नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, असं विनंती करणारं पत्र काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी (दि.२८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, "या हल्ल्यामुळं प्रत्येक भारतीय संतापला आहे. या महत्त्वाच्यावेळी, भारताला हे दाखवून द्यावं लागेल की आपण दहशतवादाविरुद्ध नेहमीच एकजूट राहू."
याबरोबर, लोकप्रतिनिधींना त्यांची एकता आणि संकल्प व्यक्त करण्याची संधी देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजं असं विरोधकांचं मत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी पत्राद्वारे म्हटलं आहे की, "विरोधकांचा असा विश्वास आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, जिथे लोकप्रतिनिधी त्यांची एकता आणि दृढनिश्चय दाखवू शकतील. त्यामुळं विशेष अधिवेशन शक्य तितक्या लवकर बोलावलं जावं, अशी आम्ही विनंती करतो."
Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi writes to PM Narendra Modi requesting that a special session of both houses of Parliament be convened at the earliest
— ANI (@ANI) April 29, 2025
" at this critical time, india must show that we always stand together against terrorism," reads the letter pic.twitter.com/gYqhdyBcc7
दुसरीकडं, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनीही संसदेच्या दोन्ही सभागृहांचं विशेष अधिवेशन बोलावण्याचं आवाहन केलं आहे. प्रस्तावित अधिवेशन हे दहशतवादी हल्ल्यावर संयुक्त भूमिका व्यक्त करण्यासाठी आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी सामूहिक दृढनिश्चय प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ असेल, असेही मल्लिकार्जुन खरगे म्हटलं आहे. तसंच, विरोधी पक्षांच्या एकता आणि एकतेवर विश्वास ठेवणे ही काळाची गरज असल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रात म्हटलं आहे.
Congress President and Leader of the Opposition in the Rajya Sabha, Mallikarjun Kharge has written to Prime Minister Narendra Modi requesting that a special session of both Houses of Parliament be convened at the earliest to demonstrate a collective will to deal with the… pic.twitter.com/3p5ZqagsVb
— ANI (@ANI) April 29, 2025
दरम्यान, काल (सोमवारी) जम्मू आणि काश्मीर विधानसभेनं पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी एक विशेष अधिवेशन आयोजित केलं होतं. अधिवेशनादरम्यान, दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा, तसंच पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत एकता व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. विधानसभेचे सभापती अब्दुल रहीम राथेर यांच्या भाषणानंतर अधिवेशनाच्या सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मांडला. सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीनंतर केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राजनैतिक उपाययोजनांना या ठरावानं पाठिंबा दिला.