यवतमाळ - येथील मनसे कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरणाच्या खड्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी या खड्यात पडून एका नागरिकांचा मृत्यू झाला. संबंधित जीवन प्राधिकरण अधिकारी व कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी त्यावेळी मागणी करण्यात आली होती. मात्र, पाच दिवस होऊनही त्यांच्याव कुठलीच कारवाई न झाल्याने मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
या खड्ड्याने चार-पाच लोकांचा बळी घेतला आहे
शहरात अमृत योजनेच्या नावाखाली शहरभर अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. आतापर्यंत या खड्ड्यात पडून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. तसेच, सतत वाहनाचे अपघातही होतात. तसेच, आतापर्यंत या खड्ड्याने चार-पाच लोकांचा बळी घेतला आहे. या खड्ड्यात आठ ते दहा फूट पाणी आहे.