वाशिम - राज ठाकरेंनी सभेत काही वक्तव्य केले आणि समाजात तेढ निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तरी राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम असल्याचे प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ते वाशिममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
'भाजपाने भविष्य सांगणारा गुरू बदलला' : भाजपाने भविष्य सांगणारा गुरू बदलला असून, आधी चंद्रकांत पाटील होते, आता नारायण राणे भाजपाने आता भटजी, गुरुजी, नेमले आहे, अशी टीकाही देसाई यांनी केली. तर नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांना आम्ही काहीच किंमत देत नसल्याचेही शंभूराज देसाई म्हणाले.