VIDEO : भोंग्याच्या प्रश्नापेक्षा लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न महत्त्वाचा - अजित पवार
गडचिरोली - भोंग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे की लोकांच्या रोजीरोटीचा, असा प्रतिप्रश्न करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांना सुनावले. स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्षे झाली. मात्र आजवर हा प्रश्न कधी उपस्थित झाला नाही. या प्रश्नापेक्षा लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले. शुक्रवारी गडचिरोली दौऱ्यावर आले असता, पत्रकार परिषदेत ते बोलत होते.