ETV Bharat / bharat

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारचे 'एक्स' अकाउंट भारतात निलंबित - PAKISTAN X ACCOUNT SUSPENDED

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारचे 'एक्स' अकाउंट भारतात निलंबित करण्यात आले आहे.

Pahalgam Terrorist Attack
पहलगाम दहशतवादी हल्ला (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 24, 2025 at 2:09 PM IST

Updated : April 24, 2025 at 2:18 PM IST

1 Min Read

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी भारतात पाकिस्तान सरकारचे अधिकृत 'एक्स' अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर भारतानं अनेक कडक प्रत्युत्तरात्मक उपाययोजना जाहीर केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणं आणि वरिष्ठ पाकिस्तानी राजदूत तसंच कर्मचाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश देणे यासारख्या पावलांचा समावेश आहे.

भारताकडून कोणती कारवाई? : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीनंतर एक दिवसात काही महत्त्वपूर्ण राजनैतिक निर्णय घेण्यात आले. पहलगाममधील हल्ल्यावर भारताकडून कोणती कारवाई करायची याचा निर्णय घेण्यासाठी एक बैठक झाली. भारताने सीमेपलीकडून दहशतवादाला आश्रय देण्याचा आणि पाठिंबा देण्याचा आरोप असलेल्या पाकिस्तानविरुद्ध व्यापक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत यातून दिसतात. बुधवारी संध्याकाळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत या उपाययोजनांची घोषणा केली. यातील सर्वात प्रमुख म्हणजे प्रत्येक देशातील राजनैतिक मिशनचा दर्जा कमी करणं. भारतीय आणि पाकिस्तानी उच्चायुक्तालये त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५५ ​​वरून ३० पर्यंत कमी करतील, १ मे पर्यंत ही कारवाई पूर्ण होईल.

देश सोडण्याचे दिले निर्देश : भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील सर्व संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांनाही हद्दपार केलं आहे. या व्यक्तींना 'पर्सना नॉन ग्राटा' घोषित करण्यात आलं आहे आणि त्यांना एका आठवड्याच्या आत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, भारत इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्तालयातून आपले लष्करी सल्लागार मागे घेईल. दोन्ही मोहिमांमध्ये सेवा सल्लागारांना नियुक्त केलेल्या पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही परत बोलावलं जाईल.

विद्यमान व्हिसा तत्काळ रद्द : भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठीची सार्क व्हिसा सूट योजना देखील स्थगित केली आहे. या कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व विद्यमान व्हिसा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील एकमेव कार्यरत भू-सीमा क्रॉसिंग, अटारी येथील एकात्मिक तपासणी नाका तत्काळ बंद करण्याचे आदेशही सीसीएसने दिले आहेत.

हेही वाचा -

  1. पहलगाम दहशतवादी हल्ला : भारताच्या स्थिरतेला वाढत्या धोक्याचे स्पष्ट संकेत
  2. जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, कलम ३७० रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
  3. Encounter in Pulwama : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी भारतात पाकिस्तान सरकारचे अधिकृत 'एक्स' अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर भारतानं अनेक कडक प्रत्युत्तरात्मक उपाययोजना जाहीर केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणं आणि वरिष्ठ पाकिस्तानी राजदूत तसंच कर्मचाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश देणे यासारख्या पावलांचा समावेश आहे.

भारताकडून कोणती कारवाई? : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीनंतर एक दिवसात काही महत्त्वपूर्ण राजनैतिक निर्णय घेण्यात आले. पहलगाममधील हल्ल्यावर भारताकडून कोणती कारवाई करायची याचा निर्णय घेण्यासाठी एक बैठक झाली. भारताने सीमेपलीकडून दहशतवादाला आश्रय देण्याचा आणि पाठिंबा देण्याचा आरोप असलेल्या पाकिस्तानविरुद्ध व्यापक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत यातून दिसतात. बुधवारी संध्याकाळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत या उपाययोजनांची घोषणा केली. यातील सर्वात प्रमुख म्हणजे प्रत्येक देशातील राजनैतिक मिशनचा दर्जा कमी करणं. भारतीय आणि पाकिस्तानी उच्चायुक्तालये त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५५ ​​वरून ३० पर्यंत कमी करतील, १ मे पर्यंत ही कारवाई पूर्ण होईल.

देश सोडण्याचे दिले निर्देश : भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील सर्व संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांनाही हद्दपार केलं आहे. या व्यक्तींना 'पर्सना नॉन ग्राटा' घोषित करण्यात आलं आहे आणि त्यांना एका आठवड्याच्या आत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, भारत इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्तालयातून आपले लष्करी सल्लागार मागे घेईल. दोन्ही मोहिमांमध्ये सेवा सल्लागारांना नियुक्त केलेल्या पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही परत बोलावलं जाईल.

विद्यमान व्हिसा तत्काळ रद्द : भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठीची सार्क व्हिसा सूट योजना देखील स्थगित केली आहे. या कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व विद्यमान व्हिसा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील एकमेव कार्यरत भू-सीमा क्रॉसिंग, अटारी येथील एकात्मिक तपासणी नाका तत्काळ बंद करण्याचे आदेशही सीसीएसने दिले आहेत.

हेही वाचा -

  1. पहलगाम दहशतवादी हल्ला : भारताच्या स्थिरतेला वाढत्या धोक्याचे स्पष्ट संकेत
  2. जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, कलम ३७० रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
  3. Encounter in Pulwama : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याचा खात्मा
Last Updated : April 24, 2025 at 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.