केली होती तरी त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मोहिनी भस्मासुर (१९१३) या मूकपटात, त्यांनी दुर्गाबाई कामत यांना पार्वतीची भूमिका आणि त्यांची किशोरवयीन मुलगी कमलाबाई यांना मोहिनीची भूमिका देऊ केली. दुर्गाबाई आणि त्यांच्या मुलीनं सिनेमात काम केल्यामुळं समाजातून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली, परंतु त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठ्या पडद्यावर महिलांना मुख्य भूमिका साकारण्याचा मार्ग मोकळा झाला. काही वर्षांनंतर, फाळके यांनी त्यांची स्वतःची मुलगी मंदाकिनी फाळके हिला 'लंका दहन' (१९१७) आणि 'श्री कृष्ण जन्म' (१९१८) मध्ये कास्ट केले. फाळके यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनीही भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्या भारतातील पहिल्या चित्रपट संकलक होत्या, ज्यांनी 'राजा हरिश्चंद्र' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

दादासाहेब फाळके यांचं कलासक्त आयुष्य भारतीय चित्रपटसृष्टीला समर्पित होतं. सिने निर्मितीची सर्व अंगं त्यांनी आत्मसात केली होती. कलाकारांना ते समरस होऊन अभिनयाचे धडेही शिकवत असत. खऱ्या खुऱ्या लोकेशन्सवर जाऊन शूटिंग करण्याची सुरुवातही त्यांनीच केली. त्याकाळातले चित्रपट हे पौराणिक कथानकाचे असल्यामुळं अनेक ट्रीक सीन्स करणे आवश्यक होतं. दादासाहेबांनी आपल्या कल्पकतेनं आणि कलात्मक दृष्टीकोनातून अशा सीन्सना न्याय दिला आणि प्रेक्षकांचं कौतुक संपादन केलं. अशा या महान चित्रपट तपस्वींना ईटीव्ही भारतचा मानाचा मुजरा!!

दादासाहेब फाळके हे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत अतिशय आदरानं घेतलं जातं. त्यांनी १९१३ मध्ये भारतात पहिल्यांदा पूर्ण लांबीचा 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट बनवल्यानं त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा जनक मानलं जातं. त्यांच्या नावानं दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेजगतात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. ३० एप्रिल १८७० जन्मलेल्या या महान व्यक्तिमत्वाचा आज १५५ वा जन्मदिन साजरा होत आहे. यानिमित्तानं या प्रतिभावंत दिग्गजांविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.

कलाअभ्यासक दादासाहेब फाळके -

महाराष्ट्राच्या नाशिक शहरालगतच्या त्र्यंबकेश्वर जन्मलेल्या दादासाहेबांचं मूळ नाव धुंडिराज गोविंद फाळके असं आहे. संस्कृत पंडितांच्या घरी जन्मलेल्या दादासाहेबांना कलेची आवड अगदी लहानपणापासूनच होती. चित्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले आणि १८८५ मध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनंतर त्यांनी बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठातील कला भवनमध्ये शिल्पकला, अभियांत्रिकी, रेखाचित्र, चित्रकला आणि छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. गुजरातमधील गोध्रामध्ये त्यांनी फोटोग्राफर म्हणून कामाला सुरुवात केली. याकाळात प्लेगच्या साथीमुळं त्यांच्या पहिल्या पत्नीला आणि मुलाला जीव गमवावा लागला. त्यांनी गुजरात सोडले, परंतु यादरम्यान त्यांनी अनेक प्रकारच्या कामाचा अनुभव घेतला. छपाईचं तंत्र त्यांना अवगत असल्यानं त्यांनी एक प्रिंटिंग प्रेसही सुरू केला. याची आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्याच्या निमित्तानं त्यांनी जर्मनीचाही दौरा केला. चित्रकला हा त्यांच्या आवडीचा विषय असल्यानं त्यांनी प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा यांच्यासाठी देखील काम केलं होतं.

हरहुन्नरी प्रतिभावंत दादासाहेब फाळके -

दादासाहेब फाळकेंना अनेक कला अवगत असल्यानं त्यांचे सतत नवनवे प्रयोग सुरू असायचे. याकाळात त्यांनी अगदी जादूची आवडही जोपासली होती. लोक जमा करुन त्यांना प्रभावित करायचे, नकला करुन मनोरंजन करायचे, प्रसंगी जादूचे प्रयोगही करायचे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची वेगळी क्षमता फाळकेंनी आत्मसात केली होती. याच काळात मुंबईत काही सिनेमाची थिएटर्स सुरू झाली होती. पडद्यावर दिसणारी खरीखुरी चित्रं प्रेक्षकांना आचंबीत करत होती. दादासाहेब फाळकेंना हे चित्रपट पाहण्याचा शौक लागला. ते एक खेळ संपला की दुसरा, तिसरा, चौथा असे सलग चित्रपट पाहायचे. काही वेळा ते थिएटरमध्येच झोपून दुसऱ्या दिवशी पुढच्या चित्रपटालाही हजेरी लावत. १९११ मध्ये मुंबईत प्रदर्शित झालेल्या 'द लाईफ ऑफ क्राइस्ट' या युरोपियन चित्रपटानं त्यांना भारतीय कथांवर आधारित चित्रपट बनवण्याची प्रेरणा दिली. भारतीय पैराणिक विषयावरील चित्रपट आपण बनवायचा हे त्यांनी आपल्या मनाशी ठाम निश्चित केलं. राजा रवि वर्मा यांच्याबरोबर देव देवतांची चित्रं त्यांनी बनवली असल्यामुळं पौराणिक पात्रं कशी असायला हवीत याचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर अगोदरच तयार होतं.

कर्ज काढून खरेदी केला मुव्ही कॅमेरा -

चित्रपट बनवायचा तर त्याच्यासाठी कॅमेरा असायला हवा. त्यावेळी भारतात मुव्ही कॅमेरा पाहायला मिळणंही शक्य नव्हतं. त्यांनी अशा कॅमेऱ्याबद्दलची माहिती मिळवली आणि त्यासाठी इंग्लंडला जायची तयारी केली. कॅमेरा खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे मित्रांकडून उधार घेऊन, कर्ज आणि पत्नीचे दागिने गहान ठेवून पैसे जमा केले आणि त्यांनी इंग्लंड गाठलं. तिथं जाऊन त्यांनी चित्रपटसृष्टीचे प्रणेते सेसिल हेपवर्थ यांच्याकडून चित्रपट निर्मितीचे कौशल्य शिकून घेतले. तिथून त्यांनी चित्रपट निर्मितीसाठीचा अद्यावत विल्यमसन कॅमेरा आणि इतर महत्त्वाची उपकरणं खरेदी केली आणि भारतात परतले.

'राजा हरिश्चंद्र' चित्रपटाची निर्मिती -

भारतात परतल्यानंतर दादासाहेब फाळकेंनी आपल्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या जुळवाजुळवीला सुरुवात केली. यासाठी त्यांनी राजा हरिश्चंद्राची कथा निवडली आणि त्याची पडद्यावर मांडणी करण्यासाठी पटकथा तयार केली. परंतु सर्वात मोठी अडचण होती कलाकारांची. नाटकात काम करणारे हौशी पुरुष कलाकार त्यांना मिळाले, परंतु स्त्री कलाकार मिळवण मोठं जिकरीच ठरलं. अखेर पुरुष कलाकारांनाच स्त्री कलाकाराच्या भूमिकेसाठी तयार केलं. 'राजा हरिश्चंद्र'च्या पत्नी राणी तारामतीची भूमिका करण्यासाठी त्यांना एका पुरूषाला (अण्णा साळुंके) घ्यावं लागलं. सिनेमाच्या निर्मितीत प्रचंड अडथळे येत होते, त्यावर मात करत त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि इतर मदतनीसांच्या एकत्रित अथक प्रयत्नांनंतर आणि सहा महिने सत्तावीस दिवसांच्या शूटिंगनंतर 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट तयार झाला आणि भारताचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याचं महान कार्य दादासाहेब फाळके यांच्या हातून घडलं. या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि कॅमेरामन म्हणूनही त्यांनीच काम केलं होतं. ३ मे १९१३ रोजी 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला चित्रपट भारतात पहिल्यांदाच रिलीज झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाला प्रारंभ झाला.

९५ चित्रपटांची निर्मिती करणारे दादासाहेब फाळके -

दादासाहेब फाळकेंना पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या अनुभवानं खूप काही शिकवलं. त्यांनी पुढे जाऊन विविध स्पेशल इफेक्ट्स आणि ट्रिक-फोटोग्राफीचे प्रयोग केले आणि प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली. १९१७ मध्ये दादासाहेब फाळके यांनी हिंदुस्तान फिल्म कंपनीचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. त्यांच्या १९ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी ९५ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आणि २७ लघुपट बनवले. त्यांचे काही महान हिट चित्रपट म्हणजे 'लंका दहन' (१९१७), 'श्री कृष्ण जन्म' (१९१८), 'सैरंद्री' (१९२०), 'शकुंतला' (१९२०) आणि 'गुरु द्रोणाचार्य' (१९२३) हे सर्व मूकपट होते. त्यांनी बनवलेला "गंगावतरण (१९३७)" हा शेवटचा चित्रपट बोलपट होता.

दादासाहेब फाळकेंनी महिलांसाठी उघडले सिनेसृष्टीचे दरवाजे -

'राजा हरिश्चंद्र'मध्ये स्त्री कलाकार मिळत नसल्यानं त्यांनी जरी तडजोड केली होती तरी त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मोहिनी भस्मासुर (१९१३) या मूकपटात, त्यांनी दुर्गाबाई कामत यांना पार्वतीची भूमिका आणि त्यांची किशोरवयीन मुलगी कमलाबाई यांना मोहिनीची भूमिका देऊ केली. दुर्गाबाई आणि त्यांच्या मुलीनं सिनेमात काम केल्यामुळं समाजातून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली, परंतु त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठ्या पडद्यावर महिलांना मुख्य भूमिका साकारण्याचा मार्ग मोकळा झाला. काही वर्षांनंतर, फाळके यांनी त्यांची स्वतःची मुलगी मंदाकिनी फाळके हिला 'लंका दहन' (१९१७) आणि 'श्री कृष्ण जन्म' (१९१८) मध्ये कास्ट केले. फाळके यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनीही भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्या भारतातील पहिल्या चित्रपट संकलक होत्या, ज्यांनी 'राजा हरिश्चंद्र' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

दादासाहेब फाळके यांचं कलासक्त आयुष्य भारतीय चित्रपटसृष्टीला समर्पित होतं. सिने निर्मितीची सर्व अंगं त्यांनी आत्मसात केली होती. कलाकारांना ते समरस होऊन अभिनयाचे धडेही शिकवत असत. खऱ्या खुऱ्या लोकेशन्सवर जाऊन शूटिंग करण्याची सुरुवातही त्यांनीच केली. त्याकाळातले चित्रपट हे पौराणिक कथानकाचे असल्यामुळं अनेक ट्रीक सीन्स करणे आवश्यक होतं. दादासाहेबांनी आपल्या कल्पकतेनं आणि कलात्मक दृष्टीकोनातून अशा सीन्सना न्याय दिला आणि प्रेक्षकांचं कौतुक संपादन केलं. अशा या महान चित्रपट तपस्वींना ईटीव्ही भारतचा मानाचा मुजरा!!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.