नवी दिल्ली : दहशतवाद्यांनी पहलगाम इथं पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा बळी गेला. मात्र पर्यटकांना ठार केल्यानंतर चवताळलेल्या भारतानं पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीनं पाकिस्तानचं दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दूतावासातील राजदूतांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडं भारत पाकिस्तानदरम्यान करण्यात आलेल्या सिंधू कराराला रद्द करण्यात आलं आहे. यासह इतर अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
#WATCH | Delhi: Foreign Secretary Vikram Misri says, " recognising the seriousness of this terrorist attack, the cabinet committee on security (ccs) decided upon the following measures- the indus waters treaty of 1960 will be held in abeyance with immediate effect until pakistan… pic.twitter.com/PxEPrrK1G8
— ANI (@ANI) April 23, 2025
पाकिस्तानमधील भारतीय दूतावास आता बंद : भारताचा सर्वात मोठा निर्णय म्हणजे पाकिस्तानमधील भारतीय दूतावास आता बंद केलं जाईल. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीनं घेतला आहे. भारतानं सिंधू पाणी वाटप करार रद्द केला आहे. सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानं त्याचे परिणाम आगामी काळात पाकिस्तानला भोगावे लागणार आहेत.
पाकिस्तानी राजदूतांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश : पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या सुरक्षा समितीनं भारतातील सर्व पाकिस्तानी राजदूतांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुढं कोणत्याही पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा मिळणार नाही. सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आधीच जारी केलेले व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. त्यांना 48 तासांच्या आत भारत सोडावा लागणार आहे. नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण, नौदल आणि हवाई दल सल्लागारांना एका आठवड्यात देश सोडावा लागणार आहे.
हेही वाचा :