ETV Bharat / bharat

रामोजी राव! वारसा विचारांचा अन् संकल्प विकासाचा..! - RAMOJI RAO DEATH ANNIVERSARY

8 जून 2024 रोजी त्यांचे निधन होऊन एक वर्ष झाले असले तरी त्यांनी दाखवलेला मार्ग आपल्या सर्वांसाठी एक चिरस्थायी धडा आहे.

Ramoji Rao legacy of ideas and a resolve for development
रामोजी राव! वारसा विचारांचा अन् संकल्प विकासाचा..! (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 8, 2025 at 2:18 PM IST

4 Min Read

हैदराबाद: शिस्तबद्ध अन् दृढनिश्चयाद्वारे अफाट उंची गाठणारे दूरदर्शी श्री रामोजी राव यांच्याबद्दल तेलुगू समाजाच्या अन् ईटीव्हीच्या कर्मचाऱ्यांच्या हृदयात खोल आदर आणि अभिमान आहे. मातीला माणिक मोती बनवणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा कर्मावर प्रचंड विश्वास होता, त्यांनी त्यांच्या प्रत्येक प्रयत्नातून अमिट छाप सोडली. चिकाटी, शिस्त, मूल्ये अन् विश्वासार्हतेवर आधारित त्यांचा वारसा हा पुढच्या पिढ्यांनाही प्रेरणा देत आहे. 8 जून 2024 रोजी त्यांचे निधन होऊन एक वर्ष झाले असले तरी त्यांनी दाखवलेला मार्ग आपल्या सर्वांसाठी एक चिरस्थायी धडा आहे.

बदल अन् प्रगती या एकाच नाण्याच्या दोन बाजू : श्री रामोजी राव यांचं जीवन अनुकरणीय राहिलंय. ते स्वतःची मूल्ये जपत समाजासाठीही दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करीत आहेत. त्यांची तत्त्वे अन् मूल्ये अनेकांना प्रेरणा देतात. "नेहमी उद्याचा विचार करा अन् कालचा विचार कधीही करू नका," असं ते नेहमी सांगायचे. त्यांच्यासाठी बदल अन् प्रगती या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. खरा विकास हा नवीन विचारसरणीतून निर्माण होतो असे त्यांचे मत होते. "आकाशालाही मर्यादा असतात. नेहमीच मोठा विचार करा, मग यश तुमच्या पदरात पडले,"असं ते नेहमीच सांगायचे. आपल्या मार्गावर कितीही संकटे आली तरी आपण इतरांच्या मदतीची वाट न पाहता स्वतःची तत्त्वे आणि हिमतीवर जीवन जगले पाहिजे, याची शिकवण त्यांनी अनेकांना दिली. त्यांनी इतरांना खूश करण्यासाठी किंवा प्रशंसा मिळवण्यासाठी नव्हे तर अंतर्मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी करण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे यश आणि समाधान दोन्हीही मिळतात. श्री रामोजी राव यांनी आपल्याला हा जीवन जगण्याचा धडा शिकवला.

Ramoji Rao legacy of ideas and a resolve for development
रामोजी राव! वारसा विचारांचा अन् संकल्प विकासाचा..! (Source- ETV Bharat)

एक बहुआयामी उद्योजक : रामोजी राव हे समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये लोकप्रिय होते. त्यांनी 1962 मध्ये मार्गदर्शी चिट फंड, 1974 मध्ये ईनाडू, 1980 मध्ये प्रिया फूड्स, 1980 मध्ये डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, 1983 मध्ये उषाकिरण मूव्हीज, 1995 मध्ये ईटीव्ही चॅनेल्स, 1996 मध्ये रामोजी फिल्म सिटी, 1996 मध्ये रमादेवी पब्लिक स्कूलची स्थापना केली. श्री रामोजी राव यांच्या दृढनिश्चयांपैकी एक म्हणजे कधीही आव्हानांना घाबरू नका. त्यांच्यासाठी ते अडथळे नव्हते तर दडलेल्या संधी होत्या. त्यांनी स्वाभिमानाला सर्वांपेक्षा श्रेष्ठ मानले, त्यांनी कधीही स्वतःशी तडजोड न करण्याची शिकवण दिली. आपण कधीही आपल्या ओळखीशी तडजोड करू नये, असं आवाहन त्यांनी नेहमी केलंय. "कोणताही उपक्रम हा आर्थिक स्थिरतेशिवाय टिकू शकत नाही. काहीही नवीन सुरू करताना हे लक्षात ठेवा," हा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. आदर्शवाद आणि व्यावहारिकतेचे मिश्रण असणारे दूरदर्शीचे व्यावहारिक शहाणपण हे रामोजी रावांकडे होते.

Ramoji Rao legacy of ideas and a resolve for development
रामोजी राव! वारसा विचारांचा अन् संकल्प विकासाचा..! (Source- ETV Bharat)

शिस्त हा यशाचा एकमेव योग्य मार्ग : रामोजी राव यांचा ठाम विश्वास होता की, शिस्त हा यशाचा एकमेव योग्य मार्ग आहे, शिस्तीशिवाय सर्वात हुशार व्यक्तीदेखील त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांच्यासाठी एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची सर्वात मोठी संपत्ती पैसा नव्हती, तर विश्वासार्हता होती. ती विश्वासार्हता ही एकदाच मिळवायची गोष्ट नव्हती, तर ती अढळ वचनबद्धतेद्वारे दररोज टिकवून ठेवायची, असा त्यांचा आग्रह होता. श्री रामोजी राव यांचे समाजावरील प्रेम अफाट होते. ते नेहमीच लोकांचे जीवनमान सुधारण्यास उत्सुक असत आणि मूल्यांवर आधारित पत्रकारितेचे पालन करायचे. जर तरुण पिढीने त्यांच्या चिकाटी, लोकांवरील प्रेम करण्याची भावना अन् जनतेसाठी उभे राहण्याची त्यांची इच्छा यातून प्रेरणा घेतली तर ते निःसंशयपणे तरुण पिढी त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवतील.

Ramoji Rao legacy of ideas and a resolve for development
रामोजी राव! वारसा विचारांचा अन् संकल्प विकासाचा..! (Source- ETV Bharat)

वक्तशीरपणा आणि शिस्तीसाठी ते प्रसिद्ध होते : श्री रामोजी राव यांचे वैशिष्ट्य म्हणजे विचारांमध्ये सतत नावीन्यपूर्णता आणणे. ते तरुणांच्या आकांक्षांना खूप महत्त्व देत असत आणि प्रत्येक विषय सखोल समजून घेत असत. वक्तशीरपणा आणि शिस्तीसाठी ते प्रसिद्ध होते, सूर्योदयापूर्वी त्यांचा दिवस सुरू व्हायचा, व्यायामासाठी वेळ काढायचे आणि संतुलित, सुसंगत जीवनशैली जगायचे. त्यांना त्यांच्या कामात आनंद मिळत असे, ते स्वतःच्या कामालाच पवित्र मानायचे. तसेच त्यांना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची इच्छा असल्याचं ते नेहमीच सांगायचे. ते वचन त्यांनी अढळ ऊर्जेने पूर्ण केले. त्यांच्या अंगीभूत असलेल्या गुणांमुळे त्यांना एक मोठं व्यक्तिमत्त्व अन् माहितीचा खरा खजिना बनवले. त्यांची जीवन तत्त्वे सार्वत्रिकरीत्या आचरणात आणण्यासारखी आहेत. ते सगळ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत.

Ramoji Rao legacy of ideas and a resolve for development
रामोजी राव! वारसा विचारांचा अन् संकल्प विकासाचा..! (Source- ETV Bharat)

व्यवसाय नफा मिळवण्याचं साधन नव्हे, तर एक सामाजिक जबाबदारी : महान कवी कालोजी एकदा म्हणाले होते, "शाईचा एक थेंब लाखो मनांना हलवू शकतो." त्या भावनेनं, रामोजी राव यांनी सामाजिक दुष्कृत्ये आणि अन्यायाला आव्हान देण्यासाठी आपली लेखणी उचलली. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना धारेवर धरलं. सार्वजनिक समस्यांकडं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी असंख्य जागरूकता मोहिमा राबवल्या. जेव्हा जेव्हा राज्यकर्त्यांनी लोकांच्या हक्कांवर गदा आणली, तेव्हा ते पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. रामोजी राव यांच्यासाठी व्यवसाय हा केवळ नफा मिळवण्याचं साधन नव्हतं, तर ती एक सामाजिक जबाबदारीसुद्धा होती. नैसर्गिक आपत्ती आणि संकटांच्या वेळी ते संकटग्रस्तांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहायचे.

Ramoji Rao legacy of ideas and a resolve for development
रामोजी राव! वारसा विचारांचा अन् संकल्प विकासाचा..! (Source- ETV Bharat)

रामोजी राव शब्द आणि कृतीतून कर्मयोगी : रामोजी राव हे आयुष्यभर कृतिशील आणि गतिमान व्यक्तिमत्त्व राहिलंय, त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये जसे की, मीडिया, सिनेमा, हॉस्पिटॅलिटी, आर्थिक सुरक्षा आणि अन्न उद्योगात त्यांच्या उल्लेखनीय कार्यानं अनेकांना जिंकून घेतलंय. ते एक दुर्मीळ द्रष्टे व्यक्तिमत्त्व होतं, जे स्वप्नांना सत्यात बदलण्याची ताकद ठेवत होते. रामोजी राव यांनी रामोजी फिल्मसिटी, ईनाडू वृत्तपत्र, ईटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून देशातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यवसाय आणि रोजगाराला चालना दिलीय. त्यांनी पत्रकारितेतील रुढीवाद झुगारून पारदर्शक पत्रकारितेची पायाभरणी केली. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात अनेक धाडसी पावलं उचलली. रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांनी मृत्यूपूर्वीच त्यांचं स्मारक तयार करून ठेवलं होतं. रामोजी फिल्मसिटीच्या विस्तीर्ण परिसरात त्यांनी बांधलेल्या स्मारकात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तेलंगणा सरकारनं अधिकृत समारंभांसह रामोजी राव यांच्यावर अंत्यसंस्कार केलेत.

पदवीपेक्षा चिकाटी जास्त महत्त्वाची : 'कठीण' आणि 'अशक्य' यांसारख्या शब्दांना रामोजी राव यांच्या शब्दकोशात स्थान नव्हतं. आव्हानांशिवाय जीवन निरर्थक आहे, असं त्यांचं मत होतं. त्यांनी आव्हानांना थेट तोंड दिलं आणि सर्वांना तेच करण्यास प्रेरित केलं. एकाच भाषणानं ते आळशी व्यक्तींना हुशार बनवू शकत होते आणि लाजाळूंना आत्मविश्वासू वक्ते बनवू शकत होते. पदवीपेक्षा चिकाटी जास्त महत्त्वाची आहे, असं त्यांचं मत होतं. जर त्यांना एखाद्यामध्ये एक चमक दिसली तर ते त्यांना प्रोत्साहन द्यायचे आणि ती जोपासायचे आणि त्यातून मोठी व्यक्तिमत्व तयार झालीत. त्यांचं नेतृत्व स्वतःच एक व्यवस्थापन शाळा होती, त्यांचं मार्गदर्शन होतं, एक मास्टरक्लास होतं.

हेही वाचाः

रामोजी राव : स्वप्नाला क्रांतीत रुपांतरित करणारं व्यक्तिमत्व!

'रामोजी राव' : अंतर्मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी करा, यश नक्की मिळेल!

हैदराबाद: शिस्तबद्ध अन् दृढनिश्चयाद्वारे अफाट उंची गाठणारे दूरदर्शी श्री रामोजी राव यांच्याबद्दल तेलुगू समाजाच्या अन् ईटीव्हीच्या कर्मचाऱ्यांच्या हृदयात खोल आदर आणि अभिमान आहे. मातीला माणिक मोती बनवणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा कर्मावर प्रचंड विश्वास होता, त्यांनी त्यांच्या प्रत्येक प्रयत्नातून अमिट छाप सोडली. चिकाटी, शिस्त, मूल्ये अन् विश्वासार्हतेवर आधारित त्यांचा वारसा हा पुढच्या पिढ्यांनाही प्रेरणा देत आहे. 8 जून 2024 रोजी त्यांचे निधन होऊन एक वर्ष झाले असले तरी त्यांनी दाखवलेला मार्ग आपल्या सर्वांसाठी एक चिरस्थायी धडा आहे.

बदल अन् प्रगती या एकाच नाण्याच्या दोन बाजू : श्री रामोजी राव यांचं जीवन अनुकरणीय राहिलंय. ते स्वतःची मूल्ये जपत समाजासाठीही दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करीत आहेत. त्यांची तत्त्वे अन् मूल्ये अनेकांना प्रेरणा देतात. "नेहमी उद्याचा विचार करा अन् कालचा विचार कधीही करू नका," असं ते नेहमी सांगायचे. त्यांच्यासाठी बदल अन् प्रगती या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. खरा विकास हा नवीन विचारसरणीतून निर्माण होतो असे त्यांचे मत होते. "आकाशालाही मर्यादा असतात. नेहमीच मोठा विचार करा, मग यश तुमच्या पदरात पडले,"असं ते नेहमीच सांगायचे. आपल्या मार्गावर कितीही संकटे आली तरी आपण इतरांच्या मदतीची वाट न पाहता स्वतःची तत्त्वे आणि हिमतीवर जीवन जगले पाहिजे, याची शिकवण त्यांनी अनेकांना दिली. त्यांनी इतरांना खूश करण्यासाठी किंवा प्रशंसा मिळवण्यासाठी नव्हे तर अंतर्मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी करण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे यश आणि समाधान दोन्हीही मिळतात. श्री रामोजी राव यांनी आपल्याला हा जीवन जगण्याचा धडा शिकवला.

Ramoji Rao legacy of ideas and a resolve for development
रामोजी राव! वारसा विचारांचा अन् संकल्प विकासाचा..! (Source- ETV Bharat)

एक बहुआयामी उद्योजक : रामोजी राव हे समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये लोकप्रिय होते. त्यांनी 1962 मध्ये मार्गदर्शी चिट फंड, 1974 मध्ये ईनाडू, 1980 मध्ये प्रिया फूड्स, 1980 मध्ये डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, 1983 मध्ये उषाकिरण मूव्हीज, 1995 मध्ये ईटीव्ही चॅनेल्स, 1996 मध्ये रामोजी फिल्म सिटी, 1996 मध्ये रमादेवी पब्लिक स्कूलची स्थापना केली. श्री रामोजी राव यांच्या दृढनिश्चयांपैकी एक म्हणजे कधीही आव्हानांना घाबरू नका. त्यांच्यासाठी ते अडथळे नव्हते तर दडलेल्या संधी होत्या. त्यांनी स्वाभिमानाला सर्वांपेक्षा श्रेष्ठ मानले, त्यांनी कधीही स्वतःशी तडजोड न करण्याची शिकवण दिली. आपण कधीही आपल्या ओळखीशी तडजोड करू नये, असं आवाहन त्यांनी नेहमी केलंय. "कोणताही उपक्रम हा आर्थिक स्थिरतेशिवाय टिकू शकत नाही. काहीही नवीन सुरू करताना हे लक्षात ठेवा," हा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. आदर्शवाद आणि व्यावहारिकतेचे मिश्रण असणारे दूरदर्शीचे व्यावहारिक शहाणपण हे रामोजी रावांकडे होते.

Ramoji Rao legacy of ideas and a resolve for development
रामोजी राव! वारसा विचारांचा अन् संकल्प विकासाचा..! (Source- ETV Bharat)

शिस्त हा यशाचा एकमेव योग्य मार्ग : रामोजी राव यांचा ठाम विश्वास होता की, शिस्त हा यशाचा एकमेव योग्य मार्ग आहे, शिस्तीशिवाय सर्वात हुशार व्यक्तीदेखील त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांच्यासाठी एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची सर्वात मोठी संपत्ती पैसा नव्हती, तर विश्वासार्हता होती. ती विश्वासार्हता ही एकदाच मिळवायची गोष्ट नव्हती, तर ती अढळ वचनबद्धतेद्वारे दररोज टिकवून ठेवायची, असा त्यांचा आग्रह होता. श्री रामोजी राव यांचे समाजावरील प्रेम अफाट होते. ते नेहमीच लोकांचे जीवनमान सुधारण्यास उत्सुक असत आणि मूल्यांवर आधारित पत्रकारितेचे पालन करायचे. जर तरुण पिढीने त्यांच्या चिकाटी, लोकांवरील प्रेम करण्याची भावना अन् जनतेसाठी उभे राहण्याची त्यांची इच्छा यातून प्रेरणा घेतली तर ते निःसंशयपणे तरुण पिढी त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवतील.

Ramoji Rao legacy of ideas and a resolve for development
रामोजी राव! वारसा विचारांचा अन् संकल्प विकासाचा..! (Source- ETV Bharat)

वक्तशीरपणा आणि शिस्तीसाठी ते प्रसिद्ध होते : श्री रामोजी राव यांचे वैशिष्ट्य म्हणजे विचारांमध्ये सतत नावीन्यपूर्णता आणणे. ते तरुणांच्या आकांक्षांना खूप महत्त्व देत असत आणि प्रत्येक विषय सखोल समजून घेत असत. वक्तशीरपणा आणि शिस्तीसाठी ते प्रसिद्ध होते, सूर्योदयापूर्वी त्यांचा दिवस सुरू व्हायचा, व्यायामासाठी वेळ काढायचे आणि संतुलित, सुसंगत जीवनशैली जगायचे. त्यांना त्यांच्या कामात आनंद मिळत असे, ते स्वतःच्या कामालाच पवित्र मानायचे. तसेच त्यांना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची इच्छा असल्याचं ते नेहमीच सांगायचे. ते वचन त्यांनी अढळ ऊर्जेने पूर्ण केले. त्यांच्या अंगीभूत असलेल्या गुणांमुळे त्यांना एक मोठं व्यक्तिमत्त्व अन् माहितीचा खरा खजिना बनवले. त्यांची जीवन तत्त्वे सार्वत्रिकरीत्या आचरणात आणण्यासारखी आहेत. ते सगळ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत.

Ramoji Rao legacy of ideas and a resolve for development
रामोजी राव! वारसा विचारांचा अन् संकल्प विकासाचा..! (Source- ETV Bharat)

व्यवसाय नफा मिळवण्याचं साधन नव्हे, तर एक सामाजिक जबाबदारी : महान कवी कालोजी एकदा म्हणाले होते, "शाईचा एक थेंब लाखो मनांना हलवू शकतो." त्या भावनेनं, रामोजी राव यांनी सामाजिक दुष्कृत्ये आणि अन्यायाला आव्हान देण्यासाठी आपली लेखणी उचलली. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना धारेवर धरलं. सार्वजनिक समस्यांकडं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी असंख्य जागरूकता मोहिमा राबवल्या. जेव्हा जेव्हा राज्यकर्त्यांनी लोकांच्या हक्कांवर गदा आणली, तेव्हा ते पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. रामोजी राव यांच्यासाठी व्यवसाय हा केवळ नफा मिळवण्याचं साधन नव्हतं, तर ती एक सामाजिक जबाबदारीसुद्धा होती. नैसर्गिक आपत्ती आणि संकटांच्या वेळी ते संकटग्रस्तांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहायचे.

Ramoji Rao legacy of ideas and a resolve for development
रामोजी राव! वारसा विचारांचा अन् संकल्प विकासाचा..! (Source- ETV Bharat)

रामोजी राव शब्द आणि कृतीतून कर्मयोगी : रामोजी राव हे आयुष्यभर कृतिशील आणि गतिमान व्यक्तिमत्त्व राहिलंय, त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये जसे की, मीडिया, सिनेमा, हॉस्पिटॅलिटी, आर्थिक सुरक्षा आणि अन्न उद्योगात त्यांच्या उल्लेखनीय कार्यानं अनेकांना जिंकून घेतलंय. ते एक दुर्मीळ द्रष्टे व्यक्तिमत्त्व होतं, जे स्वप्नांना सत्यात बदलण्याची ताकद ठेवत होते. रामोजी राव यांनी रामोजी फिल्मसिटी, ईनाडू वृत्तपत्र, ईटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून देशातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यवसाय आणि रोजगाराला चालना दिलीय. त्यांनी पत्रकारितेतील रुढीवाद झुगारून पारदर्शक पत्रकारितेची पायाभरणी केली. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात अनेक धाडसी पावलं उचलली. रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांनी मृत्यूपूर्वीच त्यांचं स्मारक तयार करून ठेवलं होतं. रामोजी फिल्मसिटीच्या विस्तीर्ण परिसरात त्यांनी बांधलेल्या स्मारकात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तेलंगणा सरकारनं अधिकृत समारंभांसह रामोजी राव यांच्यावर अंत्यसंस्कार केलेत.

पदवीपेक्षा चिकाटी जास्त महत्त्वाची : 'कठीण' आणि 'अशक्य' यांसारख्या शब्दांना रामोजी राव यांच्या शब्दकोशात स्थान नव्हतं. आव्हानांशिवाय जीवन निरर्थक आहे, असं त्यांचं मत होतं. त्यांनी आव्हानांना थेट तोंड दिलं आणि सर्वांना तेच करण्यास प्रेरित केलं. एकाच भाषणानं ते आळशी व्यक्तींना हुशार बनवू शकत होते आणि लाजाळूंना आत्मविश्वासू वक्ते बनवू शकत होते. पदवीपेक्षा चिकाटी जास्त महत्त्वाची आहे, असं त्यांचं मत होतं. जर त्यांना एखाद्यामध्ये एक चमक दिसली तर ते त्यांना प्रोत्साहन द्यायचे आणि ती जोपासायचे आणि त्यातून मोठी व्यक्तिमत्व तयार झालीत. त्यांचं नेतृत्व स्वतःच एक व्यवस्थापन शाळा होती, त्यांचं मार्गदर्शन होतं, एक मास्टरक्लास होतं.

हेही वाचाः

रामोजी राव : स्वप्नाला क्रांतीत रुपांतरित करणारं व्यक्तिमत्व!

'रामोजी राव' : अंतर्मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी करा, यश नक्की मिळेल!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.