परतीच्या पावसाचा कापसाला फटका; वाशिममध्ये शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त

By

Published : Sep 29, 2021, 5:46 PM IST

thumbnail

वाशिम - जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात 509 हेक्‍टरवर कापसाची पेरणी करण्यात आली. मात्र, मागील दहा पंधरा दिवसापासून परतीच्या पावसामुळे कापूस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापसाचे बोंड खाली पडून सडत आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसामुळे जाणार आहे. यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. आता यावर्षी घेतलेले कर्ज बँकेत कसे भरायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असे प्रश्‍न शेतकऱ्यांच्या परिवाराला पडला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.